शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पाणीपुरवठ्यासाठी आणखी एक प्रयोग; २ कोटी खर्च करून लहान-मोठे व्हॉल्व्ह बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 20:17 IST

शहरात येणारे पाणी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

औरंगाबाद : शहराच्या पाणीपुरवठ्यात मागील तीन महिन्यांपासून वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. एवढे करूनही प्रशासनाला पाहिजे तसे यश मिळालेले नाही. शहरात सर्वत्र आजही पाच दिवसांआड म्हणजेच सहाव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. आता जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत दोन्ही जलवाहिन्यांवरील मोठे तर शहरातील काही छोटे व्हॉल्व्ह बदलण्यात येणार आहेत. यासाठी कोलकाता येथून विशेष व्हॉल्व्हची ऑर्डर देण्यात आली असून, या कामावर तब्बल दोन कोटी रुपये खर्च होणार आहेत, विशेष.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहराच्या पाणीपुरवठ्यात लक्ष घातले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाणीप्रश्न सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठ्यात वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला दररोज नवीन नवीन आदेश प्राप्त होतात. त्यानुसार सध्या जलवाहिन्या टाकणे, व्हॉल्व्ह बदलणे आदी अनेक कामे सुरू आहेत. शहरात येणारे पाणी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये थोडासा दिलासा प्रशासनाला मिळाला. पाण्यात वाढ झालेली असतानाही शहरातील विविध वसाहतींना पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येताेय. जूनअखेरीस पाणीपुरवठा चार दिवसाआड करण्याचा दावा प्रशासनाने केला होता.

आता व्हॉल्व्ह बदलण्याचा प्रयोग केला जात असून, कोलकाता येथील आयबीएम कंपनीकडून व्हॉल्व्हची खरेदी करण्यात आली. यासाठी एक कोटी ७५ लाख रुपये खर्च होणार असून, ही रक्कम तातडीने कंपनीला देऊन जुलैच्या पहिल्या आठवड्यात व्हॉल्व्ह येणार आहेत. मुख्य पाइपलाइनवरील १५ मोठे व्हॉल्व्ह बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणी गळती रोखण्यास मदत होऊन पाइपलाइन दुरुस्तीसाठी लागणार वेळ वाचणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरात छोट्या जलवाहिन्यांवरील १०० व्हॉल्व्ह बदलण्यात येतील.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका