शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यगृहाबाबत वाळूज महानगर उपेक्षितच; उदयोन्मुख कलावंतांसह रसिकांच्या भावनांकडे दुर्लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 19:33 IST

शहराला लागूनच असलेल्या वाळूज महानगरात आजपर्यंत एकही नाट्यगृह अस्तित्वात आले नाही.

औरंगाबाद : शहराला लागूनच असलेल्या वाळूज महानगरात आजपर्यंत एकही नाट्यगृह अस्तित्वात आले नाही. कला, साहित्य, संस्कृतीचा पुरस्कार करणाऱ्या सांस्कृतिक विभागालाही याची भुरळ पडली आहे. या परिसरात सुसज्य नाट्यगृह उभारण्यात यावे, अशी मागणी नवोदित कलाकारांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी उदयोन्मुख कलावंतांसह नाट्यरसिकांमध्ये आता जोर धरत आहे. 

वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वाळूज महानगरातील लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. महानगराला लागून नवनवीन नागरी वसाहती निर्माण होत आहेत. याठिकाणी बहुतांश मध्यम वर्गीय कामगार मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. येथे मोठमोठी सुसज्ज रुग्णालये, हॉटेल्स, बँका, शाळा-महाविद्यालये आहेत. येथे कलावंतांचीही कमी नाही. रोज कारखान्यात यंत्रासोबत राबणाऱ्या कामगारांनी कलेच्या हिमतीवर नालौकिक केले आहे; परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे वाळूज महानगरात कलावंतांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी एकही नाट्यगृह नाही. कोणतेही सांस्कृतिक, कला, साहित्य, स्नेहसंमेलन अथवा राजकीय कार्यक्रम हे मोकळ्या मैदानावर किंवा खाजगी मंगल कार्यालय, कामगार कल्याण केंद्रांमध्येच घ्यावे लागतात. 

बारा-बारा तास यंत्रासोबत राबणारा कामगार वर्ग कला, साहित्य, संस्कृती विश्वात काही करू पाहत असेल, त्याच्या जाणिवा साहित्यातून, नाटकातून मांडू पाहत असेल, तर त्यांच्यासाठी या भागात हक्काचे व्यासपीठच हवे. या परिसरात अनेक उदयोन्मुख कलावंत आहेत. कलागुणांचा आविष्कार करण्यासाठी तसेच रसिकांना नाट्य-कलेचा आनंद घेण्यासाठी येथे नाट्यगृह असणे गरजेचे आहे. 

कामगार कल्याण मंडळातर्फे दरवर्षी नाट्य स्पर्धा आयोजित केल्या जातात. या भागात राहणारे अनेक कामगार-कलावंत यामध्ये सहभागी होत असतात. मात्र, सरावासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ नाही. त्यांना मोकळ्या मैदानात, एखाद्या मंदिरात किंवा घराच्या छतावर नाटकाचा सराव करावा लागतो. अंगी गुणवत्ता आहे; पण सुविधा नसल्याने कलावंतांचा हिरमोड होत आहे. हक्काचे नाट्यगृह असावे, अशी अपेक्षा नाट्य दिग्दर्शक तथा कलावंत अशोक गावंडे यांनी व्यक्त केली.

नेहरू भवनची बकाल अवस्था पूर्वी शहरातील सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असलेल्या नेहरू भवनची इमारत पाडण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. नगरपालिकेच्या काळात सुमारे चाळीस वर्षांपूर्वी ४ हजार ५० चौरस मीटर एवढ्या जागेत नेहरू भवन उभारले. येथे नाटक, मुशायरा, गझल अशा अनेक मैफली रंगायच्या. मात्र, हळूहळू नेहरू भवनची अवस्था अत्यंत दयनीय होत गेली. खुली जागा लग्न, खासगी समारंभासाठी वापरण्यात येत आहे. त्यातून महापालिकेला अपेक्षित उत्पन्नही मिळत नाही. त्यामुळे ही इमारत पाडून प्रेक्षकगृह, समारंभ हॉल व व्यापारी संकुल तयार करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. नवीन नाट्यगृहे उभारण्याऐवजी आहेत ती पाडून व्यापारी संकुले उभारण्याकडे महापालिकेचा कल आहे. हीच मानसिकता दृढ होत गेल्यास शहरातील सांस्कृतिक सृजनता नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :WalujवाळूजAurangabadऔरंगाबादartकला