शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधी, तसेच समर्थनासाठी राज्यभरात मोर्चे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 06:09 IST

विविध संघटना सहभागी : तहसीलदारांना दिले निवेदन

औरंगाबाद : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात शुक्रवारीदेखील राज्यात विविध ठिकाणी मोर्चे निघाले. औरंगाबादमध्ये ४० विविध संघटनांनी काढलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. अहमदनगरमध्येदेखील भव्य मोर्चा काढण्यात आला. विदर्भात चंदपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे आणि यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीतही मोर्चे काढण्यात आले.

अहमदनगरमध्ये ‘नही चलेगा, नही चलेगा, सीएए, एनआरसी नही चलेगा..., इन्कलाब जिंदाबाद..., जोडो जोडो, भारत जोडो..., संविधान बचाओ, देश बचाओ... ’ अशा घोषणा देत मुस्लिम समाजासह इतर संघटनांनी तिरंगा ध्वज हातात घेत जनआक्रोश महामोर्चा काढून नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शविला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.कोठला स्टॅडपासून दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. कोठला स्टॅण्ड, जीपीओ चौकमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्यानंतर तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. शांतता व शिस्तबद्धता हे मोर्चाचे वैशिष्ट्य ठरले. राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला.

मोर्चात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी, मौलाना आझाद, डॉ़ ए़पी़जे़ अब्दुल कलाम या महापुरुषांच्या प्रतिमांसह तिरंगा ध्वज, भगवे ध्वज व निळे ध्वज घेऊन तरुण सहभागी झाले होते़ महापुरुषांच्या वेशात सहभागी झालेल्या लहान मुली व मुले मोर्चात लक्षवेधी ठरले़भद्रावती (जि. चंद्रपूर)येथील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्यावतीने शुक्रवारी भद्रनागस्वामी मंदिर पटांगण ते पेट्रोल पंप चौकापर्यंत नागरिकत्व कायद्याविरोधात संविधान बचाव रॅली काढली. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, भिम आर्मी, बिआरएसपी, बिएसपी, आरपीआय, भाकपा, राष्ट्रीय मुस्लिम समिती, आदिवासी समाज संघटना, शेतकरी संघटना, गोंडी धर्मीय आदिवासी एकता संघटना व विमुक्त जाती, जनजाती विकास परिषद व जमाते इस्लामी संघटनेचे पुरुष-महिला मोठ्या संख्येनी सहभागी झाले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलादारांना देण्यात आले.घाटंजी (यवतमाळ) येथील तालुका जन संघर्ष समितीतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. मोर्चात सर्वच स्तरातील लोकं सहभागी झाले.समर्थनार्थ फलटण, भिवंडी, फैजपूरला निघाले मोर्चेकेंद्र सरकारने केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ फलटणमध्ये प्रबोधन मंच आणि राष्ट्रप्रेमी देशभक्त विविध संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकर्त्यांना प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली.ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतही समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. खासदार कपिल पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मीरा- भार्इंदरमध्ये सावरकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला.जळगाव जिल्ह्यातील फैजपूर (ता. यावल) येथे राष्ट्रीय सुरक्षा मंच व शहरातील हिंदू संघटनांतर्फे रॅली काढण्यात आली.तरूणांनी हाती घेतलेल्या ७५ मीटर लांबीच्या तिरंग्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या मोर्चात अग्रस्थानी दिव्यांग सेनेचे पदाधिकारी, महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaharashtraमहाराष्ट्रcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकMumbaiमुंबई