शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

कौतुकास्पद! आमीर खानच्या फार्मर कप स्पर्धेत गोळेगावकरांच्या महिलांना १५ लाखाचे बक्षीस

By बापू सोळुंके | Updated: March 21, 2023 16:29 IST

पाणी फाऊंडेशन फार्मर कप: राज्यातील ३९ तालुक्यातील १ हजार ५०० शेतकरी गट या स्पर्धेत होते.

छत्रपती संभाजीनगर: अभिनेना आमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशन संस्थेने राज्यात घेतलल्या फार्मर कप स्पर्धेत गोळेगावच्या (ता.खुलताबाद) चित्रा नक्षत्र शेतकरी महिला गटाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या गटाने  नुसता सहभागच नाही नोंदविला तर दहा महिने अथक परिश्रम करीत राज्यात दुसरा क्रमांक पटकावत १५ लाखांचे बक्षीस मिळविले. 

चित्रा नक्षत्र शेतकरी महिला गटाच्या सुनीता आढाव आणि सुवर्णा जोशी यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत गोळेेगावकरांनी २०१७ ते २०२० या कालावधीत माथा ते पायथा अशी जलसंधारणाची कामे गावकऱ्यांनी श्रमदानाने केली. यामुळे गावाची भूजलपातळी वाढली. मात्र या स्पर्धेत गोळेगावकरांना बक्षीस मिळाले नव्हते. गतवर्षी २०२२ साली पाणी फाऊंडेशनने शेतकरी गटासाठी फार्मर कप स्पर्धेचे आयोजन केले होते. 

या स्पर्धेत गावातील २६ महिलांनी एकत्र येऊन चित्रा नक्षत्र महिला शेतकरी बचत गटाची नोंदणी ३१ मे २०२२ रोजी सहभाग नोंदविला. राज्यातील ३९ तालुक्यातील १ हजार ५०० शेतकरी गट या स्पर्धेत होते. गावाचे उपसरपंच संतोष जोशी यांनी त्यांना मार्गदर्शन केले आणि स्पर्धेचे समन्वयकांशी चर्चा करून महिलांना प्रशिक्षण दिले. महिलांनी ही स्पर्धा समजून घेतली. यानंतर २६ महिलांनी एकजुटीने कापूस शेती केली. कृषीशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीला आवश्यक तेवढ्याच खतांची मात्र पिकांना दिली. 

जैविक किटकनाशकाचा वापर केल्याने उत्पादन खर्च एकरी केवळ १० हजारपर्यंत कमी झाला. एवढेच नव्हे तर उत्पादनातही दुप्पट वाढ झाली.गोळेगावच्या चित्रा नक्षत्र महिला गटाने सहा महिन्यात कमी खर्चात कापसाचे दुप्पट उत्पादन घेऊन दाखविल्याने या गटाला फार्मर कप स्पर्धेचे दुसऱ्या क्रमांकाचे रोख १५ लाख आणि ट्रॉफी असे बक्षीस मिळवले. १२ मार्च रोजी पुणे येथे झालेल्या एका समारंभात अमीर खान आणि मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार या शेतकरी गटाला प्रदान करण्यात आला. या पत्रकार परिषदेला उपसरपंच संतोष जोशी, प्रल्हाद अरसूळ यांच्यासह शेतकरी गटातील महिलांची उपस्थिती होती.

आवड सवड योजना राबविलीशेतकरी गटातील पाच पाच महिलांचा एक गट तयार केला. यानंतर आवड-सवड करीत परस्परांच्या शेतात जाऊन शेतीची कामे पूर्ण केल्याने मजूरांवरील खर्च वाचल्याचे आढाव यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAamir Khanआमिर खानWaterपाणी