शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

शेतकऱ्यांवर आणखी एक संकट, रब्बीच्या तोंडावरच रासायनिक खते महागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 16:05 IST

शेतकऱ्यांचा पिकांचा खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ बिघडलेलाच

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट व्हावे, अशी केंद्र सरकारची इच्छा असली तरी प्रत्यक्षात मात्र पिकांवर जेवढा खर्च केला तो सुद्धा निघताना दिसत नाही. नैसर्गिक संकटातून मार्ग काढत शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली पण आता पोटॅशसह अन्य रासायनिक खते महागल्याने नवीन संकट आले आहे. मुळात रासायनिक खतातील भाववाढ आधीच झाली असली तरी आता खताची मात्रा देण्याची वेळ आल्याने भाववाढीचा विषय ‘ऐरणी’वर आला आहे.

संयुक्त खताच्या किमती कडाडल्यासंयुक्त खते जुने दर नवीन दर (५० किलो)१०:२६:२६ ११७५ रु १४७० रु१२:३२:१६ ११८५ रु १४८० रु२४:२४:०० १२१० रु १७०० रु१५:१५:१५ १०७० रु १३५० रुपोटॅश             ९०० रु १७८० रु

रब्बी हंगामात जिल्ह्यात पेरणी१,६४,६४२.९९ सरासरी हेक्टर क्षेत्र१,२६,४९८.१० प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र७०.७६ टक्के एकूण झालेली पेरणीकोणत्या पिकासाठी लागते खत : गहू, बाजरी, मका, कांदा

युरिया, डीएपी स्थिर अन्य खताचे काय ?रब्बी पिकांना आता खत देण्याची वेळ आली आहे. खताचे दर वाढल्याने नवीन संकट निर्माण झाले आहे. एकरी खताच्या २ बॅग लागतात तर युरियाच्याही २ बॅग अशा ४ बॅग लागतात. केंद्र सरकारने युरिया व डीएपी या खतासाठी सबसिडी दिली आहे. बाकींच्या खतांचे काय? त्यांचे दर वाढतच आहेत. एकीकडे पिकांना लागणारा खर्च वाढत आहे. दुसरीकडे बाजारात धान्याचे दर मात्र त्या तुलनेत वाढत नाहीत. हेच दुखणे आहे.- शिवाजी ढाकणे, शेतकरी, लिंगदरी

पोटॅश महागल्याचा परिणामपोटॅशच्या किमती महागल्याने संयुक्त खतांच्या किमती वाढल्या आहेत. तशी ही भाववाढ चार महिन्यांपूर्वीची आहे. मध्यंतरी खताचे भाव कमी झाले ते सध्या टिकून आहेत. पण मागील वर्षीच्या तुलनेत सध्याचा दर दुप्पटच आहे. आता ऐन पेरणी व खताची मात्रा देण्याच्या वेळेस ‘भाववाढ’चा मुद्दा ऐरणीवर आला आहे.- राकेश सोनी, अध्यक्ष, कृषी निविष्ठा विक्रेता संघटना

रासायनिक खते, कीटकनाशकावरील जीएसटी रद्द करारासायनिक खतांचे भाव प्रचंड वाढले आहेत तसेच कीटकनाशकाचे भावही २० ते ३० टक्क्यांनी वधारले आहेत. केंद्र सरकारने ही भाववाढ रोखण्यासाठी आणखी उपाययोजना करावी. त्यात कीटकनाशकावर १८ टक्के तर रासायनिक खतावरील ५ टक्के जीएसटी रद्द करावा.- जगन्नाथ काळे, राज्यध्यक्ष, माफदा.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद