शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

दीर्घ प्रतीक्षेनंतर छत्रपती संभाजीनगरकरांना मिळणार अतिरिक्त २६ एमएलडी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 16:15 IST

फारोळ्यातील नवीन जलशुद्धीकरण केंद्राची आजपासून चाचणी

छत्रपती संभाजीनगर : शहरात नागरिकांना आठ ते दहा दिवसांनंतर पाणी मिळत आहे. पाणीपुरवठ्याचे दिवस कमी व्हावेत म्हणून २०० कोटी रुपये खर्च करून ९०० मिमी व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी मागील वर्षी टाकली. मात्र, यासाठी लागणारे जलशुद्धीकरण केंद्रच उभारले नव्हते. नुकतेच जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले. बुधवार, दि. ६ ऑगस्टपासून जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी घेण्यात येणार आहे. लवकरच शहराला अतिरिक्त २६ एमएलडी वाढीव पाणी मिळेल. दहा दिवसाला मिळणारे पाणी किमान पाचव्या किंवा सहाव्या दिवशी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

२७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या कामाला विलंब होत असल्याने मागील वर्षी युद्धपातळीवर ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी जायकवाडी ते नक्षत्रवाडी पंप हाऊसपर्यंत टाकण्यात आली. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला (मजीप्रा) जलवाहिनीसह २६ एमएलडी क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा विसर पडला होता. अलीकडेच याचे काम पूर्ण केले. फारोळा येथील नवीन आणि जुन्या जलशुद्धीकरण केंद्राला जोडणी देण्यात आली. सोमवारी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी घेण्यात आले. बुधवारपासून चाचणी सुरू होईल. त्यात काही त्रुटी असतील तर लगेचच दुरुस्त केल्या जातील, अशी माहिती मजीप्रातर्फे देण्यात आली. किमान आठ दिवस तरी टेस्टिंग सुरू राहील. त्यानंतर शुद्ध केलेले पाणी शहराला मिळेल.

२६ एमएलडी पाणी वाढेलसध्या शहराला ७००, ९०० आणि १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांद्वारे १४० एमएलडी पाणी मिळत आहे. नवीन जलशुद्धीकरण केंद्रामुळे त्यात २६ एमएलडी पाण्याची वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. १६० ते १६५ एमएलडी पाणी दररोज शहराला मिळाले, तर दहा दिवसाने येणारे पाणी किमान पाचव्या किंवा सहाव्या दिवशी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहराला सध्या २५० एमएलडी पाण्याची गरज आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणी