शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही सोयगाव तालुक्यातील २२ गावांना लालपरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 15:39 IST

अद्याप बस पोहोचली नसल्याने ग्रामस्थांचे हाल

ठळक मुद्देवृद्ध, महिला व रुग्णांचे हाल

सोयगाव (औरंगाबाद ) : देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा दावा नेहमी केला जातो. मात्र, देशात अजूनही अशी अनेक खेडी आहेत जिथे पायाभूत सुविधाही सरकारला पोहोचविता आलेल्या नाहीत. याचेच एक उदाहरण म्हणजे सोयगाव तालुक्यातील २२ गावांमध्ये स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही महामंडळाची बस पोहोचू शकली नाही. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा त्रास सहन करावा लागत आहे. 

महाराष्ट्र हे  देशात प्रगतिपथावर असलेले राज्य म्हणून ओळखले जाते. या राज्यातच अशी परिस्थिती असणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. माजी केंद्रीय मंत्री कै. बाबूरावजी काळे यांनी आदिवासीबहुल सोयगावला तालुका करण्याच्या मागणीसोबतच येथे बस आगार उभारण्याचीही मागणी लावून धरली होती. यानंतर मागणीने जोर धरून सोयगावला तालुक्याचा दर्जा मिळाला. तर वीस वर्षांपूर्वी येथे बस आगारही झाले. मात्र, अद्यापही तालुक्यातील २२ गावांमध्ये महामंडळाची बस पोहोचू शकली नाही. त्यामुळे अनेकांना पायी किंवा खाजगी वाहनांद्वारे प्रवास करावा लागतो. यात तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या गोंदेगावलाही तालुका आगाराची बससेवा मिळालेली नाही. तसेच सावळदबारा भागातील ८ खेड्यांमध्ये बससेवा पोहोचली नाही. बनोटी परिसरातील अनेक गावांची हीच अवस्था आहे. त्यामुळे या गावांमध्ये बससेवेसह प्राथमिक सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

वृद्ध, महिला व रुग्णांचे हाल२२ गावांमध्ये बस जात नसल्याने याचा सर्वाधिक फटका वृद्ध, महिला व रुग्णांना सहन करावा लागतो. वृद्धांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो किंवा पायपीट करावी लागते. खाजगी वाहनधारकांकडूनही प्रवाशांची लूट होत असते.  

तालुक्यातील प्रमुख गावांना एसटीचे दर्शनच नाहीतालुक्यातील काळदरी, वरठाण, पळाशी, वाडी, माळेगाव, पिंप्री, दस्तापूर, रावेरी, चारूतांडा, उपलखेडा ही तालुक्यातील प्रमुख १० गावे असून, या गावांत अद्यापही महामंडळाची बस फिरकलीच नाही. येथील ग्रामस्थांना तब्बल आठ ते दहा कि़मी. प्रवास करून बस गाठावी लागते. यामुळे या गावांतील विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिक्षणासाठी पायपीट करूनच शाळा गाठावी लागते.

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीhospitalहॉस्पिटल