शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

आता मराठवाड्यातून मिळणार हवामानाचा अचूक अंदाज; सी-डॉपलर रडार बसविण्याची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 16:14 IST

अतिवृष्टी, ढगफुटी, अवर्षणाची माहिती मराठवाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत अचूकरीत्या जावी, यासाठी रडार महत्त्वाचे ठरणार आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील हवामानाचा अचूक अंदाज येण्यासाठी सी-बॅण्ड डॉपलर रडार बसविण्यासाठी केंद्र शासनाने तयारी सुरू केली असून, २१ मे रोजी केंद्रीय हवामान खात्याचे पथक औरंगाबादेत येणार आहे. म्हैसमाळसह जिल्ह्यातील काही जागांची पथकाकडून पाहणी करण्यात येणार आहे.

अतिवृष्टी, ढगफुटी, अवर्षणाची माहिती मराठवाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत अचूकरीत्या जावी, यासाठी रडार महत्त्वाचे ठरणार आहे. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी केंद्रीय अर्थ व विज्ञान मंत्रालयाने मराठवाड्यासाठी रडार बसविण्यासाठी परवानगी दिली. विभागाच्या कृषी, पर्यटन व उद्योग-दळणवळण विकासाच्या दृष्टीने येथील हवामानाची माहिती मिळण्यास रडारची मदत होणे शक्य होणार आहे.‘लोकमत’ने विशेष वृत्त मालिकेतून रडारचा विषय हाताळत केंद्र शासनापर्यंत पाठपुरावा केल्यानंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी या वृत्ताची दखल घेत हवामान खात्याकडून आढावा घेत विज्ञान मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर रडार बसविण्याचा मार्ग मोकळा झाला.

किमान तीनशे ते चारशे किमी अंतर या रडारच्या नियंत्रणात आहे. ३० ते ४० कोटी रुपयांच्या आसपास यासाठी खर्च येणार असून, औरंगाबाद जिल्हा राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणावर असून, येथून मुंबई व नागपूर, कोल्हापूर ते जळगाव, नाशिक, नंदुरबारपर्यंतचे पूर्ण अंतर रडारच्या कक्षेत येणे शक्य होणार आहे.

तीन ते चार महिन्यांत रडार बसेलकेंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांनी सांगितले, २१ मे रोजी केंद्रीय पथक रडार कुठे बसवायचे यासाठी जागेची पाहणी करण्यासाठी येणार आहे. पथकाने जागा निश्चित केल्यानंतर तीन ते चार महिन्यांत रडार बसेल, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरणMarathwadaमराठवाडा