शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

नाथाचरणी वारकरी रिता जाऊ नये; सेवाभावातून ३३ वर्षांपासून साबुदाणा खिचडीचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 7:24 PM

आज तब्बल १५ क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले

पैठण: आषाढी एकादशीला आलेल्या जवळपास पन्नास हजारांहून अधिक भाविकांना पैठणच्या संत एकनाथ सेवा संघाच्यावतीने साबुदाणा खिचडीचा प्रसाद आज वितरीत करण्यात आला. विशेष म्हणजे, संघाचे  मोफत खिचडी वाटप करण्याचे यंदाचे ३३ वे वर्ष आहे. आज तब्बल १५ क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आल्याने सुरेश शिंदे यांनी सांगितले. 

पंढरपूरनंतर वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेले एकमेव तिर्थक्षेत्र म्हणून पैठण आहे. वारकऱ्यांची संत एकनाथ महाराजावर मोठी श्रद्धा आहे. पंढरपूर प्रमाणेच दर एकादशीला वारकरी लाखोंच्या संख्येने पैठण येथे हजेरी लावतात. पांडुरंगाचे, नाथांचे भक्त असलेले वारकरी म्हणजे काबाडकष्ट करणारे शेतकरी, तुटपुंज्या आर्थिक परिस्थितीत ऊन, वारा, तहान भूक याची पर्वा न करता फक्त दर्शनाच्या ओढीने पैठण शहरात हजेरी लावतात. कपाळावर नाथांच्या पादुकेवरील बुक्का लावला की त्यांचे समाधान होते. मग प्रशासनाने काय सुविधा दिल्या, काय दिल्या नाहीत याचा साधा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. असेल तसे निभावून न्यायचे हीच समाधानी वृत्ती वारकरी संप्रदायाची चालत आली आहे. 

नाथांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्ताच्या मुखात प्रसाद रूपी दोन घास पडावे, नाथांच्या मंदीरातून कोणीही उपाशी जावू नये या विचाराने बबनराव उर्फ माऊली मडके, सुरेश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना झपाटून टाकले. सन १९९१ ला एकादशीला नाथमंदीरात साबुदाणा खिचडी करून वारकऱ्यांना मोफत वाटपाचा त्यांनी संकल्प केला. यासाठी दानशूर भक्तांची मदत घेण्यात आली. १९९१ ला एकादशीच्या दिवशी ५० किलोचा साबुदाणा आणून त्याची खिचडी प्रसाद म्हणून वाटला. ५० किलो पासून सुरू झालेला खिचडीचा प्रसाद पुढे २५ क्विंटल पर्यंत पोहचला. या उपक्रमाने ३३ वर्षाचा टप्पा ही पार केला. बबनराव उर्फ माऊली यांनी सुरू केलेल्या या उपक्रमात गेल्या २५ वर्षापासून सुरेश शिंदे, भाऊसाहेब चव्हाण, केशव भाग्यवंत सातत्याने योगदान देत आहेत. श्रमदानासाठी २५ वर्षाच्या काळात अनेक मान्यवरांनी आपली सेवा या उपक्रमासाठी अर्पित केली आहे. 

खिचडीसाठी भाविक भक्ताकडून दान दिले जाते. साबुदाणा, शेंगदाणे, तूप आदीसह भक्तदान आणून देतात. यातून ३३ वर्षापासून दर एकादशीला  खिचडी तयार करून वाटतो आहे. दान मिळो अगर न मिळो खिचडी वाटपात खंड करण्यात येत नाही, दर महिण्याच्या एकादशीला १० क्विंटल तर आषाढी व कार्तिकी एकादशीला २१ ते २५ क्विंटलपर्यंत साबुदाणा खिचडी तयार करावी लागते, असे माऊली मडके यांनी सांगितले. 

५० हजार भाविकांना वाटप आज जवळपास ५० हजार भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. गुरुवारी अंकुशराव काळे, कल्याण कोकणे, नारायणगाव भजणी मंडळ,  अरूण चव्हाण, सुरेश लिपाणे, भाऊसाहेब चव्हाण,  आदीसह अनेक सेवेकऱ्यांनी प्रसाद वाटप करण्यासाठी श्रमदान केले.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीAurangabadऔरंगाबाद