शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

विकतच्या पाण्यालाही ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’

By admin | Updated: August 6, 2015 00:09 IST

!बीड : उन्हाळ्यात पाणीटंचाई हे आपण ऐकले असेल. पण भर पावसाळ्यात विकतचे पाणी घेऊन तहान भागवायची, असे ऐकल्यावर प्रत्येकाला अश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही

 

!बीड : उन्हाळ्यात पाणीटंचाई हे आपण ऐकले असेल. पण भर पावसाळ्यात विकतचे पाणी घेऊन तहान भागवायची, असे ऐकल्यावर प्रत्येकाला अश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. पण हे भयाण वास्तव बीड शहरात आहे. सध्या बीडकर आपली तहान विकतच्या पाण्यावर भागवित आहेत. एवढेच नव्हे तर हे विकतचे पाणी मिळविण्यासाठी ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’ करावी लागत असल्याने, सध्या किती भयाण दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, याची प्रचिती येते. बीड शहरात सध्या नगर पालिकेकडून आठ ते दहा दिवसाला पाणी पुरवठा केला जातो. हे पाणी नागरिकांना अपुरे पडते. दोन ते तीनच दिवसात पालीकेचे आलेले पाणी संपत असल्याने राहिलेले आठ दिवस काढायचे कसे ? असा प्रश्न प्रत्येकापुढे असतो. अगोदरच पाऊस नसल्याने सर्व व्यवहान ठप्प झाले आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट बनल्याचे दिसते. अशा परिस्थितीत विकतचे पाणी घेऊन प्यायचे म्हणजे एक अडचणच. पण, ते केल्याशिवाय आता बीडकरांसाठी पर्याय उरलेला नाही. भर पावसाळ्यात विकतचे पाणी घेऊन पिण्याची दुर्दैवी वेळ सध्या बीडकरांवर आली आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे पाली येथील बिंदुसरा धरण सध्या कोरडेठाक पडले आहे. तर माजलगाव धरणातुन माजलगाव, बीड शहरासह ११ खेड्यांना पाणीपुरवठा केला जात असल्याने हे पाणी सुद्धा जास्त वेळ टिकेल याची शाश्वती देता येणार नाही, असे प्रशासनाने जाहिर केले होते. त्यामुळे नागरीकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. बीडकरांना पाणीपुरवठा करण्यासाठी अद्यापपर्यंत प्रशासनानेही कुठलेही पाऊल उचललेले नाही. त्यामुळे प्रशासनाविरोधात तिव्र संताप व्यक्त होत आहे. पाण्याची सोय करावी, अशी मागणी बीडकरांमधून जोर धरू लागली आहे. बारा महिने विकते पाणी फक्त दुष्काळातच पाणी लागते असे नाही. बाराही महिने काही भागातील नागरीक विकतचे पाणी घेत असल्याचे टँकर चालकाने सांगितले. कोणी बांधकामासाठी तर कोणी पिण्यासाठी पाणी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. पावसाळ्यात पाणी महागले उन्हाळ्यात तर पाणी महाग होतेच परंतु पावसाळ्यात याच्या किंमतीत अधिक वाढ झाली. उन्हाळ्यात २०० ते २५० रूपयाला मिळणारे टँकर आता २५० ते ३५० रूपयाला विकत घ्यावे लागत आहे. यावरून उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात पाणी महागाल्याचे स्पष्ट दिसते. जार वाल्यांचा धंदा तेजीत शहरात सध्या दुकानदारांपासून ते कार्यालये व घरामध्ये जार चे पाणी पिण्यासाठी घेतले जात आहे. जार ची किंमतही ३० रूपयांपासून ते ५० रूपयांपर्यंत आहे. यावर्षी आजही जार ला अधिक मागणी असून ते वेळेवर मिळणेही मुश्किल बनले आहे. (प्रतिनिधी)