शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

बीड जिल्ह्यात ‘हुमणी’चा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 12:21 AM

यावर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे तसेच हवामान बदलामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे.

ठळक मुद्देसोयाबीन, तूर, कपाशीला फटका : उसाचे फडही अळी पोखरु लागली

- अनिल भंडारी बीड : यावर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे तसेच हवामान बदलामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. मागील काही दिवसांपासून उसामध्ये पोक्काबोंग रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. यामुळे उसाची वाढ जागेवरच थांबण्यास सुरुवात झाली आहे.

संपूर्ण ऊस क्षेत्रामध्ये हवामानातील बदलामुळे कांडी कीड, खोड कीड, खवले कीड, पिठ्या ढेकूण, पांढरी माशी यासारख्या किडींचा प्रादुर्भाव पाहवयास मिळत आहे. सोबतच हुमणीनेही मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याने उसाचा संपूर्ण फड जळण्याच्या अवस्थेत आहे. जोपासलेल्या उसाची होणारी ही अवस्था पाहून शेतकरी हैराण झाले आहेत. एखाद्या शत्रूने हल्ला करावा याप्रमाणे ऊस उत्पादकांची बिकट अवस्था झाली आहे. या परिस्थितीत कृषी विभागाकडून मात्र पुरेशी जनजागृती होत नसल्याचे दिसून आले आहे. एकीकडे उसावर हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे, तर दुसरीकडे आधीच बोंडअळीने त्रस्त झालेल्या कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना हुमणीचाही सामना करावा लागत आहे. तसेच सोयाबीन आणि तुरीवरही हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.

देठाला धक्का : कोसळतो ऊसमातीमध्ये हुमणीच्या अळ्या पिकाची मुळे कुरतडतात, उसामध्ये घुसतात. त्यामुळे ऊस जळण्यास सुरुवात होते. कालांतराने संपूर्ण ऊस पिवळा पडून जळून जातो. उसाच्या देठाला धक्का जरी लागला, तरी तो खाली कोसळतो, इतक्या प्रमाणात हुमणीने उसाला पोखरले आहे.

रबी हंगामाची चिंताखरिपातील जवळपास सर्वच पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. हुमणीचा वाढता प्रभाव पाहता आणि हुमणीच्या अळीचे आयुष्य साधारण १ वर्ष लक्षात घेता आगामी रबी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता असल्याने आतापासूनच उपाययोजनांची गरज आहे.

सर्वच उसात शिरकावपोक्काबोंग आणि हुमणीचा सर्वाधिक फटका २६५, ८६०३२, ८००५, १०००१ आदी जातीच्या ऊस पिकाला बसला आहे. शेंड्याचे वाढे लहान होणे, उसाची वाढ थांबणे, विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव या उसामध्ये पाहयला मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हंगामापासूनच होती उपायांची गरज,जनजागृतीचा अभावमागील वर्षी बुलडाणा, जालना जिल्ह्यात हुमणीचा प्रादुर्भाव जाणवला होता. त्या पार्श्वभूमीवर जनजागृती महत्त्वाची होती. मात्र, हुमणी नियंत्रणात आणण्यासाठी कृषी विभागाकडून अद्याप फारसे प्रयत्न झालेले दिसत नाहीत.खरीप हंगाम सुरू झाल्यापसून याकडे लक्ष देण्याची गरज होती.कपाशीवर पडलेल्या बोंडअळी नियंत्रणासाठी मोठा गाजावाजा करीत राज्य पातळीवर क्षेत्र भेटी आणि मार्गदर्शनाचे कार्यक्रम होत आहेत. मात्र, हुमणीच्या नियंत्रणासाठी ठोस उपाय केल्याचे दिसत नाही.

ऊस उत्पादकतेत मोठी घटहुमणी टाळण्यासाठी बेणे प्रक्रिया करुनच ऊस लागवड करावी. लागवडीच्या वेळी एकरी १० किलो फर्टेरा किंवा फिप्रोनील सरी डोससोबत द्यावे. यावर्षी हुमणी किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेऊन नवीन लागवड होणाºया व मोठ्या उसामध्ये एकरी दोन लिटर मेटारायझिम ड्रेचिंग (आळवणी) करावी. वेळीच उपाययोजना केल्या नाही तर ऊस उत्पादकतेत मोठी घट येऊ शकते. बीड जिल्ह्यात सध्या १२ हजार हेक्टरातील उसाला फटका बसला आहे.

उपाययोजना करून वेळीच संकट टाळा, भरपाई द्यामाजलगाव तालुक्यातील साखर कारखान्यांनी विशिष्ट जातीच्या उसाची लागवड करण्यासाठी शेतकरी सभासदांवर सक्ती केली होती. २६५ जातीच्या उसाला प्रतिबंध केला होता. आम्हाला आंदोलन करावे लागले. त्यानंतर नमते घेणाºया कारखान्यांनी हट्ट करीत छुपा अजेंडा चालविला. पाच हजार रुपये टनाने शेतकºयांनी बेणे घेतले. महिनाभरापासून हुमणीमुळे ऊस गळून पडत आहे. फड जळत आहे. लाखो टन ऊस बरबाद होत आहे. तातडीने उपाय करावेत. नुकसानग्रस्त शेतकºयांना भरपाई द्यावी. नसता आंदोलन करावे लागेल, असे शेतकरी नेते गंगाभिषण थावरे म्हणाले.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र