शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

साऱ्यांचे लक्ष क्रांती चौकाकडे; देशातील सर्वाधिक उंच शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण काही तासांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 16:25 IST

रात्री १०.३० ते ११.३० दरम्यान होणार देदीप्यमान साेहळा

औरंगाबाद : क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या २१ फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी रात्री १०.३० ते ११.३० दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन अनावरण केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा देशात हा सर्वाधिक उंच पुतळा असून चौथऱ्यासह पुतळ्याची उंची ५२ फूट एवढी आहे. अनावरणाच्या वेळेवरून आठवड्यापासून राजकीय वादंग उभे राहिले असले तरी रात्री १२ वाजेपर्यंत अनावरणाचा सोहळा चालणार आहे.

विद्युत रोषणाईने क्रांती चौकाचे सुशोभीकरण केले आहे. चौकात उड्डाणपुलाचे काम झाल्यानंतर शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याची मागणी शिवप्रेमींनी अनेक वर्षांपासून केली होती. त्यानुसार क्रांती चौकात ५२ फूट उंचीचा शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे ऑनलाइन सहभागी होतील. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रोहयाे मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रत्यक्ष उपस्थिती राहील. आरोग्यमंत्री राजेश टोपेदेखील कार्यक्रमाला येतील, असे मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले.

अनावरणाची वेळ बदलण्याची मागणीअनावरण रात्री १० वा. करण्यात यावे, अशी मागणी शिवजयंती उत्सव समितीने, मनसेने केली. तर भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी सायंकाळी ५ वा. अनावरण कार्यक्रम घेण्यासाठी गुरुवारी मनपा आयुक्तांना निवेदन दिले. तसेच गुरुवारी समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख आदींनी मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांची भेट घेत अनावरणाची वेळ बदलण्याची मागणी केली. त्यानंतर कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रशासक पांडेय यांनी सांगितले, नियोजित वेळेतच रात्री साडेदहा ते साडेअकरा दरम्यान अनावरण सोहळा पार पडेल.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली १२ वाजेपर्यंत परवानगीक्रांती चौकातील पुतळ्याचा अनावरण सोहळा रात्री १०.०० ते १२.०० वाजेदरम्यान चालणार आहे. या सोहळ्यासाठी वाद्य आणि साउंडला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी परवानगी दिली आहे. मनपा प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी विनंती केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष अधिकारातील तीन दिवसांपैकी १८ फेब्रुवारीला पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी रात्री १० ते १२ वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. या आदेशानुसार रात्री १२ नंतर मात्र कोणताही कार्यक्रम होणार नाही, असे आदेश प्रशासक पांडेय यांनी काढले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाChief Ministerमुख्यमंत्री