शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

लग्नानंतर म्हणे नवरी पसंत नाही; मुंबईच्या वऱ्हाडींना औरंगाबादकरांनी ‘फटके देऊन’ परत पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 14:34 IST

मुंबईच्या वऱ्हाडींना ‘फटके देऊन’ परत पाठवून देण्यात आले, रात्री साडेनऊ वाजता नवरीचा लागला दुसरा विवाह

औरंगाबाद : लग्नासाठी आलेल्या मुंबईच्या वऱ्हाडाने जेवणासह मानापमानामुळे वाद घातला. या विसंवादात लग्न लागले. लग्नानंतर नवरदेवाने मुलगी पसंत नसल्याचे कारण सांगत, नवरीला सोबत घेऊन जाण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या नातेवाइकांनी मुंबईच्या वऱ्हाडाला चांगलेच धुतले. गाड्या फोडून टाकल्या. फुटलेल्या गाड्या घेऊन नवरीविनाच वऱ्हाड मुंबईला निघून गेले. त्यानंतर मुलीचे नात्यातील मुलासोबत रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास लग्न लावून देण्यात आले. ही घटना शहराजवळील गांधेली गावात बुधवारी घडली.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील प्रभावती (नाव बदललेले) हिचा विवाह मुंबईतील अजय (नाव बदललेले) याच्यासोबत बुधवारी गांधेली येथे आयोजित केला होता. प्रभावतीचे मामा, बहीण गांधेली येथे राहत असल्यामुळे या ठिकाणी विवाह आयोजित केला होता. लग्नासाठी मुंबईहून ट्रॅव्हल्समध्ये नवरदेवाकडील वऱ्हाडी मंडळी आली. लग्न लागण्याच्या अगोदरच वऱ्हाडीतील अनेक जण दारू पिऊन ‘टुल्ल’ झाले. दुपारी साडेबारा वाजताचे लग्न तीन वाजले तरी लागले नव्हते. त्यापूर्वी काढलेल्या वरातीमध्ये वऱ्हाडी नाचत होते. त्यामुळे उशीर झाला. विनवण्या केल्यानंतर प्रभावतीसोबत लग्न लागले. त्यानंतर वऱ्हाडींनी जेवणावरून गोंधळ घातला. प्रभावतीच्या मेहुण्याने वराकडील मंडळींना ठरल्यानुसार पुरोहिताचे अर्धे पैसे देण्याची मागणी केली. तेव्हा चिडलेल्या वराच्या नातेवाइकांनी नवरीच्या मेहुण्याला मारहाण केली.

यावरून वाद विकोपाला गेला. मारहाणीत वधू पक्षाकडील दोन महिलाही जखमी झाल्या. दोघांची डोकी फुटली. वादात गावकऱ्यांनी मध्यस्थी केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिकलठाणा पोलीस ठाण्याचे हवालदार दिनकर पांढरे, सचिन रत्नपारखे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनाही वाद मिटल्याचे सांगितले. वऱ्हाड निघण्याच्या वेळेस नवरदेवाने नवरीच पसंत नसल्याचे सांगितले. तिला सोबत घेऊन जाणार नाही, असे सांगितले. त्यामुळे हादरलेल्या नवरीच्या नातेवाइकांनी मुंबईच्या वऱ्हाडींना बेदम मारहाण केली. त्यांच्या वाहनांच्या काचा फोडून सीट कव्हरही फाडले. नवरीच्या नातेवाइकांच्या दबावात ते नवरीला घेऊन गेलेही असते. मात्र अशा नवऱ्यासोबत नांदण्यास वधूनेच विरोध केला. त्यामुळे मुंबईच्या वऱ्हाडींना ‘फटके देऊन’ परत पाठवून देण्यात आले. या घटनेची चिकलठाणा ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

रात्री साडेनऊ वाजता लागला दुसरा विवाहप्रभावतीचा विवाह झाल्यानंतर मोडला. त्यामुळे नातेवाईक चिंतित होते. लगेच दुसरे लग्न लावण्यासाठी नातेवाईक मुलाचा शोध घेऊ लागले. लग्नाला वेगवेगळ्या ठिकाणांहून नातेवाईक आले होते. या नातेवाइकांतील वधूच्या आत्याच्या मुलासोबत रात्री साडेनऊ वाजता दुसरा विवाह लावून दिला गेला. यानंतर वधूच्या नातेवाइकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न