शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महापालिकेने केले तब्बल ५१ वॉर्ड कचरामुक्त घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 13:49 IST

. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी ११५ पैकी ५१ वॉर्ड कचरामुक्त झाल्याची घोषणा केली.

औरंगाबाद : सुंदर शहर म्हणून इंदूर पाहण्यासाठी जाण्याची गरज नाही. ऐतिहासिक औरंगाबाद शहर कचरामुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी केले. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी ११५ पैकी ५१ वॉर्ड कचरामुक्त झाल्याची घोषणा केली. २०२० मध्ये संपूर्ण शहर कचरामुक्त होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त मनपातर्फे ‘माझा कचरा माझी जबाबदारी’या उपक्रमांतर्गत वॉर्डांमध्ये स्वच्छ सुंदर वॉर्ड स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत ५५ वॉर्डांनी सहभाग घेतला. यातील ५१ वॉर्ड कचरामुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले. सिडकोच्या संत तुकाराम नाट्यगृहात वॉर्ड स्पर्धेचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. अध्यक्षस्थानी महापौर नंदकुमार घोडेले, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर विजय औताडे, सभापती राजू वैद्य, विरोधी पक्षनेता जमीर कादरी उपस्थित होते. 

घोडेले म्हणाले की, कचरा प्रश्न एक संकट असले तरी यातून निश्चित मार्ग निघणार आहे. महापालिकेवर आर्थिक संकटही घोंगावत आहे. यातूनही मार्ग काढण्यात येत आहे. महापालिका दिवाळखोरीत अजिबात जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. कचरा टाकणाºाांना गांधीगिरी करून त्यांना गुलाबपुष्प देऊन  कचरामुक्तीमध्ये सहभागी करून घेतले जाईल. संपूर्ण शहर एप्रिल २०२० पर्यंत कचरामुक्त होईल, असे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले. प्रास्ताविक नंदकिशोर भोंबे यांनी केले, तर सूत्रसंचालन संदीप सोनार, ब-हाडकर यांनी केले. यावेळी मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी कचरामुक्तीसाठी भारूड सादर केले. पार्थ चांदोरकर याने एकपात्री अभिनय सादर केला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न