शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बदली धोरणाविरुद्ध औरंगाबादेत शिक्षक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:19 IST

अन्यायकारक बदली धोरण दुरुस्तीसाठी राज्यभरातील शिक्षक आज औरंगाबाद शहरात एकवटले. रणरणत्या उन्हात या शिक्षकांनी जिल्हा परिषद कन्या प्रशालेपासून मोर्चा काढला आणि घोषणा देत विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला.

ठळक मुद्देरणरणत्या उन्हात मोर्चा : घोषणांनी दणाणले औरंगाबाद शहर

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अन्यायकारक बदली धोरण दुरुस्तीसाठी राज्यभरातील शिक्षक आज औरंगाबाद शहरात एकवटले. रणरणत्या उन्हात या शिक्षकांनी जिल्हा परिषद कन्या प्रशालेपासून मोर्चा काढला आणि घोषणा देत विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांनी डोक्यावर ‘२७/२ बदली धोरण विरोध, बदल्यांची खो-खो पद्धत बंद करा,’ अशा घोषणा लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या. शिक्षिकांचा लक्षणीय सहभाग हे या मोर्चाचे वैशिष्ट्य ठरले.विभागीय आयुक्त कार्यालयावर गेल्यानंतर मोर्चाचे जाहीर सभेत विसर्जन झाले. त्यात शिक्षकनेते संभाजीराव थोरात व प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्यासह अनेकांची घणाघाती भाषणे झाली. ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्या गावी परळीला हा मोर्चा निघणार होता; परंतु आचारसंहिता लागू झाल्यामुळे तो औरंगाबादला काढण्यात आला. या मोर्चाच्या अनुषंगाने व्हॉट्सअ‍ॅपवर उलटसुलट पोस्ट टाकून संभ्रम निर्माण करणाºयांविरुद्ध प्राथमिक शिक्षक संघातर्फे तालुकावार गुन्हा दाखल करण्याचे आदेश आजच्या सभेत देण्यात आले.शेख इसाक पटेल यांच्यावरील हल्ल्याचा निषेध .... चौकटप्राथमिक शिक्षक संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष शेख इसाक पटेल यांच्यावर काल रात्री हल्ला झाला. त्यात त्यांच्या हाताला मार लागला. औषधोपचार सोडून ते आज मोर्चात सहभागी झाले होते व त्यांनी सभेत भाषणही केले. हल्लेखोर कोण, याचा तपास लागला नसून यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली असून अशा हल्ल्यांना मी घाबरत नसल्याचे पटेल यांनी या सभेत ठणकावून सांगताच ‘भ्याड हल्ल्याचा निषेध असो, हल्लेखोरांना त्वरित अटक झालीच पाहिजे, अशा घोषणांनी विभागीय आयुक्त कार्यालयाचा परिसर दणाणला.प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष अंबादास वाजे, सरचिटणीस अप्पासाहेब कुल, कोषाध्यक्ष जनार्दन नऊगरे, एन.वाय. पाटील, विनोद राऊत, मधुकर वालतुरे, राजेश हिवाळे, अनुराधा ताकटे, रावसाहेब रोहकले, सिद्धेश्वर पुस्तके, गजानन पटोकार, मोहन भोसले, तात्यासाहेब मेघारे, राम लोहट, भक्तराज दिवाणे, तानजी खोत, आबा जगताप आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले.या मोर्चास केंद्रप्रमुख शिक्षक संघ, जि.प. कर्मचारी युनियन आदींनी पाठिंबा दिला होता. जिल्हाध्यक्ष काकासाहेब जगताप, कैलास गायकवाड, दिलीप साखळे, संजय भुमे, जे.के. चव्हाण, हारुण शेख, प्रशांत हिवर्डे, प्रवीण पांडे, संजय भडके, भास्कर चौधरी, नारायण साळुंके, संतोष ताठे,संजय भडके, भास्कर चौधरी, नारायण साळुंके, बाबासाहेब जाधव, राजेंद्र महाजन, ज्ञानेश सरोते, ईश्वर पवार, राहुल पवार, अशोक डोळस, राजेश पवार आदींनी या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.राज्याच्या सर्वच जिल्ह्यांतून मोर्चासाठी शिक्षक मागण्यांचे फलक घेऊन आले होते. शिक्षिकांनी स्कार्फ जवळ ठेवून उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. मोर्चेकºयांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जय भगवान महासंघातर्फे करण्यात आली होती. सभास्थळाच्या प्रवेशद्वारासमोर शहाजी नगरे यांनी आकर्षक रांगोळी काढली होती.धोरणात असा बदल असावा...प्रशासकीय बदल्या सेवाज्येष्ठतेनुसार १० टक्केच कराव्यात, विनंती बदल्यास टक्केवारी नसावी, संवर्ग १, २ व ३ च्या बदल्या करण्यास प्रथम प्राधान्य देऊन त्यांची सोय करावी, बदल्यांतील खो-खो पद्धत बंद करून कोणावरही अन्याय होणार नाही, असे धोरण असावे.बदलीसाठी जिल्ह्यातील सेवाज्येष्ठता ग्राह्य धरण्याऐवजी शाळेवरील सेवाज्येष्ठता ग्राह्य धरण्यात यावी, एकदा बदली झाल्यानंतर पुन्हा त्या शिक्षकाची पाच वर्षे प्रशासकीय कारणावरून बदली करण्यात येऊ नये, ३० कि.मी.बाहेरील पती-पत्नी एकत्र करताना ३० कि.मी.च्या आतील असणारास विभक्त करू नये.

टॅग्स :Morchaमोर्चाAurangabadऔरंगाबादTeacherशिक्षकTransferबदली