शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
2
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
3
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
6
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
7
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
8
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
9
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
10
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
11
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
12
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
13
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
14
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
16
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
17
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
18
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
19
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
20
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं

'उपलब्धता, साठवण, पुरवठा' पडताळणीनंतर औरंगाबादेत तीन दिवसांआड पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 13:27 IST

पडताळणीनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासकांनी दिली

औरंगाबाद : शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, त्यानुसार महापालिका उपाययोजना करीत आहे. पाण्याची उपलब्धता, साठवण क्षमता, पाणीपुरवठा वेळापत्रकाची तपासणी व पडताळणी करून खात्री पटल्यानंतरच त्यावर निर्णय होईल, असे मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.

हर्सूल जलशुद्धीकरण केंद्र ते दिल्ली गेटपर्यंत तलावातून पाणीपुरवठा सुरू आहे. जलवाहिनीची दुरुस्ती, संंच बांधणे, नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनीचे काम सुरू करणे, गळत्या शोधणे, व्हॉल्व्ह दुरुस्ती करून बदलणे, फारोळा जलशुद्धीकरण केंद्राची वाळू बदलणे, व्हॉल्व्ह नव्याने बसविणे, अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यासह इतर कामे हाती घेण्यात आली आहेत. सध्या चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे, असे चौधरी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

शहर पाणीपुरवठा योजनेतील जुनी ५६ मिमी व्यासाची जलवाहिनी बदलण्यासाठी १९३ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. प्रकल्प व्यवस्थापन समितीने तयार केलेल्या प्रकल्प आराखड्यास मान्यता दिली असून, आराखडा शासनाला सादर केला जाईल. एमजेपीकडून ती योजना राबविण्यात येणार आहे. याकरिता पूर्ण निधी शासनाकडून मिळावा, अशी मागणी केल्याचे चौधरी यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांना दिल्या आहेत सूचनाउच्च न्यायालयाने तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले असून, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. समितीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला जात आहे. अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा वेळापत्रकाची तपासणी आणि पडताळणी करून अहवाल देण्याची सूचना केली आहे. पडताळणीनंतर खात्री पटल्यानंतरच तीन दिवसांआड पाणीपुरवठ्याचा निर्णय होईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका