...तर रेल्वे स्थानकाजवळ उड्डाणपूल करणार

By Admin | Updated: November 18, 2015 00:36 IST2015-11-18T00:25:15+5:302015-11-18T00:36:59+5:30

जालना : रेल्वे स्थानकाजवळच असलेल्या रस्त्यावर रेल्वे गेटमुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. तसेच नागरिकांनाही रूळ ओलांडून जाताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

... and then fly over to the railway station | ...तर रेल्वे स्थानकाजवळ उड्डाणपूल करणार

...तर रेल्वे स्थानकाजवळ उड्डाणपूल करणार


जालना : रेल्वे स्थानकाजवळच असलेल्या रस्त्यावर रेल्वे गेटमुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. तसेच नागरिकांनाही रूळ ओलांडून जाताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी भूमीगत रस्ता करण्याची मागणी होत आहे. मात्र राज्य शासनाने जर निधी उपलब्ध करून दिल्यास या ठिकाणी उड्डाणपूल करण्यात येणार असून, त्यादृष्टीने रेल्वेने नियोजन केले असल्याची माहिती रेल्वेचे नांदेड विभागाचे विभागीय प्रबंधक अविशकुमार सिन्हा यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
जालना रेल्वे स्थानकातील विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी रेल्वेचे जनरल मॅनेजर गुप्ता हे ७ डिसेंबर रोजी जालना दौऱ्यावर येत आहे. त्याच्या दौऱ्यांच्या पूर्व तयारीसाठी सिन्हा मंगळवारी विशेष रेल्वेने जालन्यात आले होते. त्यांनी जालना रेल्वे स्थानकाची पाहणी केली. काही ठिकाणी अर्धवट कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच जालना स्थानकात बनविण्यात आलेले विश्रामगृह हे प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. रेल्वे स्थानकांच्या पाहणीनंतर ते पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, रेल्वेकडून प्रवाशांना अधिकाअधिक सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळेच नागरिक रेल्वेच्या प्रवासाला प्रथम पसंती देत आहे. याठिकाणी आरक्षणाची होणारी अडचन दूर करण्यात आली आहे. तसेच रेल्वे स्थानका जवळील गेट बंद करून त्याठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नवीन जालन्याकडील नागरिकांना पूर्वेकडील उड्डाणपुला जवळून स्थानकात येण्यासाठी रस्ता नसल्याने या संदर्भात ते म्हणाले की रेल्वेच्या हद्दीत रेल्वेकडून रस्ता तयार करून देण्यात येईल. मात्र रेल्वेच्या हद्दीबाहेरील रस्त्याचा मुद्दा समोर येत असल्याचे सांगितले.
मनमाड ते नांदेड दरम्यान रेल्वेला खटारे इंजिन देण्यात येत असल्याने ते वांरवार कुठेही बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आनुन दिले असता ते म्हणाले की, इंजिन खटारे वगैरे नसते. त्याची पूर्ण तपासणी केल्यानंतरच ते रेल्वेला जोडले जाते. त्यासाठी स्वतंत्र विभाग आहे. मागील १७ दिवसांपासून एकही इंजिन नांदुरूस्त झाल्याच्या घटना घडल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रेल्वे विभागीय बोर्डचे सल्लागार समितीचे जालन्याचे प्रतिनिधी अर्जुन गेही, प्रदीप मुथा, रेल्वे संघर्ष समितीचे ज्येष्ठ पदाधिकारी गणेशलाल चौधरी, रेल्वे विभागीय तांत्रिक अधिकारी राजकुमार वानखेडे, कमलाकर राव यांच्यासह रेल्वेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: ... and then fly over to the railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.