शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

ॲंटिजन तपासणी निष्प्रभ; आरटीपीसीआर बेस्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 17:11 IST

आरोग्य विभागाने मागील काही दिवसांमध्ये तपासण्यांची संख्या कमी केली.

ठळक मुद्देॲंटिजन : ८२ हजारांमध्ये फक्त ९८ बाधितआरटीपीसीआर : २८ हजारांमध्ये ६२६ बाधितजुलैमध्ये एकूण बाधित-४३३ऑगस्टमध्ये एकूण बाधित-२९१

औरंगाबाद : कोरोनाचा ( Corona Virus ) संसर्ग पूर्णपणे कमी झालाय असे आभासी चित्र निर्माण करण्यात आले आहे. शहरात ८० टक्के ॲंटिजन तपासण्या होत आहेत. त्यांचा निकाल ९९ टक्के नकारार्थी आहे. २० टक्के आरटीपीसीआर तपासण्यात होत असून, त्यात १० टक्क्यांहून अधिक रुग्ण बाधित आढळत आहेत.

प्रशासनाकडून (  Aurangabad Municipal Corporation ) आजही फेक ॲंटिजन ( Antigen Test ) तपासण्यांवर भर दिल्या जातोय. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेत संसर्ग अधिक ( Corona Third Wave ) वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ‘लोकमत’ने जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांच्या आकडेवारीची सखोल माहिती घेतली असता धक्कादायक चित्र समोर आले. बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांच्या तपासण्या जवळपास बंदच झाल्या आहेत.शहराचा पॉझिटिव्हिटी रेट अत्यंत कमी असल्याचे महापालिका प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात आले. आरोग्य विभागाने मागील काही दिवसांमध्ये तपासण्यांची संख्या कमी केली. ॲंटिजन तपासण्यांवर सर्वाधिक भर दिला. नागरिकांनी मागणी केली तरच आरटीपीआर तपासण्या होत आहेत. त्यामुळे बाधित रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत आहेत. ही दिशाभूल का? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.

जुलैमधील तपासण्याजुलै महिन्यात महापालिकेने शहरात ॲंटिजनच्या ३४ हजार ९४२ तपासण्या केल्या. त्यामध्ये शहरातील ४० बाहेरगावचे ९ असे एकूण ४९ बाधित रुग्ण आढळून आले. याच महिन्यात आरटीपीसीआर तपासण्या फक्त १३ हजार ८८ झाल्या. त्यामध्ये बाधित ३८४ आढळले. दोन्ही चाचण्यांचे मिळून एका महिन्यात ४३३ बाधित सापडले.

ऑगस्टमधील तपासण्या१ ते ३१ ऑगस्टपर्यंत ॲंटिजनच्या ४८ हजार २७ तपासण्या झाल्या. त्यात मनपा हद्दीतील ३० बाहेर आणि गावी राहणारे १९ बाधित आढळले. या महिन्यात आरटीपीसीआर तपासण्या १५ हजार ५३५ केल्या. त्यात तब्बल २४२ बाधित सापडले. या महिन्यातील बाधितांची संख्या २९१ पर्यंत पोहोचली.

बाधितांच्या नातेवाइकांची तपासणी शुन्यमहापालिका हद्दीत एखादा नागरिक कोरोना बाधित आढळल्यावर त्याच्या संपर्कातील हाय रिस्क, लो रिस्क लोकांच्या कोरोना तपासण्या करण्याचे काम मनपाच्या आरोग्य विभागाचे आहे. मागील काही महिन्यांपासून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ही पद्धतच बंद पडली आहे. ज्या भागात रुग्ण राहतात त्या वॉर्डाच्या मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयातून निरोप देण्यात येतो. वैद्यकीय अधिकारी रुग्णांच्या नातेवाइकांना जवळील तपासणी केंद्रावर जा तपासण्या करून घ्या, असे सांगतात. एकही नातेवाईक तपासणीसाठी पुढे येत नाही.

आता तपासणी संख्याच घटली१ सप्टेंबरपासून मनपाने ६१४ कंत्राटी कर्मचारी कमी केले. याचा परिणाम तपासण्यांवर दिसून येतो आहे. ३१ ऑगस्टपूर्वीपर्यंत शहरात दररोज साडेतीन हजार तपासण्या होत होत्या. आता ही संख्या अवघ्या २०० ते ३०० पर्यंत खाली आली. रेल्वेस्टशन, विमानतळ, विविध शासकीय कार्यालये, शहरात दाखल होणारे नागरिक आणि शहरात मोबाइल पथकांकडून तपासण्या करण्यात येतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCorona vaccineकोरोनाची लसAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका