शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे विमान उडणार औरंगाबादेतून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 06:26 IST

३० कोटींची तरतूद : जुलै, आॅगस्टमध्ये होणार प्रयोग

औरंगाबाद : महाराष्ट्रात या वर्षी कमी-अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्यानंतर कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी राज्य शासनाने ३० कोटींची तरतूद केली आहे. वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीत या प्रयोगासाठी विमानाचे उड्डाण औरंगाबाद येथून करणयाचे निश्चित झाले आहे. जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यांत मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात कृत्रिम पाऊस पाडण्यात येईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी मागविण्यात आलेल्या निविदा १३ जून रोजी उघडण्यात येणार आहेत. १५ जून रोजी कंत्राटदार कंपनीचा निर्णय होईल. १ जुलैपर्यंत औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात सी-बॅण्ड डॉपलर व रडार दाखल होणे शक्य आहे. येथील विमानतळावरून प्रयोगासाठी विमान उडेल. राज्याच्या सर्व ठिकाणांवरून ४५० कि़ मी. च्या अंतरात औरंगाबाद मध्यवर्ती केंद्र आहे. त्यामुळे येथूनच प्रयोग होण्याची शक्यता आहे.२०१५ रोजी औरंगाबाद आणि २०१७ मध्ये सोलापूर येथून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे प्रयत्न झाले. मात्र, त्यातून फारसा लाभ झाला नव्हता. असे असतानाही या वेळी शासनाकडे काही हवामानतज्ज्ञांनी प्रयोगासाठी रेटा लावला होता. चार वर्षांपूर्वी केलेल्या प्रयोगातून १५ ते २० टक्के जास्तीचा पाऊस पडला होता, असा दावा मदत व पुनवर्सन विभागाने केला होता. या वर्षीदेखील कृत्रिम पावसाच्या प्रयोगामुळे ३० ते ४० टक्के पाऊस जास्तीचा पडेल, असा दावा करण्यात येत आहे.दरम्यान, राज्य आपत्कालीन विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या प्रकरणी जास्त माहिती देणे टाळले.पाणीपुरवठामंत्र्यांनी सांगितलेपाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री याबाबत सांगू शकतील. कृत्रिम पावसाचा प्रयोग करायचा आहे. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे प्रयोग होईल; पण कुठे, केव्हापासून सुरू होणार, हे माहिती नाही. मात्र, मंत्रिमंडळ बैठकीत प्रयोगासाठी २३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादWaterपाणी