शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

साऱ्यांचे लक्ष क्रांती चौकाकडे; देशातील सर्वाधिक उंच शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण काही तासांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 16:25 IST

रात्री १०.३० ते ११.३० दरम्यान होणार देदीप्यमान साेहळा

औरंगाबाद : क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या २१ फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी रात्री १०.३० ते ११.३० दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन अनावरण केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा देशात हा सर्वाधिक उंच पुतळा असून चौथऱ्यासह पुतळ्याची उंची ५२ फूट एवढी आहे. अनावरणाच्या वेळेवरून आठवड्यापासून राजकीय वादंग उभे राहिले असले तरी रात्री १२ वाजेपर्यंत अनावरणाचा सोहळा चालणार आहे.

विद्युत रोषणाईने क्रांती चौकाचे सुशोभीकरण केले आहे. चौकात उड्डाणपुलाचे काम झाल्यानंतर शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याची मागणी शिवप्रेमींनी अनेक वर्षांपासून केली होती. त्यानुसार क्रांती चौकात ५२ फूट उंचीचा शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे ऑनलाइन सहभागी होतील. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रोहयाे मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रत्यक्ष उपस्थिती राहील. आरोग्यमंत्री राजेश टोपेदेखील कार्यक्रमाला येतील, असे मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले.

अनावरणाची वेळ बदलण्याची मागणीअनावरण रात्री १० वा. करण्यात यावे, अशी मागणी शिवजयंती उत्सव समितीने, मनसेने केली. तर भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी सायंकाळी ५ वा. अनावरण कार्यक्रम घेण्यासाठी गुरुवारी मनपा आयुक्तांना निवेदन दिले. तसेच गुरुवारी समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख आदींनी मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांची भेट घेत अनावरणाची वेळ बदलण्याची मागणी केली. त्यानंतर कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रशासक पांडेय यांनी सांगितले, नियोजित वेळेतच रात्री साडेदहा ते साडेअकरा दरम्यान अनावरण सोहळा पार पडेल.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली १२ वाजेपर्यंत परवानगीक्रांती चौकातील पुतळ्याचा अनावरण सोहळा रात्री १०.०० ते १२.०० वाजेदरम्यान चालणार आहे. या सोहळ्यासाठी वाद्य आणि साउंडला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी परवानगी दिली आहे. मनपा प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी विनंती केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष अधिकारातील तीन दिवसांपैकी १८ फेब्रुवारीला पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी रात्री १० ते १२ वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. या आदेशानुसार रात्री १२ नंतर मात्र कोणताही कार्यक्रम होणार नाही, असे आदेश प्रशासक पांडेय यांनी काढले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाChief Ministerमुख्यमंत्री