शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

४२६ कोटींच्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेस मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:30 IST

सुमारे ४२६.२६ कोटी रुपये खर्चाच्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेस (भाग-३) राज्य सरकारने मंजुरी दिली असून, त्यामुळे वार्षिक ५५ दलघमी पाण्याचा वापर होणार आहे. संपूर्णत: ठिबकद्वारे एकूण १० हजार हेक्टर सिंचन क्षेत्र व सुमारे ४० गावांना सिंचन पाण्याचा लाभ हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. या योजनेच्या सर्व्हेचे टेंडर फ्लोट झाले असून, कालच राज्य सरकारने शासन निर्णयही निर्गमित केला आहे. येत्या आॅगस्टमध्ये कामास प्रारंभ होईल व २०२१ पर्यंत काम पूर्ण होईल,

ठळक मुद्देप्रशांत बंब : गंगापूर तालुक्याचा पाणी प्रश्न सुटणार

औरंगाबाद : सुमारे ४२६.२६ कोटी रुपये खर्चाच्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेस (भाग-३) राज्य सरकारने मंजुरी दिली असून, त्यामुळे वार्षिक ५५ दलघमी पाण्याचा वापर होणार आहे. संपूर्णत: ठिबकद्वारे एकूण १० हजार हेक्टर सिंचन क्षेत्र व सुमारे ४० गावांना सिंचन पाण्याचा लाभ हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. या योजनेच्या सर्व्हेचे टेंडर फ्लोट झाले असून, कालच राज्य सरकारने शासन निर्णयही निर्गमित केला आहे. येत्या आॅगस्टमध्ये कामास प्रारंभ होईल व २०२१ पर्यंत काम पूर्ण होईल, अशी माहिती आज येथे एका पत्रपरिषदेत गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी दिली.त्यांनी सांगितले की, सिल्लेगाव, बुट्टेवाडगाव, वजनापूर, शेकटा, सिद्धनाथ वडगाव, गोळेगाव, शहापूर, घोडेगाव, खादगाव, गाजगाव, पळसगाव, कनकुरी, कोबापूर, बोरगाव, डोमेगाव, येसगाव, दिघी, काळेगाव, शिरोडी, मलकापूर, नरसापूर, भोयगाव, पेंडापूर व सारंगपूर या गावांना या योजनेचा फायदा होईल. जलआराखड्यानुसार प्रत्येक आमदाराने अशा योजना मंजूर करून घेतल्यास मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याचा वापर होऊ शकेल. दुर्दैवाने असे घडत नाही आणि मतदारही आपला दबाव मतदारांवर ठेवत नाही. लोकप्रतिनिधी लग्नसोहळ्याला व अंत्यसंस्काराला आला की, त्यातच जनता खुश राहते. विकास योजनांसाठी मतदारांचा लोकप्रतिनिधींवर दबाव आवश्यकच आहे.ब्रह्मगव्हाण योजनेसाठी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, राज्यपाल कार्यालय, वित्त विभाग व संबंधित मंत्री यांच्याकडे १८० बैठका झाल्या. २०१५ पासून पाठपुरावा सुरू केला होता. पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने योजनेच्या सर्वेक्षणासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सर्वेक्षण होताच पर्यावरण मान्यता घेतली जाईल, दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष कामास सुरुवात करून २०२१ अखेरीस योजना पूर्ण केली जाईल, अशीही माहिती आ. प्रशांत बंब यांनी यावेळी दिले. योजनेची सविस्तर माहितीही त्यांनी दिली. अर्थात, या योजनेचा फायदा खुलताबादला होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.वॉटरग्रीडमधून बऱ्याच योजना सुरू होतील, असे सांगून न्यायालयीन प्रक्रियेनंतर गंगापूर साखर कारखाना सुरू होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDamधरण