शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याची व्यथा! पत्नीनंतर पतीनेही टोकाचे पाऊल उचलत संपवले जीवन; चार मुले झाली पोरकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 12:22 IST

नैराश्य, आर्थिक विवंचनेतून शेतकरी पती-पत्नीचे टोकाचे पाऊल

- श्यामकुमार पुरेसिल्लोड ( औरंगाबाद) : आर्थिक विवंचना आणि नैराश्यातून पत्नीने सोमवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर कर्जबाजारीपणा आणि पत्नीच्या विरहातून बुधवारी पतीने देखील गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची हृदयद्रावक  घटना तालुक्यातील धावडा येथे घडली. या घटनेने गाव सुन्न झाले असून गावात शोककळा पसरली आहे. इतके टोकाचे पाऊल दोघांनी का उचलले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र यामुळे दोन मुले आणि दोन मुली पोरकी  झाली आहेत.

सुरेखा संतोष दळवी ( ४१) व संतोष किसन दळवी ( ४५ दोघे रा.धावडा) असे मृत पती- पत्नीचे नाव आहे. सुरेखाने दोन दिवसांपूर्वी २० फेब्रुवारी रोजी सकाळी स्वतः च्या शेतातील गट नं. १८ मध्ये विष प्राशन केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, बुधवारी सकाळी संतोष दळवी यांचा मृतदेह स्वतः च्या शेतातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांना ग्रामस्थांनी तातडीने सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथील डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले. बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास संतोष यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार करण्यात आले.

कर्जबाजारीपणामुळे टोकाचे पाऊलया कुटुंबांवर बँकेचे व बचत गटाचे कर्ज होते. तिन एकर शेती. मार्च महिना जवळ आला. शेती मालाला भाव नाही. अशात कर्ज कसे फेडायचे या विंवचनेत पती- पत्नी होते. या नैराश्यातून त्यांनी मृत्यूला कवटाळले, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. या घटनेची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.

मुल झाली पोरकीमयत पती- पत्नी पश्चात दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. एका मुलीच लग्न झालेले आहे. त्यांच्या आत्महत्येने ही मुल पोरकी झाली असून पंचक्रोशित हळहळ व्यक्त केली जात आहे. हे कुटुंब आर्थिक अडचणीत आहे. या कुटुंबाला आधाराची गरज असून यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने हातभार लावावा अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

अद्याप कारण स्पष्ट झाले नाहीदोघा पती पत्नीने आत्महत्या केली आहे मात्र त्यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले याची कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.पोलीस या घटनेचा तपास करत आहे.त्यांच्यावर कर्ज होते  नैराश्य व आर्थिक विवचनेतून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी प्राथमिक माहिती आहे तपासाअंती काय ते कळेल.- सीताराम मेहेत्रे पोलीस निरीक्षक सिल्लोड ग्रामीण.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfarmer suicideशेतकरी आत्महत्या