शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

अशोक चव्हाण अचानक औरंगाबादेत, मोजक्याच पदाधिकाऱ्यांबरोबर ‘राजकीय चर्चा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 22:50 IST

राज्याचे माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचे आज सायंकाळी मुंबईहून औरंगाबादला आगमन झाले व मोजक्याच पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी राजकीय चर्चा केली.

औरंगाबाद : राज्याचे माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचे आज सायंकाळी मुंबईहून औरंगाबादला आगमन झाले व मोजक्याच पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी राजकीय चर्चा केली.आमदार सुभाष झांबड, जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अनिल पटेल, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव पवार, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, जि.प.चे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी उपाध्यक्ष सुरेंद्र सोळुंके पाटील, प्रदेश काँग्रेसचे सचिव अशोक सायन्ना, नगरसेवक भाऊसाहेब जगताप, माजी नगरसेवक नारायणअण्णा सुरगोणीवार, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सरोज मसलगे पाटील, प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव मीनाक्षी बोर्डे-देशपांडे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, डॉ. पवन डोेंगरे, योगेश मसलगे पाटील, काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष अनिल मालोदे, यशवंत कदम आदी मोजके कार्यकर्ते विमानतळावर दाखल झाले होते. ‘सुभाष झांबड हम तुम्हारे साथ है’ अशी साद चव्हाण यांनी घालताच झांबड यांनीही, हम भी तुम्हारे साथ है’ असा प्रतिसाद दिला.काही मोजक्या कार्यकर्त्यांना चर्चा करण्यासाठी सोबत घेऊन अशोक चव्हाण गाडीत बसले. अब्दुल सत्तार यांचा भाजपतील संभाव्य प्रवेश, त्याचे जिल्ह्याच्या राजकारणावर होणारे परिणाम, त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेतील काँगेसचे किती सदस्य जाऊ शकतील, सत्तारांना भाजप प्रवेशासाठी होत असलेला विरोध, यावर ही चर्चा झाली असल्याचे समजते.जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या अधिकाधिक सदस्यांना रोखण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यादृष्टीने चव्हाण यांची आजची छोटेखानी भेट महत्त्वाची ठरणार आहे.कोणत्याही परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन आगामी विधानसभा निवडणुका न लढल्यास काही खरे नाही, असे मत अनेक पदाधिकारी विमातनळावर अशोक चव्हाण येण्यापूर्वी व्यक्त करीत होते. शिवाय राष्टÑवादी काँग्रेसचे इंदिरा काँग्रेसमध्ये लवकरात लवकर विलीनीकरण व्हावे, अन्यथा राष्टÑवादी काँग्रेसशी कायमची फारकत तरी घ्यावी, असेही मत काही पदाधिकारी व्यक्त करीत होते.नंतर चव्हाण कारने नांदेडकडे रवाना झाले. ते उद्या तिथे ईद मिलनच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारणcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण