शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

'स्मार्ट ग्राम'मध्ये स्थापन झालेली 'कृषी अवजारे बँक' अनेक शेतकऱ्यांना ठरतेय वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 5:56 PM

शेतकऱ्यांना सर्व प्रकाराची मशागतीची अवजारे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

ठळक मुद्देकन्हेरवाडीत सुरू झाली कृषी अवजारे बँक...ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम

- बालाजी आडसूळ कळंब (जि. उस्मानाबाद) : शेतकऱ्यांना मशागतीसाठी माफक दरात कृषी अवजारे उपलब्ध व्हावीत याकरीता स्मार्ट ग्राम कन्हेरवाडी ग्रामपंचायतने गावात अभिनव अशी ‘कृषी अवजारे बँक’ स्थापन केली आहे. या बँकेतून मल्चिंग यंत्रापासून ते कीटकनाशकांच्या फवारणीसाठीचे फवारे असे विविध साहित्य शेतकऱ्यांना मिळणार आहे.

तालुक्यातील कन्हेरवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामविकास समितीने मागील काही वर्षात गावातील भौतिक विकास व मानवी निर्देशांकात वृद्धी व्हावी यासाठी व्यापक काम केले आहे. यामुळेच गावातील नागरिकांसाठी ‘आदर्श’ ठरलेल्या या गावास राज्य शासनानेही ‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कार देवून गौरव केला आहे. गावातील रस्ते, शाळा, परिसर विकासात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून आदर्श गावाचा कित्ता गिरविणाऱ्या या गावाने आता कृषी विकासाकडेही जाणिवपूर्वक लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. याच संकल्पनेतून राज्यात आगळा वेगळा असा ‘कृषि अवजारे बँक’ स्थापन करण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला. याकामी ग्रामविकास समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. रामराजे जाधव, सरंपच वर्षा रामराजे जाधव, उपसरपंच मुंकूद मिटकरी व सर्व सदस्यांनी मूर्त स्वरूप देण्यासाठी पावले उचलली.

याकरिता ग्रामपंचायतला वित्त आयोगाच्या मिळणाऱ्या निधीचा सदुपयोग करण्याचा निर्णय झाला. यानुसार कृषी  उपजिविका अंतर्गत गावातील शेतकऱ्यांना सर्व प्रकाराची मशागतीची अवजारे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. गावातील मध्यम व अल्पभूधारक शेतकऱ्यांना पिकांवरील कीडरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  व अंतर्गत मशागतीसाठी अनेक कृषी अवजारांची गरज भासते. अशा शेतकऱ्यांना प्रगत तंत्राचा अवलंब करणं आर्थिकस्थितीमुळे शक्य नसतं. या शेतकऱ्यांना माफक दरात कृषी अवजारे उपलब्ध करून देण्यासाठी ग्रापने पुढाकार घेतला आहे.

विविध प्रकारच्या यंत्राचा समावेश...कन्हेरवाडी ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या कृषी अवजारे बँकेत शेतीच्या अंतर्गत मशागतीसाठी व कीडरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक विविध यंत्रसामुग्रीचा समावेश आहे. यात अत्याधुनिक बैल पेरणी यंत्र, भोद व मल्चिंग यंत्र, ३० केव्हीए क्षमतेचा व ३ पंप चालू शकतील असा अल्टरनेट डायनामा, तीर्री, पंजी, इंजिन, हात व बॅटरीवरील फवारे आदी साहित्य उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी नाममात्र भाडे आकारले जाणार आहे, असे अ‍ॅड. रामराजे जाधव यांनी सांगितले.

राज्यातील अभिनव उपक्रम....कन्हेरवाडी ग्रामपंचायतीने गावातील शेतकऱ्यांना सर्वप्रकारची कृषी अवजारे सहज उपलब्ध व्हावीत यासाठी सुरू केलेल्या ‘कृषी अवजारे बँके’ चा शुभारंभ नुकताच आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यांची प्रमूख उपस्थीती होती. अशा प्रकारचा राज्यातील पहिला उपक्रम असल्याचा ग्रामपंचायतीचा दावा आहे.

यापूवीर्ही राबवले आहेत विविध उपक्रम...कन्हेरवाडी ग्रापंने घर तिथे शौचालय, भूमिगत गटार, सोलार हाय मास्ट, सर्व एलईडी पथदिवे, इलर्निंग व डिजीटल शाळा तथा अंगणवाडी, गावाला शुद्ध व थंड पाणी, ठिबकवर जोपालेली वृक्षवल्ली, सॅनीटरी नॅपकीन वेंडीग मशीन असे विविध उपक्रम राबवून गावाला ‘आदर्श ग्राम’ अशी ओळख करून दिली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रOsmanabadउस्मानाबाद