शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

'क्षुल्लक वादातून झाली जाळपोळ,दगडफेक'; पोलीस आयुक्त निखील गुप्तांनी सांगितला घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 19:06 IST

या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात  400 ते 500 जणांवर दंगल घडवल्याप्रकर्णी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर: शहरातील किराडपुरा परिसरात बुधवारची रात्र आणि आजची पहाट यादरम्यान थरारक घटना घडल्या. समाजकंटकांनी केलेल्या दगडफेक, जाळपोळमुळे निर्माण झालेली तणावाची स्थिती पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नियंत्रणात आणले. याप्रकरणी तब्बल ५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या काळात नेमक काय झाले याबाबत पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी एका वृत्तवाहिनीस बोलताना माहिती दिली आहे. 

पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी सांगितले की, बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास किराडपुरा भागातील राम मंदिराजवळ तरूणांच्या दोन गटात किरकोळ भांडण झाले. त्यानंतर एका गटातील तरूण निघून गेले. मात्र काही वेळानंतर या ठिकाणी गर्दी जमा झाली. पोलिसांनी या गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या एक तासानंतर या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमा व्हायला सुरूवात झाली. त्यांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरूवात केली. पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र समाजकंटकांची संख्या जास्त असल्यामुळे पोलिसांना त्यांना थोपवणे  शक्य झाले नाही. घटनेची माहिती मिळताच माझ्यासह काही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आम्ही पोलिस बळाचा वापर करून तो जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. एक ते दीड तास हा प्रकार सुरू होता. जमावाने पोलिसांची आणि काही खासगी वाहने जाळली. पहाटे तीन-साडेतीन वाजेच्या सुमारास आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी ५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरूणांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या सर्वावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.

परिस्थिती जाणून कारवाई केली एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी घटनास्थळी पोलिस उशिरा पोहोचले असा आरोप केला आहे. यावर पोलिस आयुक्त गुप्ता म्हणाले, समाजकटकांनी किराडपुरा भागातील लाईट फोडल्यामुळे अंधार झाला होता. अशावेळी नेमकी परिस्थिती काय आहे ते समजून घेणे गरजेचे असते. त्यामुळे परिस्थिती समजून घेऊनच आम्ही कारवाई केली.

राडा प्रकरणी ५०० जणांवर गुन्हा दाखलक्षुल्लक वादाचे पर्यवसन पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत गेले. यात पोलिसांची वाहने, खाजगी वाहने जाळण्यात आली. १६ पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी आहेत. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात  400 ते 500 जणांवर दंगल घडवल्याप्रकर्णी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंगल घडवणे, खुनाचा प्रयत्न करणे, शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे या कलमाखाली गुन्हा दाखल 307, 353, 295, 332, 333, 143, 147, 148, 149, 153 या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसImtiaz Jalilइम्तियाज जलील