शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

स्वच्छतागृह बांधकामाच्या हिशोबाला मनपाचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 13:17 IST

महापालिकेच्या शाळांमध्ये स्वच्छतागृहाअभावी मुलींची कुचंबणा थांबविण्यासाठी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने पुढाकार घेतला.

औरंगाबाद : महापालिकेच्या शाळांमध्ये स्वच्छतागृहाअभावी मुलींची कुचंबणा थांबविण्यासाठी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने पुढाकार घेतला. त्यासाठी ‘सीएसआर’मधून विमानतळाने ८५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. परंतु महापालिकेकडून हिशोबच मिळत नसल्याने योजना रद्द करण्याचा विचार विमानतळ प्राधिकरणाकडून सुरू आहे.

स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत देशभरात स्वच्छतागृहे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. शहरातील मनपा शाळांमधील स्वच्छतागृहांची दुरवस्था झालेली होती. ही बाब लक्ष देऊन दीड वर्षापूर्वी विमानतळाने मनपा शाळांमध्ये स्वच्छतागृह बांधून देण्याचा निर्णय घेतला. यासंबंधीचा एक प्रस्ताव प्राधिक रणाने मंजुरीसाठी मुख्यालयाला पाठविला होता. तेथून मंजुरी मिळताच मनपाला माहिती देण्यात आली. महापालिकेच्या जवळपास १९ शाळांमध्ये २७ स्वच्छतागृहे बांधण्याचे निश्चित करण्यात आले.

यासाठी विमानतळाने ८५ लाखांचा निधी टप्प्याटप्प्याने मनपाला देण्याचा निर्णय घेतला. सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार होते. काही स्वच्छतागृहे बांधली. परंतु काहींचे काम सुरू आहे तर काही अर्धवट आहे. याचा महापालिकेने हिशोबच प्राधिकरणाला दिला नाही, त्यामुळे निधीचे काय केले, याची माहिती देण्याची मागणी विमानतळ प्राधिकरणाने केली आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधी