शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूचा सापळा बनलेल्या पडेगाव रोडला नगर नाका-मिटमिट्यापर्यंत पर्यायी रस्ता उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 16:04 IST

पडेगावच्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण हलका करण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करणे अत्यावश्यक झाले आहे. मनपाने शंभर फूट रस्त्याचे उर्वरित भूसंपादन करून त्वरित कच्चा रस्ता तरी सुरू करायला हवा.

ठळक मुद्देबीड बायपासप्रमाणेच हा रस्ताही मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्याला शंभर फूट पर्यायी रस्ताही उपलब्ध आहे. महापालिकेने या रस्त्याचे ९० टक्के भूसंपादनही करून ठेवले आहे. सुरुवातीला रस्त्याचे मार्किंग करून मनपाने कच्चा रस्ता तयार केला तरी नागरिक त्याचा वापर करू शकतील.

औरंगाबाद : पडेगाव येथील अरुंद रस्त्यामुळे महिन्यातून एक किंवा दोन निष्पाप नागरिकांचे रक्त सांडत आहे. बीड बायपासप्रमाणेच हा रस्ताही मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्याला शंभर फूट पर्यायी रस्ताही उपलब्ध आहे. महापालिकेने या रस्त्याचे ९० टक्के भूसंपादनही करून ठेवले आहे. पडेगावच्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण हलका करण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करणे अत्यावश्यक झाले आहे. मनपाने शंभर फूट रस्त्याचे उर्वरित भूसंपादन करून त्वरित कच्चा रस्ता तरी सुरू करायला हवा.

मागील दहा वर्षांत नगर नाका ते मिटमिटापर्यंत अनेक नागरी वसाहती निर्माण झाल्या आहेत. दौलताबाद किल्ला, ऐतिहासिक खुलताबादनगरी, म्हैसमाळ, वेरूळ येथे जाणारे पर्यटक वैजापूर रोडचाच वापर करतात. याशिवाय बाहेरगावी जाणार्‍या वाहनधारकांची संख्या वेगळीच. अवघ्या ३० फुटांचा हा रस्ता आता वाहनधारकांना अपुरा पडतो. सकाळी आठ ते रात्री बारापर्यंत या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते. या रस्त्यावर दररोज एक तरी लहान-मोठा अपघात होतो. आतापर्यंत असंख्य निष्पाप नागरिकांचे जीव या रस्त्यावर गेले आहेत. पडेगाव येथील ख्रिश्चन समाजाच्या कब्रस्तानापासून पेट्रोलपंपापर्यंत दाट लोकवस्ती असल्याने दिवसभर रस्त्यावर वर्दळ असते. त्यात दुचाकी, चारचाकी आणि मोठ्या वाहनांना रस्ता ओलांडण्याची प्रचंड घाई झालेली असते.

गर्दीतून वाहनधारक अशा पद्धतीने पुढे जातात की, पाहणार्‍याचे मन हेलावून जाते. अनेकदा या रस्त्यावर वाहतुकीचा खेळखंडोबा होतो. दौलताबाद आणि खुलताबादकडे जाणारी वाहने अतिशय वेगाने ये-जा करतात. कुठेच गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने येतात. अचानक कोणी समोर आल्यास वाहनचालकाला ताबा मिळविणे अवघड असते. यातूनच अपघात होत आहेत. नगर नाका ते मिटमिटा हा रस्ता सध्या फक्त ३० फुटांचा असून, त्याला किमान शंभर फूट करणे गरजेचे आहे.

आराखड्यानुसार भूसंपादनमागील पाच ते सात वर्षांमध्ये महापालिकेने पडेगाव भागात सर्वाधिक टीडीआर दिले आहेत. २००२ च्या शहर विकास आराखड्यानुसार १०० फूट रुंद रस्त्यात ज्या नागरिकांची जमीन गेली त्यांनी टीडीआरच घेतले आहेत. ९० टक्के रस्त्याचे भूसंपादन झाले आहे. दहा टक्के भूसंपान केल्यास पडेगावला पर्यायी मार्ग तयार होऊ शकतो. सुरुवातीला रस्त्याचे मार्किंग करून मनपाने कच्चा रस्ता तयार केला तरी नागरिक त्याचा वापर करू शकतील.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबाद