शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

यंदापासून आयटीआय झालेल्यांना पॉलिटेक्निकच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश; प्रक्रिया झाली सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 13:42 IST

औरंगाबाद विभागात ५७ पॉलिटेक्निक कॉलेजेस असून १५,०४० एवढी प्रवेश क्षमता आहे

औरंगाबाद : पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना ई-स्क्रुटनिंग आणि प्रत्यक्ष स्क्रुटनिंग या दोन्हींपैकी एका सुविधेचा पर्याय निवडून अर्ज भरता येणार आहे.

औरंगाबाद विभागात शहरी व ग्रामीण भागात ५० प्रवेश सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्याठिकाणी विद्यार्थ्याला प्रवेशासंबंधीचे मार्गदर्शन तसेच नोंदणी अर्ज भरण्याची मोफत सुविधा करण्यात आली आहे.औरंगाबाद विभागात शासकीय व अशासकीय असे एकूण ५७ पॉलिटेक्निक कॉलेजेस असून त्यांची १५,०४० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. तंत्रनिकेतन अर्थात अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारा विद्यार्थी हा प्रामुख्याने ग्रामीण भागातील तसेच मराठी माध्यमात शिकलेला असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना परीक्षा व अध्ययन-अध्यापनासाठी मराठी माध्यमाचाही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

विशेष म्हणजे, यंदापासून कोणत्याही शाखेतून आयटीआय उत्तीर्ण झालेला विद्यार्थी हा तंत्रनिकेतनच्या थेट द्वितीय वर्षाच्या कोणत्याही शाखेत प्रवेशासाठी पात्र राहील, असा शासनाने नियम केला आहे. विद्यार्थ्यांच्या सोईसाठी तिसऱ्या अतिरिक्त प्रवेश फेरीचा अंतर्भाव या वर्षापासून प्रवेशप्रक्रियेत करण्यात आला आहे. कोव्हिडमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले आई व वडील गमावले आहेत व ज्यांच्याकडे ‘पीएम केअर्स प्रमाणपत्र’ आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी दोन अतिरिक्त जागा अभ्यासक्रमनिहाय राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.

प्रवेशासाठी लागणाऱ्या विविध कागदपत्रांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रवेशासाठी आवश्यक ती कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली आहे. पालक व विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक उमेश नागदेवे यांनी केले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबादNandedनांदेडBeedबीडJalanaजालनाOsmanabadउस्मानाबादlaturलातूरHingoliहिंगोलीparabhaniपरभणी