दुरुस्तीनंतर शहराचा पाणीपुरवठा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:14 IST2017-10-08T00:14:26+5:302017-10-08T00:14:26+5:30
जायकवाडी ते औरंगाबाद शहरापर्यंत जलवाहिन्यांची गळती दुरुस्त करणे, फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ ११ वर्षांनंतर काढणे आदी कामांसाठी महापालिकेने शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून शहराचा पाणीपुरवठा बंद केला होता.

दुरुस्तीनंतर शहराचा पाणीपुरवठा सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जायकवाडी ते औरंगाबाद शहरापर्यंत जलवाहिन्यांची गळती दुरुस्त करणे, फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ ११ वर्षांनंतर काढणे आदी कामांसाठी महापालिकेने शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून शहराचा पाणीपुरवठा बंद केला होता.
शनिवारी रात्री दुरुस्तीचे संपूर्ण काम संपल्यावर जायकवाडीतून पाण्याचा उपसा सुरू करण्यात आला. रात्रभरात शहरातील पाण्याच्या टाक्या भरून रविवारपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान तीन ते चार दिवस लागणार आहेत.
वीज वितरण कंपनीने शुक्रवारी सकाळी जायकवाडीत दोन ते तीन तासांमध्ये ३३ के.व्ही. लाईनवर दुरुस्तीचे काम पूर्ण केले. त्यानंतर महापालिकेने शहरासह जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत लहान मोठे लिकेज बंद केले. फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ मागील ११ वर्षांपासून काढला नव्हता. हा गाळ काढल्याने पाणी आणखी स्वच्छ दिसत आहे. शिवाय पाणीही जास्त क्षमतेने शहराकडे आणण्यात येत आहे. जायकवाडीत पाणी उपसा करणारा सहावा पंप अनेक वर्षांपासून बंद होता.
महापालिकेने तो पंपही शनिवारी सुरू केला. त्यामुळे शहराच्या पाण्यात थोडी वाढ होणार असल्याचे कार्यकारी अभियंता सरताजसिंह चहल यांनी सांगितले.