शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
4
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
5
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
6
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
7
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
9
Viral Video: लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
10
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
11
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
12
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम
13
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
14
पैशाचा खेळ! ऑनलाईन सेलचं धक्कादायक सत्य; घाईत महागड्या वस्तुंची खरेदी, बेस्ट डील कोणती?
15
GST कपात व्यतिरिक्त नवीन गाडी घेताना १५ हजारांची करा बचत! खरेदी करण्यापूर्वी वापरा 'या' ५ स्मार्ट टिप्स!
16
इस्रायलवर भारताचे मोठे उपकार! १०० वर्षांनी समोर आलं 'हाइफा' शहराच्या इतिहासातील सत्य, काय घडलं?
17
जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
18
कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
19
Rakhi Sawant : Video - "डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील, मी तान्या मित्तलपेक्षा श्रीमंत..."; राखी सावंतचा मोठा दावा
20
लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट

लग्नानंतर म्हणे नवरी पसंत नाही; मुंबईच्या वऱ्हाडींना औरंगाबादकरांनी ‘फटके देऊन’ परत पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 14:34 IST

मुंबईच्या वऱ्हाडींना ‘फटके देऊन’ परत पाठवून देण्यात आले, रात्री साडेनऊ वाजता नवरीचा लागला दुसरा विवाह

औरंगाबाद : लग्नासाठी आलेल्या मुंबईच्या वऱ्हाडाने जेवणासह मानापमानामुळे वाद घातला. या विसंवादात लग्न लागले. लग्नानंतर नवरदेवाने मुलगी पसंत नसल्याचे कारण सांगत, नवरीला सोबत घेऊन जाण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या नातेवाइकांनी मुंबईच्या वऱ्हाडाला चांगलेच धुतले. गाड्या फोडून टाकल्या. फुटलेल्या गाड्या घेऊन नवरीविनाच वऱ्हाड मुंबईला निघून गेले. त्यानंतर मुलीचे नात्यातील मुलासोबत रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास लग्न लावून देण्यात आले. ही घटना शहराजवळील गांधेली गावात बुधवारी घडली.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील प्रभावती (नाव बदललेले) हिचा विवाह मुंबईतील अजय (नाव बदललेले) याच्यासोबत बुधवारी गांधेली येथे आयोजित केला होता. प्रभावतीचे मामा, बहीण गांधेली येथे राहत असल्यामुळे या ठिकाणी विवाह आयोजित केला होता. लग्नासाठी मुंबईहून ट्रॅव्हल्समध्ये नवरदेवाकडील वऱ्हाडी मंडळी आली. लग्न लागण्याच्या अगोदरच वऱ्हाडीतील अनेक जण दारू पिऊन ‘टुल्ल’ झाले. दुपारी साडेबारा वाजताचे लग्न तीन वाजले तरी लागले नव्हते. त्यापूर्वी काढलेल्या वरातीमध्ये वऱ्हाडी नाचत होते. त्यामुळे उशीर झाला. विनवण्या केल्यानंतर प्रभावतीसोबत लग्न लागले. त्यानंतर वऱ्हाडींनी जेवणावरून गोंधळ घातला. प्रभावतीच्या मेहुण्याने वराकडील मंडळींना ठरल्यानुसार पुरोहिताचे अर्धे पैसे देण्याची मागणी केली. तेव्हा चिडलेल्या वराच्या नातेवाइकांनी नवरीच्या मेहुण्याला मारहाण केली.

यावरून वाद विकोपाला गेला. मारहाणीत वधू पक्षाकडील दोन महिलाही जखमी झाल्या. दोघांची डोकी फुटली. वादात गावकऱ्यांनी मध्यस्थी केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिकलठाणा पोलीस ठाण्याचे हवालदार दिनकर पांढरे, सचिन रत्नपारखे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनाही वाद मिटल्याचे सांगितले. वऱ्हाड निघण्याच्या वेळेस नवरदेवाने नवरीच पसंत नसल्याचे सांगितले. तिला सोबत घेऊन जाणार नाही, असे सांगितले. त्यामुळे हादरलेल्या नवरीच्या नातेवाइकांनी मुंबईच्या वऱ्हाडींना बेदम मारहाण केली. त्यांच्या वाहनांच्या काचा फोडून सीट कव्हरही फाडले. नवरीच्या नातेवाइकांच्या दबावात ते नवरीला घेऊन गेलेही असते. मात्र अशा नवऱ्यासोबत नांदण्यास वधूनेच विरोध केला. त्यामुळे मुंबईच्या वऱ्हाडींना ‘फटके देऊन’ परत पाठवून देण्यात आले. या घटनेची चिकलठाणा ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

रात्री साडेनऊ वाजता लागला दुसरा विवाहप्रभावतीचा विवाह झाल्यानंतर मोडला. त्यामुळे नातेवाईक चिंतित होते. लगेच दुसरे लग्न लावण्यासाठी नातेवाईक मुलाचा शोध घेऊ लागले. लग्नाला वेगवेगळ्या ठिकाणांहून नातेवाईक आले होते. या नातेवाइकांतील वधूच्या आत्याच्या मुलासोबत रात्री साडेनऊ वाजता दुसरा विवाह लावून दिला गेला. यानंतर वधूच्या नातेवाइकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न