शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

कौतुकास्पद! आमीर खानच्या फार्मर कप स्पर्धेत गोळेगावकरांच्या महिलांना १५ लाखाचे बक्षीस

By बापू सोळुंके | Updated: March 21, 2023 16:29 IST

पाणी फाऊंडेशन फार्मर कप: राज्यातील ३९ तालुक्यातील १ हजार ५०० शेतकरी गट या स्पर्धेत होते.

छत्रपती संभाजीनगर: अभिनेना आमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशन संस्थेने राज्यात घेतलल्या फार्मर कप स्पर्धेत गोळेगावच्या (ता.खुलताबाद) चित्रा नक्षत्र शेतकरी महिला गटाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या गटाने  नुसता सहभागच नाही नोंदविला तर दहा महिने अथक परिश्रम करीत राज्यात दुसरा क्रमांक पटकावत १५ लाखांचे बक्षीस मिळविले. 

चित्रा नक्षत्र शेतकरी महिला गटाच्या सुनीता आढाव आणि सुवर्णा जोशी यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत गोळेेगावकरांनी २०१७ ते २०२० या कालावधीत माथा ते पायथा अशी जलसंधारणाची कामे गावकऱ्यांनी श्रमदानाने केली. यामुळे गावाची भूजलपातळी वाढली. मात्र या स्पर्धेत गोळेगावकरांना बक्षीस मिळाले नव्हते. गतवर्षी २०२२ साली पाणी फाऊंडेशनने शेतकरी गटासाठी फार्मर कप स्पर्धेचे आयोजन केले होते. 

या स्पर्धेत गावातील २६ महिलांनी एकत्र येऊन चित्रा नक्षत्र महिला शेतकरी बचत गटाची नोंदणी ३१ मे २०२२ रोजी सहभाग नोंदविला. राज्यातील ३९ तालुक्यातील १ हजार ५०० शेतकरी गट या स्पर्धेत होते. गावाचे उपसरपंच संतोष जोशी यांनी त्यांना मार्गदर्शन केले आणि स्पर्धेचे समन्वयकांशी चर्चा करून महिलांना प्रशिक्षण दिले. महिलांनी ही स्पर्धा समजून घेतली. यानंतर २६ महिलांनी एकजुटीने कापूस शेती केली. कृषीशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीला आवश्यक तेवढ्याच खतांची मात्र पिकांना दिली. 

जैविक किटकनाशकाचा वापर केल्याने उत्पादन खर्च एकरी केवळ १० हजारपर्यंत कमी झाला. एवढेच नव्हे तर उत्पादनातही दुप्पट वाढ झाली.गोळेगावच्या चित्रा नक्षत्र महिला गटाने सहा महिन्यात कमी खर्चात कापसाचे दुप्पट उत्पादन घेऊन दाखविल्याने या गटाला फार्मर कप स्पर्धेचे दुसऱ्या क्रमांकाचे रोख १५ लाख आणि ट्रॉफी असे बक्षीस मिळवले. १२ मार्च रोजी पुणे येथे झालेल्या एका समारंभात अमीर खान आणि मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार या शेतकरी गटाला प्रदान करण्यात आला. या पत्रकार परिषदेला उपसरपंच संतोष जोशी, प्रल्हाद अरसूळ यांच्यासह शेतकरी गटातील महिलांची उपस्थिती होती.

आवड सवड योजना राबविलीशेतकरी गटातील पाच पाच महिलांचा एक गट तयार केला. यानंतर आवड-सवड करीत परस्परांच्या शेतात जाऊन शेतीची कामे पूर्ण केल्याने मजूरांवरील खर्च वाचल्याचे आढाव यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAamir Khanआमिर खानWaterपाणी