शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
6
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
7
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
8
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
9
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
10
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
11
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
12
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
13
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
14
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
15
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
16
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
17
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
18
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
19
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले

औरंगाबादमध्ये वीजपुरवठ्याचे पुन्हा खाजगीकरण ? चार दिवसांपूर्वी खाजगी कंपनीकडून झाली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 1:16 PM

केंद्रात आणि राज्यात सत्तारुढ असलेल्या पक्षाशी जवळीक असलेल्या वीज क्षेत्रातील एका बड्या खाजगी कंपनीने केली पाहणी

ठळक मुद्देया पूर्वी फ्रँचायझीकरणाचा प्रयोग फसलेला आहे.खाजगी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी 

औरंगाबाद : यापूर्वी शहरात विद्युत पुरवठ्यासाठी फ्रँचायझीकरणाचा प्रयोग फसलेला आहे.  फसलेल्या या प्रयोगाचा मोह महावितरणला अनावर झाला आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तारुढ असलेल्या पक्षाशी जवळीक असलेल्या वीज क्षेत्रातील एका बड्या खाजगी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चार दिवसांपूर्वीच शहरात येऊन चाचपणी केल्याचे अधिकृत वृत्त आहे. 

प्रामुख्याने ज्या शहरात विजेची चोरी आणि गळतीचे प्रमाण अधिक आहे. त्याठिकाणी थकबाकी कमी होण्याऐवजी दरमहा त्यामध्ये कोट्यवधी रुपयांची वाढ होत आहे, अशा शहरांमध्ये वीजपुरवठ्यासाठी फ्रँचायझीकरणाचा विचार पुन्हा ऐरणीवर येत आहे. नोव्हेंबर २०१८ अखेरपर्यंत औरंगाबाद शहराची थकबाकी १३१ कोटी ८५ लाख रुपये एवढी असून, वसुलीबाबत महावितरणने धडक मोहीम हाती घेतली आहे, हे विशेष. ठाणे जिल्ह्यातील शिव, मुंब्रा, कळवा व नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे विद्युत पुरवठा करण्यासाठी नुकत्याच खाजगी कंपन्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता औरंगाबाद शहरही फ्रँचायझीकरणासाठी ऊर्जा विभागाच्या रडारवर आहे. 

तथापि, खाजगी कंपनीचे अधिकारी शहरात येऊन गेल्याबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलणे टाळले. शहरात कोणी येऊन गेले असेल, त्याबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत. आम्हाला फ्रँचायझीकरणासंबंधी कोणी भेटलेलेही नाही, असे सांगत मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी या विषयावर अधिक बोलण्यास नकार दिला. 

दरम्यान, चार दिवसांपूर्वी वीज क्षेत्रात कार्यरत एका कंपनीच्या अधिकाऱ्यांचे पथक औरंगाबादेत आले. त्यांनी मिलकॉर्नर येथील पॉवरहाऊस येथे जाऊन शहरातील वीजपुरवठ्याबद्दल माहिती जाणून घेतली. त्यानंतर हे अधिकारी परिमंडळ कार्यालयातही येऊन गेल्याची माहिती समोर आली आहे. फ्रँचायझीकरणाचा अपयशी ठरलेला हा प्रयोग पुन्हा एकदा करून पाहण्याचे कारण काय, अशी कुजबुज महावितरणमध्ये सुरू झाली असून, तांत्रिक कामगार युनियनचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन यांनी याविरुद्ध आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

‘जीटीएल’ने आधी दाखविला आहे ठेंगाजीटीएल या फ्रँचायझी कंपनीने ३० एप्रिल २०११ रोजी औरंगाबाद शहराच्या विद्युत पुरवठ्याचा ताबा घेतला. जीटीएलने यासंबंधीची कसलीही पूर्वकल्पना न देता रातोरात सर्व उपकेंद्रांचा ताबा घेत महावितरण कंपनीच्या कर्मचारी-अभियंत्यांना बाहेरचा रस्ता दाखविला. त्यानंतर २०१४ मध्ये तब्बल २५० ते ३०० कोटी रुपयांचे महावितरणचे देणे बुडवून जीटीएलने येथून गाशा गुंडाळला. मागील चार वर्षांपासून यासंदर्भात महावितरणच्या मुंबई मुख्यालयातील फ्रँ चायझी सेलमध्ये जीटीएलसोबत चर्चेच्या फेऱ्या रंगत आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादelectricityवीज