शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

जलस्वराज्यतील ‘त्या’ रकमेची वसुली होणार

By admin | Updated: September 20, 2014 00:03 IST

हिंगोली : जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जलस्वराज्य अभियानात अनेक गावांतील कामे अपूर्ण राहिली.

हिंगोली : जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जलस्वराज्य अभियानात अनेक गावांतील कामे अपूर्ण राहिली. शिवाय कामांच्या तपासणीत मूल्यांकनापेक्षा अधिक रक्कम समित्यांनी उचलली असल्याचे निदर्शनास आले होते. ती भरण्यास सांगूनही अनेकांनी त्यास प्रतिसाद दिला नसल्याने ही प्रकरणे आरआरसीकडे वर्ग करण्याची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे.जलस्वराज्य अभियान जवळपास दीडशे ते दोनशे गावांत राबविण्यात आले होेते. बोटावर मोजण्याइतक्याच गावांनी यात चांगले काम करून दाखविले. अनेक गावांमध्ये वाढीव अंदाजपत्रकांपासून ते निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यापर्यंत सर्वच बाबतीत खाबूगिरीचाच मार्ग अवलंबण्यात आला होता. त्यामुळे या योजनेत पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाकडे जाण्याचे प्रमाण कमी होते. अंतिम टप्प्यात केवळ दिखाव्यासाठी अनेक योजना पूर्ण झाल्याचे चित्र उभे केले गेले. काहीतर कागदावरच उभ्या राहिल्या. या एकंदर प्रकाराची चौकशी झाल्यानंतर अनेकांनी मूल्यांकनात आपले कसब दाखविले अन् कारवाईपासून बचाव केला. मात्र काहींना ते जमले नाही. त्यामुळे जिल्ह्यात एकूण १.१५ कोटी रुपयांची वसुली विविध पाणीपुरवठा समित्यांकडे निघाली होती. त्यापैकी ५९.७५ लाख रुपयांची वसुली अजूनही संबंधितांकडून होणे बाकी आहे. अशा ४३ गावांतील संबंधित यंत्रणेकडून वसुलीसाठी ही प्रकरणे आरआरसीकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे जि.प.चे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गंगाधर एंबडवार यांनी सांगितले. याबाबत नुकतीच जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांच्याकडे एक बैठक झाली होती. त्यात त्यांनी वरीलप्रकारच्या कारवाईचे निर्देश दिले आहेत.