प्रकल्पातील पाणी उपशाकडे प्रशासनाची डोळेझाक
By Admin | Updated: July 5, 2014 23:47 IST2014-07-05T23:47:23+5:302014-07-05T23:47:23+5:30
राम तत्तापुरे , अहमदपूर अहमदपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थोडगा, लिंबोटी व अंधोरी प्रकल्पातून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू केला आहे़

प्रकल्पातील पाणी उपशाकडे प्रशासनाची डोळेझाक
बंड शमले : प्रदेशाध्यक्षांच्या आश्रयाला
यवतमाळ : आमदार किंवा त्यांच्या पूत्राला विधानसभेचे तिकीट देऊ नका, अशी जाहीर भूमिका घेऊन बंडाचे निशाण फडकाविणाऱ्या काँग्रेसमधील असंतुष्ट पदाधिकाऱ्यांनी अवघ्या आठवडाभरातच ‘नांग्या’ टाकल्या. काँग्रेसमधील दुसऱ्या फळीच्या या नेत्यांनी शनिवारी प्रदेशाध्यक्षांच्या आश्रयाला जात नमते घेतले.
दोन आठवड्यांपूर्वी जिल्हा काँग्रेसमधील दुसऱ्या फळीच्या नेत्यांनी अचानक आक्रमक भूमिका घेतली. स्वतंत्र बैठकीनंतर पत्रपरिषद घेऊन आमदार व त्यांच्या पूत्रांच्या आगामी विधानसभेतील उमेदवारीला विरोध दर्शवित काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार वामनराव कासावार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी कासावारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर या असंतुष्ट नेत्यांमध्ये फूट पडली. यातील काही नेत्यांनी पुन्हा श्रीकृष्णनगरात बैठक घेऊन ६ जुलै रोजी सोनिया गांधींच्या दिल्ली भेटीचा मुहूर्त ठरविला. हे पदाधिकारी ठरल्या प्रमाणे दिल्लीला रवाना झाले असतील असा सर्वांचाच अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात या नेत्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या बंगल्यावर आश्रय घेऊन नांग्या टाकल्या. शनिवारी माणिकरावांनी या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन समजूत काढली आणि हे पदाधिकारी अवघ्या काही क्षणातच सर्वकाही समजलेसुद्धा!
दिल्लीवारी रोखली
दुसऱ्या फळीच्या या नेत्यांची प्रदेशाध्यक्षांनी ६ जुलैची दिल्लीवारी रोखली. त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतल्यानंतर ‘तुमच्या तक्रारीत तथ्य आहे’ अशी पावतीही लगेच फाडून दिली. जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व आमदारांची लवकरच बैठक बोलविली जाईल. त्यांना समज दिली जाईल, त्यांच्याही अडचणी ऐकून घेतल्या जातील, असे ठाकरे यांनी या पदाधिकाऱ्यांना सांगितले. अनेक ठिकाणी प्रशासनामुळे काँग्रेस हरल्याच्या बाबीला त्यांनी दुजोरा दिल्याचे सांगण्यात आले. ‘रॉयल्टी’वर अधिकारी आणण्याच्या पद्धतीला या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला. (जिल्हा प्रतिनिधी)