शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

आता मराठवाड्यातून मिळणार हवामानाचा अचूक अंदाज; सी-डॉपलर रडार बसविण्याची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 16:14 IST

अतिवृष्टी, ढगफुटी, अवर्षणाची माहिती मराठवाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत अचूकरीत्या जावी, यासाठी रडार महत्त्वाचे ठरणार आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील हवामानाचा अचूक अंदाज येण्यासाठी सी-बॅण्ड डॉपलर रडार बसविण्यासाठी केंद्र शासनाने तयारी सुरू केली असून, २१ मे रोजी केंद्रीय हवामान खात्याचे पथक औरंगाबादेत येणार आहे. म्हैसमाळसह जिल्ह्यातील काही जागांची पथकाकडून पाहणी करण्यात येणार आहे.

अतिवृष्टी, ढगफुटी, अवर्षणाची माहिती मराठवाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत अचूकरीत्या जावी, यासाठी रडार महत्त्वाचे ठरणार आहे. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी केंद्रीय अर्थ व विज्ञान मंत्रालयाने मराठवाड्यासाठी रडार बसविण्यासाठी परवानगी दिली. विभागाच्या कृषी, पर्यटन व उद्योग-दळणवळण विकासाच्या दृष्टीने येथील हवामानाची माहिती मिळण्यास रडारची मदत होणे शक्य होणार आहे.‘लोकमत’ने विशेष वृत्त मालिकेतून रडारचा विषय हाताळत केंद्र शासनापर्यंत पाठपुरावा केल्यानंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी या वृत्ताची दखल घेत हवामान खात्याकडून आढावा घेत विज्ञान मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर रडार बसविण्याचा मार्ग मोकळा झाला.

किमान तीनशे ते चारशे किमी अंतर या रडारच्या नियंत्रणात आहे. ३० ते ४० कोटी रुपयांच्या आसपास यासाठी खर्च येणार असून, औरंगाबाद जिल्हा राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणावर असून, येथून मुंबई व नागपूर, कोल्हापूर ते जळगाव, नाशिक, नंदुरबारपर्यंतचे पूर्ण अंतर रडारच्या कक्षेत येणे शक्य होणार आहे.

तीन ते चार महिन्यांत रडार बसेलकेंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांनी सांगितले, २१ मे रोजी केंद्रीय पथक रडार कुठे बसवायचे यासाठी जागेची पाहणी करण्यासाठी येणार आहे. पथकाने जागा निश्चित केल्यानंतर तीन ते चार महिन्यांत रडार बसेल, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरणMarathwadaमराठवाडा