शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

'संविधानाला तिलांजली देण्याचे काम भाजपने केले'; अजित पवारांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 20:09 IST

'राज्यातील सरकार पाडण्याचे काम केले. असेच घडत राहिले, तर कोणत्याच राज्यात स्थिरता राहणार नाही.'

छत्रपती संभाजीनगर- आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीचे अनेक नेते उपस्थित आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्यातल्या सरकारवर सडकून टीका केली. तसेच, येणाऱ्या काळात अमरावती, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, पुण्यातही सभा होणार असल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणतात, येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी बळकट करण्यासाठी सगळेजण जीवाचं रान करतील, सगळे कार्यकर्ते यासाठी लढतील, त्याबद्दल मनात शंका नाही. आज ही वेळ का आली? बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. प्रबोधनकार ठाकरेंनी या संघटनेला नाव दिले आणि धनुष्यबाण सर्वदूर पसरवण्याचे काम केले. आम्ही अनेक वर्षांपासून राजकारणात आहोत, पण अशाप्रकारचा निर्णय कधीच ऐकला नाही. आम्ही संविधानासमोर नतमस्तक झालो. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा आदर केला पाहिजे. परंतू, याला तिलंजाली देण्याचे काम भाजपने केले आहे.

राज्यातील सरकार पाडण्याचे काम त्यांनी केले. हे असेच घडत राहिले, तर देशातल्या प्रत्येक राज्यात स्थिरता राहणार नाही. अशामुळे उद्योगधंडे येणार नाही. यातून लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार होणार नाही. प्रशासनालाही कोण कधी येईल, कोण कधी जाईल, याचा विश्वास नसेल तर प्रशासन चांगल्य पद्धतीने चालणार नाही. ज्याप्रकारचे एक गट बाजुला गेला आणि निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता दिली. अशाप्रकारे निर्णय दिला तर पुढे काय होणार. सुप्रीम कोर्टात हा निर्णय बाकी आहे. आमचा कोर्टावर विश्वास आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा