शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
2
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
3
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
4
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
5
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
6
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
7
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
8
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
9
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
10
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
11
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
12
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
13
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
14
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
15
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
16
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
17
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
18
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
19
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
20
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
Daily Top 2Weekly Top 5

संपन्न कुटुंबांनी विद्यार्थी दत्तक घ्यावेत

By admin | Updated: August 17, 2014 01:43 IST

नजीर शेख, औरंगाबाद प्रत्येक कुटुंबाने एक किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत दत्तक घ्यावेत, अशी भूमिका प्राचार्य डॉ. मगदूम फारुकी यांनी मांडली.

नजीर शेख, औरंगाबादशिक्षणाचा स्तर वाढविण्यासाठी, तसेच गरीब कुटुंबांनाही शिक्षणाची संधी मिळण्यासाठी माझ्या शहरातील आर्थिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाने एक किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत दत्तक घ्यावेत, अशी भूमिका मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मगदूम फारुकी यांनी मांडली. ‘माझ्या शहरात काय हवे?’ यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी भौतिक सुविधांबरोबरच सामाजिक सुधारणांच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत, असे स्पष्ट केले. राज्य सरकारतर्फे शिक्षणाच्या मोठ्या प्रमाणावर सोयी निर्माण झाल्या असल्या तरी अजूनही आपल्याकडे उच्च शिक्षण किंवा अगदी बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण कमीच आहे. आपल्या राज्यातील साक्षरता ८२ टक्क्यांहून अधिक आहे; मात्र उच्च शिक्षणाची टक्केवारी २० टक्क्यांहून कमी आहे. कारण शिक्षणाच्या सुविधा असल्या तरी आर्थिक विवंचनेमुळे अनेक कुटुंबांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करणे अशक्य होऊन जाते. काही कुटुंबांमध्ये बालके काम करून रोजीरोटी कमावतात व आपल्या कुटुंबाला हातभार लावतात. त्यामुळेही पालक अशा मुलांना शाळेत पाठवत नाहीत. या पालकांना शिक्षणाचे महत्त्व आणि त्याचा मुलाच्या भावी आयुष्यात होणारा फायदा याचे भान नसते; मात्र आपल्यासारख्या उच्च शिक्षण घेतलेल्या, व्यवसायात, नोकऱ्यांमध्ये स्थिर झालेल्या नागरिकांना याचे भान असते. त्यामुळे आपण आपल्या पाल्यांना चांगले आणि दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करतो. शिक्षण हा देश विकासाचा एक मार्ग आहे. अनेक राष्ट्रे उच्च आणि तंत्रशिक्षणाच्या बळावर प्रगतीकडे झेपावली आहेत. हा फार मोठा विचार झाला तरी आपण आपल्या पातळीवर या शहरासाठी काय करू शकतो, याचा विचार होणे आवश्यक आहे. खरे तर सांगायची ही गोष्ट नाही; परंतु मागील काही वर्षांपासून मी काही मुलांची शैक्षणिक फी भरत आहे. माझ्या वेतनातून ही रक्कम कपात होते. आपण स्वत: आधी करावे आणि नंतर लोकांना सांगावे, या हेतूनेच मी हे सांगितले. माझ्या मते, आपल्या शहरात सामाजिक जाणिवेचे खूप लोक आहेत. अनेक जण असे कार्य करीतही असतील; मात्र हे काम आणखी वाढले पाहिजे. ज्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे, त्यांनी शहरातील त्यांना जवळ असणाऱ्या किंवा सोयीच्या शाळेत जावे. तेथील मुख्याध्यापक, प्राचार्यांना भेटून गरीब व गरजू विद्यार्थ्यांची माहिती घ्यावी. दरमहा या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च भागेल एवढी मदत तर करावीच; परंतु त्यापुढे जाऊन त्या मुलांचा आहार, आरोग्य, शाळेतील उपस्थिती आणि त्यांची शैक्षणिक प्रगती याविषयीही काळजी घ्यावी. या भूमिकेतून सुरुवातीला काही लोक जरी पुढे आले तरी त्यांच्यातून इतरांना प्रेरणा मिळेल आणि या कामाला गती मिळू शकेल, असे वाटते. औद्योगिकदृष्ट्या पुढारलेले शहर शैक्षणिकदृष्ट्याही पुढे असायला हवे. आज वर्तमानपत्रे, मोबाईल, व्हॉटस्अप, फेसबुक आणि इतर अनेक साधने अस्तित्वात आहेत. याचाही उपयोग या कामासाठी होऊ शकतो. हे एक ‘मिशन’ माझ्या शहरात सुरू व्हायला पाहिजे, असे मला वाटते.