शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

बदली धोरणाविरुद्ध औरंगाबादेत शिक्षक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:19 IST

अन्यायकारक बदली धोरण दुरुस्तीसाठी राज्यभरातील शिक्षक आज औरंगाबाद शहरात एकवटले. रणरणत्या उन्हात या शिक्षकांनी जिल्हा परिषद कन्या प्रशालेपासून मोर्चा काढला आणि घोषणा देत विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला.

ठळक मुद्देरणरणत्या उन्हात मोर्चा : घोषणांनी दणाणले औरंगाबाद शहर

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अन्यायकारक बदली धोरण दुरुस्तीसाठी राज्यभरातील शिक्षक आज औरंगाबाद शहरात एकवटले. रणरणत्या उन्हात या शिक्षकांनी जिल्हा परिषद कन्या प्रशालेपासून मोर्चा काढला आणि घोषणा देत विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांनी डोक्यावर ‘२७/२ बदली धोरण विरोध, बदल्यांची खो-खो पद्धत बंद करा,’ अशा घोषणा लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या. शिक्षिकांचा लक्षणीय सहभाग हे या मोर्चाचे वैशिष्ट्य ठरले.विभागीय आयुक्त कार्यालयावर गेल्यानंतर मोर्चाचे जाहीर सभेत विसर्जन झाले. त्यात शिक्षकनेते संभाजीराव थोरात व प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्यासह अनेकांची घणाघाती भाषणे झाली. ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्या गावी परळीला हा मोर्चा निघणार होता; परंतु आचारसंहिता लागू झाल्यामुळे तो औरंगाबादला काढण्यात आला. या मोर्चाच्या अनुषंगाने व्हॉट्सअ‍ॅपवर उलटसुलट पोस्ट टाकून संभ्रम निर्माण करणाºयांविरुद्ध प्राथमिक शिक्षक संघातर्फे तालुकावार गुन्हा दाखल करण्याचे आदेश आजच्या सभेत देण्यात आले.शेख इसाक पटेल यांच्यावरील हल्ल्याचा निषेध .... चौकटप्राथमिक शिक्षक संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष शेख इसाक पटेल यांच्यावर काल रात्री हल्ला झाला. त्यात त्यांच्या हाताला मार लागला. औषधोपचार सोडून ते आज मोर्चात सहभागी झाले होते व त्यांनी सभेत भाषणही केले. हल्लेखोर कोण, याचा तपास लागला नसून यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली असून अशा हल्ल्यांना मी घाबरत नसल्याचे पटेल यांनी या सभेत ठणकावून सांगताच ‘भ्याड हल्ल्याचा निषेध असो, हल्लेखोरांना त्वरित अटक झालीच पाहिजे, अशा घोषणांनी विभागीय आयुक्त कार्यालयाचा परिसर दणाणला.प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष अंबादास वाजे, सरचिटणीस अप्पासाहेब कुल, कोषाध्यक्ष जनार्दन नऊगरे, एन.वाय. पाटील, विनोद राऊत, मधुकर वालतुरे, राजेश हिवाळे, अनुराधा ताकटे, रावसाहेब रोहकले, सिद्धेश्वर पुस्तके, गजानन पटोकार, मोहन भोसले, तात्यासाहेब मेघारे, राम लोहट, भक्तराज दिवाणे, तानजी खोत, आबा जगताप आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले.या मोर्चास केंद्रप्रमुख शिक्षक संघ, जि.प. कर्मचारी युनियन आदींनी पाठिंबा दिला होता. जिल्हाध्यक्ष काकासाहेब जगताप, कैलास गायकवाड, दिलीप साखळे, संजय भुमे, जे.के. चव्हाण, हारुण शेख, प्रशांत हिवर्डे, प्रवीण पांडे, संजय भडके, भास्कर चौधरी, नारायण साळुंके, संतोष ताठे,संजय भडके, भास्कर चौधरी, नारायण साळुंके, बाबासाहेब जाधव, राजेंद्र महाजन, ज्ञानेश सरोते, ईश्वर पवार, राहुल पवार, अशोक डोळस, राजेश पवार आदींनी या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.राज्याच्या सर्वच जिल्ह्यांतून मोर्चासाठी शिक्षक मागण्यांचे फलक घेऊन आले होते. शिक्षिकांनी स्कार्फ जवळ ठेवून उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. मोर्चेकºयांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जय भगवान महासंघातर्फे करण्यात आली होती. सभास्थळाच्या प्रवेशद्वारासमोर शहाजी नगरे यांनी आकर्षक रांगोळी काढली होती.धोरणात असा बदल असावा...प्रशासकीय बदल्या सेवाज्येष्ठतेनुसार १० टक्केच कराव्यात, विनंती बदल्यास टक्केवारी नसावी, संवर्ग १, २ व ३ च्या बदल्या करण्यास प्रथम प्राधान्य देऊन त्यांची सोय करावी, बदल्यांतील खो-खो पद्धत बंद करून कोणावरही अन्याय होणार नाही, असे धोरण असावे.बदलीसाठी जिल्ह्यातील सेवाज्येष्ठता ग्राह्य धरण्याऐवजी शाळेवरील सेवाज्येष्ठता ग्राह्य धरण्यात यावी, एकदा बदली झाल्यानंतर पुन्हा त्या शिक्षकाची पाच वर्षे प्रशासकीय कारणावरून बदली करण्यात येऊ नये, ३० कि.मी.बाहेरील पती-पत्नी एकत्र करताना ३० कि.मी.च्या आतील असणारास विभक्त करू नये.

टॅग्स :Morchaमोर्चाAurangabadऔरंगाबादTeacherशिक्षकTransferबदली