शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

कौतुकास्पद! आमीर खानच्या फार्मर कप स्पर्धेत गोळेगावकरांच्या महिलांना १५ लाखाचे बक्षीस

By बापू सोळुंके | Updated: March 21, 2023 16:29 IST

पाणी फाऊंडेशन फार्मर कप: राज्यातील ३९ तालुक्यातील १ हजार ५०० शेतकरी गट या स्पर्धेत होते.

छत्रपती संभाजीनगर: अभिनेना आमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशन संस्थेने राज्यात घेतलल्या फार्मर कप स्पर्धेत गोळेगावच्या (ता.खुलताबाद) चित्रा नक्षत्र शेतकरी महिला गटाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या गटाने  नुसता सहभागच नाही नोंदविला तर दहा महिने अथक परिश्रम करीत राज्यात दुसरा क्रमांक पटकावत १५ लाखांचे बक्षीस मिळविले. 

चित्रा नक्षत्र शेतकरी महिला गटाच्या सुनीता आढाव आणि सुवर्णा जोशी यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत गोळेेगावकरांनी २०१७ ते २०२० या कालावधीत माथा ते पायथा अशी जलसंधारणाची कामे गावकऱ्यांनी श्रमदानाने केली. यामुळे गावाची भूजलपातळी वाढली. मात्र या स्पर्धेत गोळेगावकरांना बक्षीस मिळाले नव्हते. गतवर्षी २०२२ साली पाणी फाऊंडेशनने शेतकरी गटासाठी फार्मर कप स्पर्धेचे आयोजन केले होते. 

या स्पर्धेत गावातील २६ महिलांनी एकत्र येऊन चित्रा नक्षत्र महिला शेतकरी बचत गटाची नोंदणी ३१ मे २०२२ रोजी सहभाग नोंदविला. राज्यातील ३९ तालुक्यातील १ हजार ५०० शेतकरी गट या स्पर्धेत होते. गावाचे उपसरपंच संतोष जोशी यांनी त्यांना मार्गदर्शन केले आणि स्पर्धेचे समन्वयकांशी चर्चा करून महिलांना प्रशिक्षण दिले. महिलांनी ही स्पर्धा समजून घेतली. यानंतर २६ महिलांनी एकजुटीने कापूस शेती केली. कृषीशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीला आवश्यक तेवढ्याच खतांची मात्र पिकांना दिली. 

जैविक किटकनाशकाचा वापर केल्याने उत्पादन खर्च एकरी केवळ १० हजारपर्यंत कमी झाला. एवढेच नव्हे तर उत्पादनातही दुप्पट वाढ झाली.गोळेगावच्या चित्रा नक्षत्र महिला गटाने सहा महिन्यात कमी खर्चात कापसाचे दुप्पट उत्पादन घेऊन दाखविल्याने या गटाला फार्मर कप स्पर्धेचे दुसऱ्या क्रमांकाचे रोख १५ लाख आणि ट्रॉफी असे बक्षीस मिळवले. १२ मार्च रोजी पुणे येथे झालेल्या एका समारंभात अमीर खान आणि मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार या शेतकरी गटाला प्रदान करण्यात आला. या पत्रकार परिषदेला उपसरपंच संतोष जोशी, प्रल्हाद अरसूळ यांच्यासह शेतकरी गटातील महिलांची उपस्थिती होती.

आवड सवड योजना राबविलीशेतकरी गटातील पाच पाच महिलांचा एक गट तयार केला. यानंतर आवड-सवड करीत परस्परांच्या शेतात जाऊन शेतीची कामे पूर्ण केल्याने मजूरांवरील खर्च वाचल्याचे आढाव यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAamir Khanआमिर खानWaterपाणी