शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

चिंताजनक! दोन महिन्यांत वैजापूर तालुक्याची भूजलपातळी साडेतीन मीटरने घटली

By बापू सोळुंके | Updated: June 26, 2023 13:29 IST

गतवर्षीच्या अतिवृष्टीनंतरही चिंता; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची भूजलपातळी सरासरी ०.९१ मीटरने घटली

छत्रपती संभाजीनगर : गतवर्षी जिल्ह्यात १२४ टक्के मोसमी पाऊस पडला. या पावसानंतरही चार ते पाच वेळा अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला असतानाही मार्च महिन्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत संपूर्ण जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील भूजल पातळी सरासरी ०.९१ मीटरने घटली आहे. वैजापूर तालुक्यातील भूजलस्तर सर्वाधिक ३.५ मीटरने घटल्याचा धक्कादायक अहवाल आहे.

कडक उन्हामुळे जिल्ह्यातील लहान-मोठी आणि मध्यम धरणे तळ गाठत आहेत. या पार्श्वभूमीवर भूजल सर्वेक्षण विभागाकडून दरवर्षीप्रमाणे मार्च महिन्यानंतर मे महिन्यात जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये भूजल सर्वेक्षण करण्यात आले. गतवर्षी जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली होती. यंदा उन्हाळ्यात भूजल पातळी घटणार नाही, अशी अपेक्षा होती. परंतु भूजल सर्वेक्षण विभागाने मे महिन्यात केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच जिल्हा प्रशासनाला मिळाला. या अहवालानुसार मार्च महिन्याच्या तुलनेत जिल्ह्यातील ९ तालुक्यांची भूजलपातळी सरासरी ०.९१ मीटरने घटली. मार्च महिन्यात छत्रपती संभाजीनगरची भूजल पातळी ९.६५ मीटरवर होती. ही भूजल पातळी मे महिन्यात १०.१८ मी. खोलपर्यंत गेली. गंगापूर तालुक्यातील भूजल पातळी मार्च महिन्यात ११.८७ मीटरवर होती. ही मे महिन्यात १२.४७ मीटरपर्यंत खोल गेली. कन्नड तालुक्यात मार्च महिन्यात १२.५७ मीटर भूजलपातळी होती. ती मेमध्ये १३.१७ मीटरपर्यंत वाढली. खुलताबादचा १३ वरून भूजलस्तर १३.४३ मीटरवर गेला. पैठणची भूजलपातळी मार्च महिन्यात १२.६३ मीटर वर होती. ती १३.१२ मीटरपर्यंत घसरली आहे. मार्च महिन्यात फुलंब्री तालुक्याचा भूजलस्तर १०.३५ मीटर होता. तो ११.०४ मीटरपर्यंत खोल गेला आहे. सिल्लोड तालुक्याची भूजलपातळी १०.१५वरून १०.९८ मीटर झाली.

सर्वात चांगली भूजलपातळी सोयगावचीमार्च महिन्यात सोयगाव तालुक्यातील भूजलपातळी जिल्ह्यात सर्वात कमी ६.६७ मीटरवर होती. मे महिन्याच्या सर्वेक्षणानुसार ही पातळी ७.२५मीटर खोलपर्यंत गेली आहे.

सर्वात वाईट अवस्था वैजापूरचीकमी पर्जन्यमानाचा तालुका म्हणून ओळखला जाणाऱ्या वैजापूर तालुक्याची मार्च महिन्यात भूजलपातळी १०.४४ होती. दोन महिन्यात साडेतीन मीटर घट होऊन १३.९४ मीटर झाली.

जिल्ह्यातील ११० गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाईजिल्ह्यातील ११० गावांत पाणीटंचाई आहे. ३० गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. उर्वरित गावांची तहान भागविण्यासाठी १११ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सरासरीच्या ९७ टक्के पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. मृग नक्षत्र कोरडे गेले. २२ जूनपासून आर्द्राला प्रारंभ झाला तरी अद्याप मुसळधार पावसाला सुरुवात न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद