शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Atal Bihari Vajpayee : ‘ये रास्ते हैं प्यार के, चलना संभल के...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 16:18 IST

Atal Bihari Vajpayee: कार खड्ड्यातून आदळत गेली. तेव्हा गाडी सावकाश चालव, असे अटलजी मला थेट म्हणाले नाहीत; पण त्यांनी आशा भोसले यांनी गायलेल्या गाण्यातून ते सुचविले. अटलजी गाणे गातच म्हणाले, ‘ये रास्ते हैं प्यार के, चलना संभल संभल के’.

औरंगाबाद : जनसंघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुधीर देशपांडे (आबासाहेब) यांनी अटलजींचा एक किस्सा सांगितला. शहरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अटलजी आले होते. पुढील प्रवास ते रेल्वेने करणार होते. फ्रेश होण्यासाठी त्यांना माझ्या घरी न्यायचे होते. त्यावेळेस माझ्याकडे अ‍ॅम्बेसिडर कार होती. त्या कारमधून सकाळी त्यांना घरी आणले. त्यांनी नाश्ता केला. पुढील प्रवास रेल्वेने करायचा असल्याने मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी होईल, हे लक्षात घेऊन चिकलठाणा रेल्वेस्टेशन येथून त्यांचे तिकीट काढले होते.

शॉर्टकटने जाण्यासाठी मी कार थेट चिकलठाणा विमानतळाच्या रनवेवरून नेली. पलीकडे रस्ता खूप खराब होता. कार खड्ड्यातून आदळत गेली. तेव्हा गाडी सावकाश चालव, असे अटलजी मला थेट म्हणाले नाहीत; पण त्यांनी आशा भोसले यांनी गायलेल्या गाण्यातून ते सुचविले. अटलजी गाणे गातच म्हणाले, ‘ये रास्ते हैं प्यार के, चलना संभल संभल के’. त्यानंतर मी आयुष्यात कधी कार अतिवेगाने चालविली नाही. 

‘ये चुनाव रॅली नही है’सुधीर देशपांडे यांनी सांगितले की, आणीबाणीनंतरच्या काळात अटलजी औरंगाबादेत आले होते. तेव्हा त्यांची लोकप्रियता वाढली होती. विमानतळावरून सुभेदारी गेस्ट हाऊसवर त्यांना नेण्यासाठी आम्ही १०० कार आणल्या होत्या. सर्व ताफा विमानतळावरून सुभेदारीकडे निघाला. पाठीमागे एवढ्या कार पाहून अटलजी म्हणाले, ‘ये क्या है, इतने कार क्यू लाये, मेरी चुनाव रॅली नहीं है’ तेव्हा मी त्यांना सांगितले, निवडणूक नसली तरी कार्यकर्ते स्वत:हून त्यांच्या स्वत:च्या कार घेऊन तुमच्या स्वागतासाठी आले आहेत. हे ऐकून अटलजी गालातल्या गालात हसले. 

मागील डिसेंबरमध्येच शहरात साजरा झाला अटलजींचा वाढदिवसअटलबिहारी वाजपेयी यांचा ९३ वा वाढदिवस २५ डिसेंबर २०१७ रोजी शहरात साजरा करण्यात आला होता.  जिल्हा परिषद रोडवरील सीमंत मंगल कार्यालयात यानिमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खास जनसंघाचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांपासून ते भाजपच्या आताच्या कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण या सोहळ्याला हजर होते. यानिमित्ताने अटलजींचे शहरवासीयांना लाभलेल्या सहवासावरील छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यावेळी अटलजींच्या आठवणीत सारे जण रमले होते. तेव्हा त्यांच्यासाठी दीर्घायुष्यासाठी सर्वांनी प्रार्थना केली होती आणि खास पत्रिकाही तयार करण्यात आली होती.

जन्माला आल्याचे सार्थक झाले...काही कामानिमित्त दिल्लीला आले असून, मला आज अटलजींना भेटायचेच आहे. त्यांना भेटल्याशिवाय मी मरणार नाही आणि त्यांनाही मरू देणार नाही’ हा निर्धारपूर्वक आवाज ऐकला आणि अटलबिहारी वाजपेयींचा तत्कालीन पीए अश्विनी क्षणभर गडगडला. तीन वर्षांपासून पिच्छा पुरविणारी ही बाई आज काही केल्या ऐकणार नाही, असे त्याला पक्के ठाऊक झाले. त्याने त्याच दिवशीची म्हणजे दि. १३ आॅक्टोबर २००३ या दिवशी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांची अटलजींची भेट पक्की केली आणि त्या भेटीने मी जन्माला आल्याचे सार्थक झाले, असे भावोद्गार डॉ. मंगला वैष्णव यांनी काढले.वाजपेयींसोबतच्या या अविस्मरणीय भेटीची आठवण सांगताना स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापिका तथा कवियित्री डॉ. मंगला वैष्णव यांचा उर दाटून आला होता. त्या म्हणाल्या की, ‘राजा भोज आणि गंगू तेली’ अशा स्वरूपाची असणारी ही भेट म्हणजे माझ्यासाठी अगदी दैवयोग आहे. 

डॉ. वैष्णव यांना वाजपेयींच्या कविता वाचण्याचा छंद होता. १९९६ साली त्यांनी एका मित्राच्या सांगण्यावरून वाजपेयी यांच्या ‘रोते रोते रात सो गयी’ या कवितेचा सहज म्हणून अनुवाद केला आणि हळूहळू एकेक कविता करीत पुस्तकनिर्मिती झाली. पुस्तक प्रकाशनानंतर हा अनुवाद आता वाजपेयींना समर्पित करायचा, अशी डॉ. वैष्णव यांची दृढ इच्छा होती. त्यानुसार १९९८ पासून त्या वाजपेयी यांच्या भेटीसाठी प्रयत्नशील होत्या. तब्ब्ल पाच वर्षे पाठपुरावा केल्यानंतर शेवटी २००३ साली त्यांची भेट होऊ शकली. दहा मिनिटांसाठी ही भेट निश्चित करण्यात आली होती. डॉ. वैष्णव यांनी केलेला उत्कृष्ट अनुवाद पाहून वाजपेयी यांना मनापासून कौतुक वाटले आणि त्यांनी डॉ. वैष्णव यांना एकामागून एक अशा बऱ्याच कविता ऐकवायला लावल्या. १० मिनिटांची ही भेट ३५ मिनिटांपर्यंत लांबत गेली. डॉ. वैष्णव यांच्या पुस्तकावर वाजपेयी यांनी ‘काय लिहू’ असा अभिप्रायही लिहिला आहे. डॉ. वैष्णव म्हणाल्या की, वाजपेयी दिसायला अजिबात देखणे नव्हते; पण त्यांच्या विद्वत्तेच्या तेजाने डोळे अक्षरश: दिपून जात होते, वाजपेयींच्या भेटीने परब्रह्म भेटल्याचा साक्षात्कार झाला, असे त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीAurangabadऔरंगाबाद