शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

एक अपघात अन् तीन मुली, तान्हुला झाला अनाथ; आजीने मदतीसाठी केली आर्जव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 19:50 IST

कारच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने चौघांच्या डोक्यावरील छत्र हरपले

- श्यामकुमार पुरेसिल्लोड (औरंगाबाद) : पडेगावजवळ  भरधाव वेगाने ओव्हरटेक करणाऱ्या एका कारने चिरडल्याने दुचाकीवरील पती-पत्नीचा रविवारी मृत्यू झाला. या एका अपघाताने ३ लहान मुली व एक ८ महिन्याचा तान्हुला अनाथ झाला आहे. कसे जगावे, पुढचे शिक्षण कसे करावे, असा प्रश्न या चिमुकल्या मुलींना पडला आहे. केवळ वृद्ध आजीची साथ या चौघांना आहे. हृद्यपिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे सिल्लोड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

रविवारी औरंगाबाद शहरात एका रुग्णालयात शस्त्रक्रिया झालेल्या काकाला भेटण्यास दुचाकीवर आलेला पुतण्या विष्णू त्र्यंबक वाघ ( ३८ ) आणि त्याची पत्नी सविता (३२) यांचा पडेगावजवळ अपघात झाला. यात पुतण्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीचा उपचारादरम्यान रविवारी रात्री मृत्यू झाला. या अपघातात ८ महिन्यांचा चिमुकला बचावला होता.मृतांवर सिल्लोड तालुक्यातील मुळगाव खुल्लोड येथे सोमवारी रात्री शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.

विष्णू वाघ हे कन्नड साखर कारखान्यात कामगार होते. कुटुंबातील कर्ते आई-वडील गेल्याने आता तीन मुली आणि ८ महिन्यांचा मुलगा अनाथ झाले आहेत. मुली दुसरी, चौथी आणि सहावीत शिक्षण घेतात. या चिमुकल्यांना आता केवळ वृद्ध आजीचा सहारा आहे. त्यांचे शिक्षण आणि उपजीविकेसाठी दानशुरांनी, सामाजिक संस्थानी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन आजीसह गावकऱ्यांनी केले आहे.

मदतीसाठी : विष्णू त्र्यंबक वाघ:स्टेट बँक ऑफ इंडिया: शाखा कन्नड आयएफएससी  कोड SBIN 0020011खाते क्रमांक 33266951641

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात