शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'संविधानाला तिलांजली देण्याचे काम भाजपने केले'; अजित पवारांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 20:09 IST

'राज्यातील सरकार पाडण्याचे काम केले. असेच घडत राहिले, तर कोणत्याच राज्यात स्थिरता राहणार नाही.'

छत्रपती संभाजीनगर- आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीचे अनेक नेते उपस्थित आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्यातल्या सरकारवर सडकून टीका केली. तसेच, येणाऱ्या काळात अमरावती, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, पुण्यातही सभा होणार असल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणतात, येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी बळकट करण्यासाठी सगळेजण जीवाचं रान करतील, सगळे कार्यकर्ते यासाठी लढतील, त्याबद्दल मनात शंका नाही. आज ही वेळ का आली? बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. प्रबोधनकार ठाकरेंनी या संघटनेला नाव दिले आणि धनुष्यबाण सर्वदूर पसरवण्याचे काम केले. आम्ही अनेक वर्षांपासून राजकारणात आहोत, पण अशाप्रकारचा निर्णय कधीच ऐकला नाही. आम्ही संविधानासमोर नतमस्तक झालो. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा आदर केला पाहिजे. परंतू, याला तिलंजाली देण्याचे काम भाजपने केले आहे.

राज्यातील सरकार पाडण्याचे काम त्यांनी केले. हे असेच घडत राहिले, तर देशातल्या प्रत्येक राज्यात स्थिरता राहणार नाही. अशामुळे उद्योगधंडे येणार नाही. यातून लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार होणार नाही. प्रशासनालाही कोण कधी येईल, कोण कधी जाईल, याचा विश्वास नसेल तर प्रशासन चांगल्य पद्धतीने चालणार नाही. ज्याप्रकारचे एक गट बाजुला गेला आणि निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता दिली. अशाप्रकारे निर्णय दिला तर पुढे काय होणार. सुप्रीम कोर्टात हा निर्णय बाकी आहे. आमचा कोर्टावर विश्वास आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा