शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

रेल्वे रद्द होताच औरंगाबादहून मुंबईसाठी ट्रॅव्हल्सचे भाडे झाले विमान तिकिटाच्या निम्मे

By संतोष हिरेमठ | Updated: November 18, 2022 12:37 IST

प्रवाशांच्या खिशाला कात्री : १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान मुंबईचा प्रवास झाला महाग

औरंगाबाद : मध्य रेल्वेतील लाइन ब्लाॅकमुळे १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान नांदेड आणि मुंबईकडे जाणाऱ्या १२ रेल्वे रद्द झाल्या आहेत. रेल्वे रद्द होताच नेहमीप्रमाणे ट्रॅव्हल्सचालकांनी या तीन दिवसांत मुंबईच्या ट्रॅव्हल्सच्या भाड्यात मोठी वाढ केली आहे. १९ आणि २१ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद-मुंबई विमानाचा तिकीट दर ३ हजार ५६३ रुपये आहे. त्याच्या निम्मी रक्कम ट्रॅव्हल्सने मुंबई गाठताना प्रवाशांना मोजावी लागत आहे.

मुंबई आणि नांदेडला १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान रेल्वेने प्रवासाचे नियोजन केलेल्या प्रवाशांना आता विमान, ट्रॅव्हल्स, एसटी बसने प्रवास करावा लागणार आहे. काहींनी खासगी वाहनाने मुंबई गाठण्याची तयारीही केली आहे. रेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांची संख्या वाढल्याची संधी साधत अनेक ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकिटाच्या दरात मोठी वाढ केली आहे. ज्या ट्रॅव्हल्सचे भाडे १८ नोव्हेंबर रोजी १ हजार ९० रुपये, त्याच ट्रॅव्हल्स कंपनीने १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान १ हजार २६० ते १ हजार ४६० रुपयांपर्यंत भाडे वाढविले आहे. अशीच भाडेवाढ इतर ट्रॅव्हल्सने या तीन दिवसांदरम्यान केली आहे. त्यामुळे मुंबईचा प्रवास खिशाला कात्री लावणारा ठरत आहे.

कोणत्या रेल्वे रद्द?१९ नोव्हेंबर रोजी मुंबईकडे जाणारी तपोवन एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, २० नोव्हेंबर रोजी जनशताब्दी एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस आणि २१ नोव्हेंबर रोजी नंदीग्राम एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. याबरोबरच २० नोव्हेंबर रोजी मुंबईहून धावणारी तपोवन एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस आणि २१ नोव्हेंबर रोजी तपोवन एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

मुंबईच्या हवाई प्रवासाचे दरऔरंगाबाद मुंबईला जाण्यासाठी आजघडीला दोन विमाने उपलब्ध आहेत. १९ नोव्हेंबर रोजी एका विमानाचा तिकीट दर ३ हजार ५६३ आणि दुसऱ्या विमानाचा दर ७ हजार ३४३ रुपये आहे. रविवारी म्हणजे २० नोव्हेंबर रोजी एकच विमान उपलब्ध आहे. या दिवशी मुंबईच्या विमान प्रवासासाठी तब्बल ११ हजार ५४३ रुपये मोजावे लागणार आहेत.

एसटी सोडणार जादा बसरेल्वे रद्द असल्याच्या कालावधीत नांदेड आणि मुंबईसाठी एसटी महामंडळाने जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. प्रवाशांच्या गर्दीनुसार या बस सोडण्यात येतील, असे विभाग नियंत्रक अमोल अहिरे यांनी सांगितले.

शहरातून मुंबईसाठी धावणाऱ्या ट्रॅव्हल्स : ४८मुंबईचे ट्रॅव्हल्सचे भाडेदरतारीख - भाडे१८ नोव्हेंबर : ७०० ते १२९०१९ नोव्हेबर : १,२६० ते २,०६०२० नोव्हेंबर : १,५०० ते २,२००२१ नोव्हेंबर : १,०६० ते १,७१०(भाडे रुपयांमध्ये)

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादairplaneविमानrailwayरेल्वेtourismपर्यटन