शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

औरंगाबादेतील ऑक्सिजन निर्मिती प्लांट घोषणेपुरताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 3:19 AM

इतर जिल्ह्यांवर राहावे लागते अवलंबून

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, गंभीर रुग्णांची संख्या वाढली आहे. परिणामी,  ऑक्सिजनसाठी धावाधाव करावी लागत आहे. गतवर्षी लिक्विड ऑक्सिजन निर्मिती प्लांटची घोषणा करण्यात आली; परंतु वर्षभरातही औरंगाबादेत ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट उभा राहू शकला नाही. या प्लांटच्या उभारणीकडे दुर्लक्ष करून पुरवठादारांनाच एकप्रकारे ‘ऑक्सिजन’ पुरविले जात असल्याची टीका लोकप्रतिनिधींकडून होत आहे.   मराठवाड्यात गतवर्षी ऑक्सिजनच्या तुटवड्याला सामोरे जावे लागले. त्यामुळे औरंगाबादसह जालन्यात ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट उभारण्यात येईल, असे जाहीर करून त्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी उद्योजकांना आवाहनही केले. पुणे, रायगड, ठाणे, नागपूर या ठिकाणी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प असल्याने तेथून मराठवाड्यापर्यंत ऑक्सिजनच्या वाहतुकीत बराच वेळ जातो. त्यामुळे औरंगाबादच्या प्रकल्पातून महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ऑक्सिजन पुरवठा करणे शक्य होईल. १०० ते २०० मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन निर्मिती या प्रकल्पातून होईल, असे सांगण्यात आले. प्रकल्प उभारणाऱ्या काही उद्योजकांशी चर्चा करण्यात आली. त्यातील दोन उद्योजकांनी औरंगाबाद आणि जालन्याला पसंती दिली. तातडीने सर्व परवानग्या मिळाव्यात, अशी अट उद्योजकांनी टाकली; परंतु प्रत्यक्षात पुढे काही झाले नाही. घोषणा करणाऱ्या मंत्र्यांसह प्रशासनाला या प्लांटचा विसर पडला. रुग्णालयांत ऑक्सिजन टँक उभारण्यात येत आहे. त्यात पुरवठादारांकडून लिक्विड ऑक्सिजन पुरविण्याशिवाय काहीही केले जात नसल्याने ऑक्सिजनसाठी रुग्णांचा जीव जाण्याची वेळ ओढावत असल्याची ओरड होत आहे.    पालकमंत्री घोषणा करतात; परंतु त्यानंतरही प्लांट झालेला नाही. याला कोणीतरी जबाबदार आहे की नाही. जो ऑक्सिजन पुरवितो, त्याचे काही प्रेशर आहे का? हा प्लांट झाल्यास सर्व शासकीय रुग्णालयांना ऑक्सिजन पुरविता येईल. वाहतुकीत वेळ जाणार नाही. अधिक पैसेही मोजावे लागणार नाही.      - इम्तियाज जलील, खासदार