शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

५० वर्षांनंतर बनले विद्यापीठाचे परिनियम; प्राध्यापक, कर्मचाऱ्यांसाठी कारवाईसाठी ठरले नियम

By राम शिनगारे | Updated: November 12, 2024 19:38 IST

१९७४ च्या विद्यापीठ कायद्यानुसार वर्ष १९७६-७७ मध्ये परिनियम बनविले होते. त्यानंतर १९९४, २०१६ मध्ये नवीन कायदे अस्तित्वात आले.

- राम शिनगारेछत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार विद्यापीठ, महाविद्यालयांतील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या सेवा शिस्त, किरकोळ व वैद्यकीय रजा, चौकशी, निलंबन आदींविषयी निर्णय घेण्यासाठी सामाईक परिनियम (कॉमन स्टॅट्युट) बनविण्यात आले आहेत. १९७४ च्या विद्यापीठ कायद्यानुसार वर्ष १९७६-७७ मध्ये परिनियम बनविले होते. त्यानंतर १९९४, २०१६ मध्ये नवीन कायदे अस्तित्वात आले. मात्र, परिनियम काही तयार झाले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ नुसारच कामकाज करण्यात येत होते. आता ५० वर्षांनंतर नवीन परिनियमामुळे ते थांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र सार्वजिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ७२(२) मध्ये व्यवस्थापन परिषदेस परिनियम समिती गठित करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी नवीन परिनियम बनविण्यासाठी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अंकुश कदम यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. त्यात व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. व्यंकटेश लांब, अधिष्ठाता डॉ. एम. डी. शिरसाट, अधिसभा सदस्य डॉ. विक्रम खिलारे, प्राचार्य डॉ. नवनाथ आघाव, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर आणि सदस्य सचिव म्हणून विधि अधिकारी डॉ. आनंद देशमुख यांचा समावेश होता. या समितीने सहा बैठका घेत नवीन परिनियम तयार केले. त्यामध्ये प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या संबंधित प्रत्येक बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे मनमानी पद्धतीने काम करणाऱ्या संस्थाचालकांना चांगलाच चाप बसणार आहे. नियमबाह्यपणे निलंबित करण्याचे प्रकारही यापुढे कमी घडतील, असा दावा समिती सदस्यांनी केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत सूचना मागवल्यापरिनिय समितीने तयार केलेले स्टॅट्युटच्या संदर्भात १७ नोव्हेंबरपर्यंत बदल करण्यासाठी सूचना मागविण्यात आल्या आहेत. आलेल्या सूचनांचा विचार करून समिती स्टॅट्युटला मूर्त स्वरूप देईल. त्यानंतर ते मंजुरीसाठी व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवण्यात येतील. तेथे मंजुरी मिळाल्यानंतर अधिसभेत जाईल. अधिसभेच्या मंजुरीनंतर कुलपतींकडे स्टॅट्युट जातील. कुलपतींची मोहर उमटल्यानंतर स्टॅट्युट प्रत्यक्षात लागू होतील, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. अंकुश कदम यांनी दिली.

कॉमन परिनियमसाठी प्रयत्नवर्ष २०१६ मध्ये कायदा अस्तित्वात आल्यानंतर उच्चशिक्षण विभागाने संपूर्ण राज्यासाठी एकच परिनियम लागू करण्यासाठी माळी समितीची स्थापना केली होती. मात्र, त्या समितीचे पुढे काय झाले, हे कोणालाही समजले नाही. तसेच कॉमन परिनियमही आले नाही. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पुढाकार घेत स्वतंत्र नवीन परिनियम तयार केले.

...तर उच्च शिक्षण संचालकांना पत्र काढता आले नसतेराज्यातील बहुतांश विद्यापीठाने परिनियम बनवलेले नाहीत. परिनियम अस्तित्वात नसतील तेव्हा महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील तरतुदी प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना लागू होतात. त्याचाच आधार घेत उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षांच्या प्राचारात सहभागी झाल्यास कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, परिनियम अस्तित्वात असते तर संचालकांना तसे पत्र काढता आले नसते, असेही एका प्राध्यापकाने सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र