शहरं
Join us  
Trending Stories
1
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
2
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
3
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
4
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
5
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
6
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
7
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
8
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
9
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
10
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
11
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
12
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
13
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
14
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
15
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
16
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
17
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
18
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
20
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

मुकुंदवाडी खून प्रकरणात अटकेतील पाच आरोपींना अवघ्या ९ तासांत सशर्त जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 13:50 IST

पोलिसांच्या तांत्रिक चुकांकडे आरोपींच्या वकिलांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

- बापू सोळुंके/राम शिनगारे 

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी खून प्रकरणातील ५ आरोपींना पोलिसांनी तपास करून अटक केली. मात्र, त्यांना न्यायालयात हजर करताना पोलिसांच्या तांत्रिक चुकांकडे आरोपींच्या वकिलांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. तांंत्रिक मुद्द्याच्या आधारे न्यायालयाने अटकेतील ५ आरोपींना अवघ्या ९ तासांत सशर्त जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अटकेतील आरोपींना त्यांच्या अटकेचे कारण लेखी स्वरूपात देणे हा त्यांचा हक्क आहे. या तांत्रिक मुद्यांच्या आधारे त्यांची अटक बेकायदेशीर ठरवत एससी- एसटी विशेष न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

मस्तान ऊर्फ नन्ना हुसेन कुरेशी (वय२९, रा. मुकुंदवाडी), समीर खान सरताज खान (१९), बाबर शेख अफसर शेख (३२), साजिद कुरेशी ऊर्फ सज्जू अहेमद कुरेशी (२९) आणि नासीर खान मोहम्मद मुनीर खान (२०) अशी जामीन मंजूर झालेल्या आरोपींची नावे आहेत. मुकुंदवाडी बसथांब्याजवळ गुरुवारी रात्री पावणेआठ वाजता पाच ते सहाजणांनी तीनजणांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. या घटनेत नितीन सोनाजी संकपाळ हे ठार झाले. सचिन संकपाळ आणि दत्ता बालाजी जाधव हे गंभीर जखमी असून ते रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. याप्रकरणी दत्ता जाधव यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास चक्रे फिरवून शुक्रवारी सकाळी ६:०१वाजता ६ आरोपींना अटक केली. यातील एक विधिसंघर्षग्रस्त बालक आहे. यामुळे त्यास बालसुधारगृहात पाठवून अन्य ५ आरोपींना पोलिसांनी सायंकाळी साडेचार वाजता, विशेष न्यायाधीश (एस.सी. आणि एस.टी.ॲक्ट) ए.आर. उबाळे यांच्या न्यायालयात हजर केले.

पोलिसांची बाजू काय होती?यावेळी पोलिसांच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला की, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त करायची आहेत, घटनेच्यावेळी आरोपींनी वापरलेले रक्ताचे डाग असलेले कपडे सी. ए. तपासणीसाठी जप्त करणे आहे, आरोपींनी एकत्रितपणे हा गुन्हा करण्यामागचा उद्देश काय होता, याचा तपास करायचा आहे. आरोपींनी गुन्हा करण्याची पूर्वतयारी केली किंवा कसे याबाबत तपास करणे आहे. हा हल्ला करण्यामागे पूर्वीचा काही वाद होता का, याबाबत तपास करावा लागेल. हे कृत्य करण्यास आरोपींना कोणी चिथावणी दिली किंवा साहाय्य केले, याबाबत तपास तसेच गंभीर गुन्ह्याचे साखळी पद्धतीने पुरावे हस्तगत करणे आहे. घटनेच्या वेळी आरोपींकडे कोणते मोबाइल होते तसेच यातील सीमकार्ड ॲक्टिव्ह होते का? घटनास्थळावरून पळून जाताना कोणत्या मार्गाचा आणि वाहनाचा वापर केला, याबाबत तपास करण्यासाठी आरोपींची ७ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती करण्यात आली.

अटक बेकायदेशीर का ठरली?यावेळी आरोपींच्या वतीने ॲड. अझर शेख यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, आरोपींना कोणत्या कारणासाठी अटक करण्यात आली याबाबत त्यांना आणि त्यांच्या जवळच्या नातेवाइकांना पोलिसांनी लेखी सूचना देणे हा त्यांचा हक्क आहे. शिवाय याबाबतची नोंद पोलिस ठाण्याच्या डायरीत करण्यात आली नसल्याचे दिसते. यामुळे ही अटक बेकायदेशीर असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

कोणत्या खटल्याचा संदर्भ दिला गेला?यासाठी आरोपींच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयाचा प्रबीर पूर्वकायस्थ विरुद्ध दिल्ली सरकार खटल्याचा दाखला दिला. उभय पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींना २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचकल्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या बंधपत्रावर सशर्त जामीन मंजूर केला. आरोपींना अटकेनंतर ९ तासांत जामीन मिळाल्याने पोलिसांना धक्काच बसला आहे.

पोलिसांनी हायकोर्टात अपील करावीआरोपींच्या घटनात्मक स्वातंत्र्याच्या हक्कांचे रक्षण करताना पीडित (मृत) व्यक्तीचे अनुच्छेद २१ च्या (जीवनाचा आणि स्वातंत्र्याचा हक्क) हमीचे रक्षण देखील त्याच निकषांवर झाले पाहिजे, असे मुंबई हायकोर्टाने राजश्री बिंदावत विरुद्ध महाराष्ट्र सरकार या प्रकरणांत स्पष्ट केले आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर पीडितांच्या हक्काचे काय हा प्रश्न उपस्थित होतो. पोलिसांनी या प्रकरणात हायकोर्टात अपील दाखल केलं पाहिजे.- डॉ. खुशालचंद बाहेती, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी