शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मृत्यूचा सापळा बनलेल्या पडेगाव रोडला नगर नाका-मिटमिट्यापर्यंत पर्यायी रस्ता उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 16:04 IST

पडेगावच्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण हलका करण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करणे अत्यावश्यक झाले आहे. मनपाने शंभर फूट रस्त्याचे उर्वरित भूसंपादन करून त्वरित कच्चा रस्ता तरी सुरू करायला हवा.

ठळक मुद्देबीड बायपासप्रमाणेच हा रस्ताही मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्याला शंभर फूट पर्यायी रस्ताही उपलब्ध आहे. महापालिकेने या रस्त्याचे ९० टक्के भूसंपादनही करून ठेवले आहे. सुरुवातीला रस्त्याचे मार्किंग करून मनपाने कच्चा रस्ता तयार केला तरी नागरिक त्याचा वापर करू शकतील.

औरंगाबाद : पडेगाव येथील अरुंद रस्त्यामुळे महिन्यातून एक किंवा दोन निष्पाप नागरिकांचे रक्त सांडत आहे. बीड बायपासप्रमाणेच हा रस्ताही मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्याला शंभर फूट पर्यायी रस्ताही उपलब्ध आहे. महापालिकेने या रस्त्याचे ९० टक्के भूसंपादनही करून ठेवले आहे. पडेगावच्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण हलका करण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करणे अत्यावश्यक झाले आहे. मनपाने शंभर फूट रस्त्याचे उर्वरित भूसंपादन करून त्वरित कच्चा रस्ता तरी सुरू करायला हवा.

मागील दहा वर्षांत नगर नाका ते मिटमिटापर्यंत अनेक नागरी वसाहती निर्माण झाल्या आहेत. दौलताबाद किल्ला, ऐतिहासिक खुलताबादनगरी, म्हैसमाळ, वेरूळ येथे जाणारे पर्यटक वैजापूर रोडचाच वापर करतात. याशिवाय बाहेरगावी जाणार्‍या वाहनधारकांची संख्या वेगळीच. अवघ्या ३० फुटांचा हा रस्ता आता वाहनधारकांना अपुरा पडतो. सकाळी आठ ते रात्री बारापर्यंत या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते. या रस्त्यावर दररोज एक तरी लहान-मोठा अपघात होतो. आतापर्यंत असंख्य निष्पाप नागरिकांचे जीव या रस्त्यावर गेले आहेत. पडेगाव येथील ख्रिश्चन समाजाच्या कब्रस्तानापासून पेट्रोलपंपापर्यंत दाट लोकवस्ती असल्याने दिवसभर रस्त्यावर वर्दळ असते. त्यात दुचाकी, चारचाकी आणि मोठ्या वाहनांना रस्ता ओलांडण्याची प्रचंड घाई झालेली असते.

गर्दीतून वाहनधारक अशा पद्धतीने पुढे जातात की, पाहणार्‍याचे मन हेलावून जाते. अनेकदा या रस्त्यावर वाहतुकीचा खेळखंडोबा होतो. दौलताबाद आणि खुलताबादकडे जाणारी वाहने अतिशय वेगाने ये-जा करतात. कुठेच गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने येतात. अचानक कोणी समोर आल्यास वाहनचालकाला ताबा मिळविणे अवघड असते. यातूनच अपघात होत आहेत. नगर नाका ते मिटमिटा हा रस्ता सध्या फक्त ३० फुटांचा असून, त्याला किमान शंभर फूट करणे गरजेचे आहे.

आराखड्यानुसार भूसंपादनमागील पाच ते सात वर्षांमध्ये महापालिकेने पडेगाव भागात सर्वाधिक टीडीआर दिले आहेत. २००२ च्या शहर विकास आराखड्यानुसार १०० फूट रुंद रस्त्यात ज्या नागरिकांची जमीन गेली त्यांनी टीडीआरच घेतले आहेत. ९० टक्के रस्त्याचे भूसंपादन झाले आहे. दहा टक्के भूसंपान केल्यास पडेगावला पर्यायी मार्ग तयार होऊ शकतो. सुरुवातीला रस्त्याचे मार्किंग करून मनपाने कच्चा रस्ता तयार केला तरी नागरिक त्याचा वापर करू शकतील.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबाद