पावसासाठी हनुमानाला केला जलाअभिषेक

By Admin | Updated: August 6, 2014 02:19 IST2014-08-06T01:15:30+5:302014-08-06T02:19:18+5:30

एकुर्का रोड : भगीरथाने महाकष्टाने पृथ्वीवर गंगा आणल्याचे पुराणात सांगितले जाते़ मात्र यंदाचा दुष्काळ संपून वरूणराजा प्रसन्न व्हावा म्हणून उदगीर

Anabhishek burnt to Hanuman for rain | पावसासाठी हनुमानाला केला जलाअभिषेक

पावसासाठी हनुमानाला केला जलाअभिषेक



एकुर्का रोड : भगीरथाने महाकष्टाने पृथ्वीवर गंगा आणल्याचे पुराणात सांगितले जाते़ मात्र यंदाचा दुष्काळ संपून वरूणराजा प्रसन्न व्हावा म्हणून उदगीर तालुक्यातील सुकणी येथील युवकांनी गंगाखेडपर्यंत ८५ किमीचे अंतर पदयात्राकाढून गोदावरी नदीच्या पाण्याने हनुमानाला अभिषेक केला़
सविस्तर वृत्त असे की, पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी अद्याप मोठा पाऊस झालेला नाही़ पूनर्वसू नक्षत्राच्या सुरूवातीला या भागात दोन मोठे सडाके (पाऊस) झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या हिंमतीने चाढ्यावर मुठ धरली़ नंतरच्या काळात पाऊस झाला नसल्याने कोवळी पिके मान टाकून देऊ लागली आहेत़ जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न भेडसाऊ लागला आहे़ ही परिस्थिती विदारक असल्याने उदगीर तालुक्यातील सुकणी गावातील २०-२५ युवक एकत्र येऊन वरूणराजाला प्रसन्न करण्यासाठी नदीच्या पाण्याने अभिषेक करण्याची संकल्पना मांडली़ शुक्रवारी संध्याकाळी गंगाखेड येथे ही मंडळी पोहचली़ रात्री १२ वाजून ५ मिनिटांनी तेथून नदीचे जल घेऊन ही मंडळी ८५ कि़मी़अंतर चालत जाण्याचा निर्णय घेतला़ खांद्यावर गंगाजल, हरिनामाचा गजर अन् टाळ मृदंगाच्यासाथीने ही मंडळी मजल दर मजल करीत सुकणी गावात शनिवारी सायंकाळी ६ वाजता दाखल झाल्याने गावच्या शिवारात या मंडळीचं मोठ्या मानाने ग्रामस्थांने स्वागत करून गावात वाजत गाजत आणले़ संध्याकाळी पूजा, होम हवन करून विधीव हनुमानाला जलाने अभिषेक करून पाऊस पडावा म्हणून साकडे घातले़ शेवटी परूचा (गावजेवनाचा) कार्यक्रम घेण्यात आला़ श्रावणातील पहिल्या सोमवारपासून गावातील सुर्यकांत सुकणे हे विणा घेऊन मंदिरात उभे आहेत़ जो पर्यंत पाऊस पडत नाही तो पर्यंत हा विणा घेऊन व एकवेळ जेऊन उपवास करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे़ हे विशेष़़़

Web Title: Anabhishek burnt to Hanuman for rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.