शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

वंचित आघाडीला दिलेला ‘तलाक’नामा अधिकृत, असदुद्दीन ओवेसी यांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 3:08 AM

भविष्यात पुन्हा युती करण्याच्या मुद्द्यावर मात्र मौन

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीला ‘तलाक’ देण्याचा निर्णय मागील आठवड्यात एमआयएम पक्षाने घेतला. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पक्षाची भूमिका मांडली. ही भूमिका एकट्या जलील यांची नसून पक्षाची आहे, असे मत आज हैदराबाद येथे एका पत्रकार परिषदेत पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मांडले. भविष्यात पुन्हा वंचितसोबत युती होईल का? या थेट प्रश्नावर त्यांनी मौन बाळगणे पसंत केले.

शुक्रवारी खा. इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडीला एमआयएम ‘तलाक’ देत असल्याचे पत्रक काढले. एमआयएमला विधानसभा निवडणुकीत फक्त ८ जागा देण्यात येत आहेत. औरंगाबाद मध्य विधानसभा निवडणुकीतून पक्षाचा एक आमदार निवडून आलेला असताना, हा मतदारसंघ एमआयएम पक्षाला देण्यात आला नाही. त्यामुळे स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय आम्ही घेत असल्याचे पत्रात नमूद केले होते. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही जलील यांच्या तलाकनाम्याला महत्त्व न देण्याचे ठरविले. जोपर्यंत खा. असदुद्दीन ओवेसी अधिकृतपणे घोषणा करणार नाहीत, तोपर्यंत युती कायम असल्याचे त्यांनी नमूद केले होते. मंगळवारी एमआयएमच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती औरंगाबादेत घेण्याचे काम सुरू केले. पहिल्याच दिवशी नांदेड जिल्हा, नाशिक जिल्हा आणि पुण्यातील वडगाव शेरी विधानसभेसाठी मुलाखती घेण्यात आल्या.महाराष्ट्रातील निर्णय महाराष्ट्र युनिट घेणारहैदराबाद येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ओवेसी यांनी नमूद केले की, इम्तियाज जलील यांनी घेतलेला निर्णय ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे. महाराष्ट्रात किती जागा लढवायच्या, कोणत्या ठिकाणी लढवायच्या, याचा संपूर्ण निर्णय महाराष्ट्र युनिट घेणार आहे.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर