शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video 
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

अंबाजोगाईचे पाणी पळविले

By admin | Published: November 16, 2014 11:11 PM

अविनाश मुडेगावकर ,अंबाजोगाई शहरावर जलसंकट घोंगावत असताना शनिवारी रात्री धनेगाव धरणाच्या डाव्या कालव्यावरील चार बॅरेजेसमधील पाणी लातूरकडे सोडण्यात आले.

अविनाश मुडेगावकर ,अंबाजोगाईशहरावर जलसंकट घोंगावत असताना शनिवारी रात्री धनेगाव धरणाच्या डाव्या कालव्यावरील चार बॅरेजेसमधील पाणी लातूरकडे सोडण्यात आले. अंबाजोगाईचे पाणी पळविल्यामुळे संताप व्यक्त केला जात असून आता पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करण्याची वेळ येणार आहे.देवळा, अकोला, वांगदरी, कारसा पोहरेगाव येथील बॅरेजेसमधील पाणी सोडण्यात आले आहे. तब्बल १.८३ द.ल.घ.मि. पाणी सोडल्यामुळे अंबाजोगाईवरील जलसंकटात आता भरच पडणार असल्याचे चित्र आहे. या बॅरजेसमुळे साठविलेल्या पाण्यावर परिसरातील विहिरी व विंधन विहिरी सुस्थितीत चालत होत्या. टँकरद्वारे पाणीपुरवठा करणेही सुकर होते. मात्र आता पाणी सोडल्याने आगामी काळात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. सध्या नोव्हेंबर महिना सुरू आहे. आणखी अर्धा हिवाळा व संपूर्ण उन्हाळा बाकी आहे. अशा स्थितीत अंबाजोगाईकरांचे हक्काचे पाणी लातूरने पळविल्यामुळे शेतकऱ्यातही नाराजी आहे. बॅरेजेसमध्ये साठविलेल्या पाण्यामुळे गुरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न मार्गी लागला होता. आता पुन्हा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.मांजरा धरणाच्या उभारणीसाठी केज, अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. या धरणामुळे दोन्ही तालुके सिंचनाखाली येतील, अशी अपेक्षा होती. मात्र धरणातील पाणी लातूर जिल्ह्यासाठी आरक्षित केले जाते. जमिनी आमच्या अन् फायदा लातुरकरांना का? असा सवाल तडोळा येथील शेतकरी अशोक कदम यांनी उपस्थित केला. हक्काचे पाणी कोणी पळवत असेल ते कदापि सहन करणार नाही. अंबाजोगाईला आधी प्राधान्य द्यायला हवे होते. या घटनेचा आम्ही निषेध करतो. याबाबत शासन दरबारी दाद मागणार असल्याचे राकाँचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा म्हणाले.मांजरा धरण डावा कालव्याचे सहायक अभियंता उत्रेश्वर बिराजदार म्हणाले, कालव्यातील पाणी लातूर महापालिकेने पिण्यासाठी आरक्षित केले होते. लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ते सोडण्यात आले आहे. पाणी पळविले असे म्हणता येणार नाही.