शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

...आणि आरटीओंना समजल्या अडचणी

By admin | Published: June 22, 2016 12:34 AM

औरंगाबाद : खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसचालकांच्या मनमानी कारभारामुळे अनेकदा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. परंतु अशा ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्याकडे आरटीओ प्रशासन साफ दुर्लक्ष करते

औरंगाबाद : खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसचालकांच्या मनमानी कारभारामुळे अनेकदा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. परंतु अशा ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्याकडे आरटीओ प्रशासन साफ दुर्लक्ष करते. मात्र, जेव्हा खुद्द आरटीओंनाही त्याचा फटका बसतो तेव्हा प्रवाशांच्या अडचणींची जाणीव होते. तेव्हा कुठे त्यांनी ट्रॅव्हल्सविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यासाठी पाऊल उचलले.अनेकदा ट्रॅव्हल्सच्या चालकांकडून मनमानी कारभार केला जातो. त्यातून प्रवाशांना नाहक गैरसोयीला सामोरे जावे लागते. एसी बंद करणे किंवा अचानक एसी वाढविणे, लघुशंका, इतर कारणासाठी बस न थांबविणे अशा समस्यांना अनेकदा प्रवाशांना सामोरे जावे लागते. या प्रकारांची ऐन प्रवासात तक्रार करावी कोठे, असा प्रश्न प्रवाशांसमोर असतो. आरटीओ कार्यालयाकडून खाजगी बसेसविरुद्ध कारवाईकडे दुर्लक्ष केले जाते. एका ट्रॅव्हल्समधून नुकतेच आरटीओंना चालकाच्या गैरवर्तनाचा अनुभव आला. मुंबई येथील बैठकीसाठी ते ट्रॅव्हल्स बसमधून निघाले होते. यावेळी काही प्रवाशांनी महत्त्वाच्या कामासाठी बस थांबविण्याची विनंती चालकाकडे केली. परंतु चालकाने दुर्लक्ष करून काही अंतरावर बस नेऊन थांबविली.प्रवाशांनी विनंती केल्यावरही बस का थांबविली नाही, याबाबत आरटीओंनी चालकाला विचारणा केली. त्यावेळी चालकाने थेट त्यांच्याशीही अरेरावी केली. मुंबईहून परत येताच त्यांनी प्रवाशांबरोबर गैरवर्तन केल्याची तक्रार नोंदवून संबंधित ट्रॅव्हल्सवर कारवाईचा बडगा उगारला.ट्रॅव्हल्समधून प्रवास करताना आलेल्या अनुभवानंतर आरटीओंना प्रवाशांच्या व्यथा कळाल्या. परंतु नियमितपणे कारवाई झाल्यास ट्रॅव्हल्सच्या मनमानी कारभारावर कायमचा चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.