शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

दमणगंगा-गोदावरी प्रकल्पास मंजुरी; मराठवाड्याच्या नावाखाली नाशिकचे भलं करणारा निर्णय

By बापू सोळुंके | Updated: October 13, 2023 18:57 IST

दमणगंगा-वैतरणा-कदवा-गोदावरी या उपसा सिंचन योजनेतून नाशिक जिल्ह्याचे भलं होणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगतेनिमित्त १६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केलेल्या दमणगंगा-वैतरणा-कदवा-गोदावरी या उपसा सिंचन योजनेतून नाशिक जिल्ह्याचे भलं करणारा निर्णय घेतल्याची बाब समोर आली आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचा विरोध डावलून शासनाने हा निर्णय घेतल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून समजले.

राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत जलसंपदा विभागाच्या प्रलंबित विविध प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्यात आली. यासोबतच पश्चिम वाहिनी नद्यांतील वाहून जाणारे पाणीगोदावरी नदीद्वारे मराठवाड्याला देण्याच्या नावाखाली दमणगंगा-वैतरणा-कदवा-गोदावरी या उपसा सिंचन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पाच्या उद्देशिकेमध्येच या प्रकल्पाचे पाणी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील औद्याेगिक वसाहती आणि दुष्काळग्रस्त भागाला सिंचनासाठी पाणी देण्याचे नमूद करण्यात आले आहे. याविषयी वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, या प्रकल्पाद्वारे उपसा होणाऱ्या एकूण पाण्याच्या ८० टक्के पाणी नाशिक जिल्ह्याला दिले जाणार आहे. उर्वरित १० ते २० टक्केच पाणी मराठवाड्याला मिळणार आहे. यावरून मराठवाड्यासाठी झालेल्या बैठकीत नाशिकचे भले केल्याचे दिसून येते. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पाला जलसंपदाच्या मराठवाड्यातील अधिकाऱ्यांनी विरोध केला होता. मात्र, अधिकाऱ्यांचा विरोध न जुमानता शासनाने निर्णय घेतला आहे.

प्रकल्पाच्या मंजुरीला स्थगिती देण्याची शासनाकडे मागणीदुष्काळग्रस्त मराठवाड्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी पश्चिम वाहिन्या नद्यांचे वाहून जाणारे पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे मराठवाड्याकडे वळविण्याची घोषणा केली. या घोषणेचे स्वागतच आहे. परंतु, यासोबतच शासनाने दमणगंगा-वैतरणा-कदवा-गोदावरी या योजनेला मंजुरी दिली. यातून मराठवाड्याला पाणीच मिळणार नसेल तर या प्रकल्पाच्या मंजुरीला स्थगिती द्यावी, अशी मागणी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे निवृत्त कार्यकारी संचालक डॉ. शंकर नागरे यांनी शासनाला पत्र पाठवून केली आहे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाgodavariगोदावरीWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प