शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

रेल्वे रद्द होताच औरंगाबादहून मुंबईसाठी ट्रॅव्हल्सचे भाडे झाले विमान तिकिटाच्या निम्मे

By संतोष हिरेमठ | Updated: November 18, 2022 12:37 IST

प्रवाशांच्या खिशाला कात्री : १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान मुंबईचा प्रवास झाला महाग

औरंगाबाद : मध्य रेल्वेतील लाइन ब्लाॅकमुळे १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान नांदेड आणि मुंबईकडे जाणाऱ्या १२ रेल्वे रद्द झाल्या आहेत. रेल्वे रद्द होताच नेहमीप्रमाणे ट्रॅव्हल्सचालकांनी या तीन दिवसांत मुंबईच्या ट्रॅव्हल्सच्या भाड्यात मोठी वाढ केली आहे. १९ आणि २१ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद-मुंबई विमानाचा तिकीट दर ३ हजार ५६३ रुपये आहे. त्याच्या निम्मी रक्कम ट्रॅव्हल्सने मुंबई गाठताना प्रवाशांना मोजावी लागत आहे.

मुंबई आणि नांदेडला १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान रेल्वेने प्रवासाचे नियोजन केलेल्या प्रवाशांना आता विमान, ट्रॅव्हल्स, एसटी बसने प्रवास करावा लागणार आहे. काहींनी खासगी वाहनाने मुंबई गाठण्याची तयारीही केली आहे. रेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांची संख्या वाढल्याची संधी साधत अनेक ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकिटाच्या दरात मोठी वाढ केली आहे. ज्या ट्रॅव्हल्सचे भाडे १८ नोव्हेंबर रोजी १ हजार ९० रुपये, त्याच ट्रॅव्हल्स कंपनीने १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान १ हजार २६० ते १ हजार ४६० रुपयांपर्यंत भाडे वाढविले आहे. अशीच भाडेवाढ इतर ट्रॅव्हल्सने या तीन दिवसांदरम्यान केली आहे. त्यामुळे मुंबईचा प्रवास खिशाला कात्री लावणारा ठरत आहे.

कोणत्या रेल्वे रद्द?१९ नोव्हेंबर रोजी मुंबईकडे जाणारी तपोवन एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, २० नोव्हेंबर रोजी जनशताब्दी एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस आणि २१ नोव्हेंबर रोजी नंदीग्राम एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. याबरोबरच २० नोव्हेंबर रोजी मुंबईहून धावणारी तपोवन एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस आणि २१ नोव्हेंबर रोजी तपोवन एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

मुंबईच्या हवाई प्रवासाचे दरऔरंगाबाद मुंबईला जाण्यासाठी आजघडीला दोन विमाने उपलब्ध आहेत. १९ नोव्हेंबर रोजी एका विमानाचा तिकीट दर ३ हजार ५६३ आणि दुसऱ्या विमानाचा दर ७ हजार ३४३ रुपये आहे. रविवारी म्हणजे २० नोव्हेंबर रोजी एकच विमान उपलब्ध आहे. या दिवशी मुंबईच्या विमान प्रवासासाठी तब्बल ११ हजार ५४३ रुपये मोजावे लागणार आहेत.

एसटी सोडणार जादा बसरेल्वे रद्द असल्याच्या कालावधीत नांदेड आणि मुंबईसाठी एसटी महामंडळाने जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. प्रवाशांच्या गर्दीनुसार या बस सोडण्यात येतील, असे विभाग नियंत्रक अमोल अहिरे यांनी सांगितले.

शहरातून मुंबईसाठी धावणाऱ्या ट्रॅव्हल्स : ४८मुंबईचे ट्रॅव्हल्सचे भाडेदरतारीख - भाडे१८ नोव्हेंबर : ७०० ते १२९०१९ नोव्हेबर : १,२६० ते २,०६०२० नोव्हेंबर : १,५०० ते २,२००२१ नोव्हेंबर : १,०६० ते १,७१०(भाडे रुपयांमध्ये)

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादairplaneविमानrailwayरेल्वेtourismपर्यटन