शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

पैठणमध्ये लाखो वारकऱ्यांचा विठ्ठल नामाचा गजर, दमदार पावसासाठी घातले साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 6:40 PM

जयघोषाने पैठण नगरी दुमदुमली; आषाढी एकादशीच्या पर्वावर पैठणला दिवसभरात तीन लाख भाविकांनी घेतले दर्शन

पैठण: आता कोठे धावे मन,  तुझे चरण देखिले आज || भाग गेला शीण गेला,  अवघा झाला आनंद ।! 

या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची प्रचिती गुरुवारी नाथनगरीत ठायीठायी येत होती.आषाढी एकादशीच्या पर्वावर देहभान विसरून मोठ्या श्रध्देने नाथांच्या समाधीवर डोके ठेवताना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील तृप्त भाव वातावरणातील चैतन्य व वारकरी संप्रदायाची थोरवी अधोरेखित करून जात होती. यंदा वारकऱ्यांनी आषाढी वारीला विक्रमी गर्दी केल्याने अवघी पैठण नगरी विठुनामाच्या गजराने आज दुमदुमून निघाली. 

देवशयनी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर  लाखो वारकरी व भाविकांनी पैठण येथे नाथ समाधीचे दर्शन घेत चांगला पाऊस पडू दे, बळिराजाची ईडा पिडा दूर होऊ दे असे साकडे नाथ महाराजा मार्फत पांडुरंगास घातले . वैष्णवांच्या गर्दिने पैठण शहर व गोदेचा काठ गुरुवारी गजबजून गेला, बघावे तिकडे हरिनामाचा गजर व विठ्ठल नामाचा जयघोष सुरू होता. दिवसभरात तीन लाखापेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले रात्री उशिरापर्यंत मंदीरा बाहेर दर्शनाची रांग कायम असल्याचे दिसून आले. 

आषाढी एकादशीला जे वारकरी भाविक पंढरपूर येथे जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेऊ शकत नाही वा पंढरपूरला जे जाऊ शकले नाही, असे वारकरी पैठण येथे येउन गोदावरीचे स्नान करून नाथांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतात. शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. यंदाही  लाखो भाविकांनी पैठण येथे हजेरी लावली. दर्शनासाठी तब्बल चार ते पाच तासाचा अवधी लागत होता.तहान भूक हरपून दर्शनाच्या ओढीने आलेल्या वारकऱ्यांचा उत्साह दिवसभर टिकून होता.

दुपारी आलेल्या पावसानेही भाविक विचलित झाले नाही. हातात टाळ घेऊन मृदंगाच्या तालावर नाचत, गर्जत, विठ्ठलनामाचा जयघोष करीत वारकरी पायी वाटचाल करत पैठण नगरीत दाखल होत होते. भजन गात, गर्जत, नाचत पैठण मधे आलेल्या वारकऱ्यांच्या दिंडया म्हणजे चैतन्याचा प्रवाह....या दिंडयांचे दर्शनही चित्त प्रसन्न करणारे असेच होते.  

आज पहाटे ३ वाजेपासून  पैठण शहरात वारकरी व भाविकांचे आगमन सुरू झाले, गळ्यात  माळ, डोक्यावर तुळशी वृंदावन, डोळ्यात पांडुरंगाच्या दर्शनाची आस, सोबत भानुदास एकनाथाचा जय घोष करत महिला वारकऱ्यांनी मोठ्या संखेने हजेरी लावली. टाळमृदंगाच्या गजरात हातात भगवा ध्वज घेऊन, माथ्यावर गोपीचंदनाचा टिळा लावलेले वारकरी मोठ्या जल्लोषात विठुरायाचा जयघोष करत होते. 

भाविक झाले व्याकुळ ! नाथ समाधी समोर दर्शन घेताना आज वारकरी मोठे भावूक झाल्याचे दिसून आले. पावसास उशीर झाल्याने खरिपाच्या पेरण्या रखडलेल्या आहेत. यामुळे काळजीत असलेल्या वारकऱ्यांनी " नाथबाबा चांगला पाऊस पडू द्या, आमच्या पांडुरंगाचे हात आभाळाला लावा" अशी समाधीसमोर व्याकुळ होत विनवणी केली, दिवसभर अनेक वारकऱ्यांनी ओल्या नजरेने आपले दु:ख नाथसमाधी समोर व्यक्त केले व मोठ्या समाधानाने पैठणचा निरोप घेतला. नामाच्या या गजराने पैठण नगरीत मंगलमय वातावरण झाले होते. आज आतिल व बाहेरील नाथमंदीरात भाविकांना दर्शन सुरळीत घेता यावे म्हणून नाथसंस्थानचे कार्यकारी विश्वस्त बारीक लक्ष ठेवून होते.  शिवाय पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, , सहायक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे, फौजदार सतिश भोसले, दशरथ बरकुल, सुधीर वाव्हळ, भगवान धांडे, मनोज वैद्य,  यांच्या मार्गदर्शनाखाली आतील व बाहेरील नाथमंदीरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

गोदावरीत पाणी सोडलेएकादशीसाठी जायकवाडी धरणातून गुरूवारी पहाटे ५२४ क्युसेक्स क्षमतेने पाणी सोडण्यात आले.भाविकांना स्नानासाठी गोदापात्रात शुध्द पाणी मिळाले. दुपारपर्यंत गोदावरीच्या विविध घाटावर भाविक व वारकऱ्यांनी गोदास्नानाचा आनंद घेतला.  

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीAurangabadऔरंगाबाद