शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

चिंताजनक! दोन महिन्यांत वैजापूर तालुक्याची भूजलपातळी साडेतीन मीटरने घटली

By बापू सोळुंके | Updated: June 26, 2023 13:29 IST

गतवर्षीच्या अतिवृष्टीनंतरही चिंता; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची भूजलपातळी सरासरी ०.९१ मीटरने घटली

छत्रपती संभाजीनगर : गतवर्षी जिल्ह्यात १२४ टक्के मोसमी पाऊस पडला. या पावसानंतरही चार ते पाच वेळा अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला असतानाही मार्च महिन्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत संपूर्ण जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील भूजल पातळी सरासरी ०.९१ मीटरने घटली आहे. वैजापूर तालुक्यातील भूजलस्तर सर्वाधिक ३.५ मीटरने घटल्याचा धक्कादायक अहवाल आहे.

कडक उन्हामुळे जिल्ह्यातील लहान-मोठी आणि मध्यम धरणे तळ गाठत आहेत. या पार्श्वभूमीवर भूजल सर्वेक्षण विभागाकडून दरवर्षीप्रमाणे मार्च महिन्यानंतर मे महिन्यात जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये भूजल सर्वेक्षण करण्यात आले. गतवर्षी जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली होती. यंदा उन्हाळ्यात भूजल पातळी घटणार नाही, अशी अपेक्षा होती. परंतु भूजल सर्वेक्षण विभागाने मे महिन्यात केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच जिल्हा प्रशासनाला मिळाला. या अहवालानुसार मार्च महिन्याच्या तुलनेत जिल्ह्यातील ९ तालुक्यांची भूजलपातळी सरासरी ०.९१ मीटरने घटली. मार्च महिन्यात छत्रपती संभाजीनगरची भूजल पातळी ९.६५ मीटरवर होती. ही भूजल पातळी मे महिन्यात १०.१८ मी. खोलपर्यंत गेली. गंगापूर तालुक्यातील भूजल पातळी मार्च महिन्यात ११.८७ मीटरवर होती. ही मे महिन्यात १२.४७ मीटरपर्यंत खोल गेली. कन्नड तालुक्यात मार्च महिन्यात १२.५७ मीटर भूजलपातळी होती. ती मेमध्ये १३.१७ मीटरपर्यंत वाढली. खुलताबादचा १३ वरून भूजलस्तर १३.४३ मीटरवर गेला. पैठणची भूजलपातळी मार्च महिन्यात १२.६३ मीटर वर होती. ती १३.१२ मीटरपर्यंत घसरली आहे. मार्च महिन्यात फुलंब्री तालुक्याचा भूजलस्तर १०.३५ मीटर होता. तो ११.०४ मीटरपर्यंत खोल गेला आहे. सिल्लोड तालुक्याची भूजलपातळी १०.१५वरून १०.९८ मीटर झाली.

सर्वात चांगली भूजलपातळी सोयगावचीमार्च महिन्यात सोयगाव तालुक्यातील भूजलपातळी जिल्ह्यात सर्वात कमी ६.६७ मीटरवर होती. मे महिन्याच्या सर्वेक्षणानुसार ही पातळी ७.२५मीटर खोलपर्यंत गेली आहे.

सर्वात वाईट अवस्था वैजापूरचीकमी पर्जन्यमानाचा तालुका म्हणून ओळखला जाणाऱ्या वैजापूर तालुक्याची मार्च महिन्यात भूजलपातळी १०.४४ होती. दोन महिन्यात साडेतीन मीटर घट होऊन १३.९४ मीटर झाली.

जिल्ह्यातील ११० गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाईजिल्ह्यातील ११० गावांत पाणीटंचाई आहे. ३० गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. उर्वरित गावांची तहान भागविण्यासाठी १११ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सरासरीच्या ९७ टक्के पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. मृग नक्षत्र कोरडे गेले. २२ जूनपासून आर्द्राला प्रारंभ झाला तरी अद्याप मुसळधार पावसाला सुरुवात न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद