शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत ५०० कॉपीबहाद्दरांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 20:05 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु आहेत. यात पहिल्या पाच दिवसातच ५०४ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु आहेत. यात पहिल्या पाच दिवसातच ५०४ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले आहे. या कॉपीबहाद्दरांच्या उत्तरपत्रिका समितीपुढे ठेवून त्यांचा पूर्ण वर्षांचा निकाल रद्द करण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली.

विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना १७ मार्चपासून सुरुवात झाली आहे. पदवीच्या विविध अभ्यासक्रमांची  दोन लाख विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यात पहिल्या दिवशी केवळ ३ कॉपीबहाद्दर पकडण्यात आले होते. मात्र दुसर्‍या दिवशी हा आकडा ३० वर पोहचला. यानंतर तिसर्‍या दिवशी १६३, चौथ्या दिवशी १४७ आणि पाचव्या दिवशी  १६१ विद्यार्थ्यांना पकडण्यात आले आहे. विद्यापीठाने यावर्षी भरारी पथके नेमली आहेत. या पथकांनी सदरिल कारवाई केली आहे. यापूर्वीही परीक्षांमध्ये भरारी पथकांची नेमणूक करण्यात येत होती. मात्र कारवाईचा आकडा हा अत्यल्प असे. मात्र मागील वर्षी अभियांत्रिकीच्या परीक्षेत घडलेल्या प्रकारापासून परीक्षा विभागाने कॉपी आणि परीक्षा घेण्याविषयी काही कडक पावले उचलली आहेत. याशिवाय भरारी पथकांमध्ये कडक शिस्तीच्या प्राध्यापकांचा समावेश करण्यात आला. यामुळे कॉपीबहाद्दर पकडण्याचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला  असल्याचे डॉ. नेटके यांनी सांगितले.

परीक्षेला दांडी मारणारांचे मोठे प्रमाणपदवी परीक्षेला दांडी मारणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाणही हजारांमध्ये असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले. पदवी परीक्षेला १७ मार्च रोजी तब्बल १५ हजार १७ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. १९ मार्च रोजी १३ हजार ९२६, २० ला  १९ हजार ५७, २१ ला १६ हजार ८२८ आणि २२ मार्चला १६ हजार ५७७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादexamपरीक्षाStudentविद्यार्थीTeacherशिक्षकAurangabadऔरंगाबाद