शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

'उपलब्धता, साठवण, पुरवठा' पडताळणीनंतर औरंगाबादेत तीन दिवसांआड पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 13:27 IST

पडताळणीनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासकांनी दिली

औरंगाबाद : शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, त्यानुसार महापालिका उपाययोजना करीत आहे. पाण्याची उपलब्धता, साठवण क्षमता, पाणीपुरवठा वेळापत्रकाची तपासणी व पडताळणी करून खात्री पटल्यानंतरच त्यावर निर्णय होईल, असे मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.

हर्सूल जलशुद्धीकरण केंद्र ते दिल्ली गेटपर्यंत तलावातून पाणीपुरवठा सुरू आहे. जलवाहिनीची दुरुस्ती, संंच बांधणे, नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनीचे काम सुरू करणे, गळत्या शोधणे, व्हॉल्व्ह दुरुस्ती करून बदलणे, फारोळा जलशुद्धीकरण केंद्राची वाळू बदलणे, व्हॉल्व्ह नव्याने बसविणे, अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यासह इतर कामे हाती घेण्यात आली आहेत. सध्या चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे, असे चौधरी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

शहर पाणीपुरवठा योजनेतील जुनी ५६ मिमी व्यासाची जलवाहिनी बदलण्यासाठी १९३ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. प्रकल्प व्यवस्थापन समितीने तयार केलेल्या प्रकल्प आराखड्यास मान्यता दिली असून, आराखडा शासनाला सादर केला जाईल. एमजेपीकडून ती योजना राबविण्यात येणार आहे. याकरिता पूर्ण निधी शासनाकडून मिळावा, अशी मागणी केल्याचे चौधरी यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांना दिल्या आहेत सूचनाउच्च न्यायालयाने तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले असून, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. समितीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला जात आहे. अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा वेळापत्रकाची तपासणी आणि पडताळणी करून अहवाल देण्याची सूचना केली आहे. पडताळणीनंतर खात्री पटल्यानंतरच तीन दिवसांआड पाणीपुरवठ्याचा निर्णय होईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका