शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या निर्णयानुसारच तलावांचे ठेके देणार

By admin | Updated: August 15, 2014 01:11 IST

औरंगाबाद : तलावाचा ठेका २००१ प्रमाणे चालू करण्यात येईल. अशी घोषणा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यवसाय विकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी मच्छीमार सहकारी संस्था बचाव परिषदेत केली.

औरंगाबाद : पारंपरिक मच्छीमारांना प्राधान्य देणारा वर्ष २००१ चा जो शासन निर्णय लागू व्हावा, अशी मागणी होत आहे, त्या शासन निर्णयाची सोमवारपासून अंमलबजावणी होईल आणि तलावाचा ठेका २००१ प्रमाणे चालू करण्यात येईल. यामुळे पूर्वीप्रमाणे व्यवहार, व्यवसाय करता येईल, अशी घोषणा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यवसाय विकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित मच्छीमार सहकारी संस्था बचाव परिषदेत केली.मत्स्यव्यवसाय विभागाचा २००१ चा शासन निर्णय कायम करून राज्यातील मच्छीमार सहकार चळवळीला बळकटी दिल्याबद्दल आघाडी सरकार व अब्दुल सत्तार यांचे महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीतर्फे जाहीर आभार व सत्कार सोहळा गुरुवारी संत तुकाराम नाट्यगृहात करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष विलास औताडे, जालना लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर सत्तार, महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष प्रकाश लोणारे, उपाध्यक्ष सीताराम नगरे, सचिव रवींद्र पांचाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अब्दुल सत्तार यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अब्दुल सत्तार म्हणाले, सर्व मच्छीमारांना पाचशे रुपयांत पास द्यायचा आणि या पासच्या माध्यमातून त्यांनी वर्षभर मासेमारी करावी, चालक आणि मालक तेच होतील, अशी इच्छा आहे. संस्था चालविली पाहिजे. मात्र, त्याबरोबर मच्छीमार कसा सक्षम होईल, त्यांना कशी मदत करता येईल, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. गुणवत्ता असूनही केवळ पैशांअभावी त्यांची मुले शिक्षणापासून दूर होणार नाही, यासाठी संस्थांनी प्रयत्न केले पाहिजे. यामुळे मच्छीमाराचा मुलगा मच्छीमारच न होता अधिकारी होईल, असे अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले.याप्रसंगी प्रकाश लोणारे यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यास राज्यातील संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.३० लाख मत्स्यव्यावसायिकांना दिलासामच्छीमार सहकारी संस्थांना तलावामध्ये जून-जुलै महिन्यात मत्स्यबीज संचयन करता येऊ शकले नाही. मात्र, केलेल्या घोषणेमुळे लहान-मोठे तलाव मत्स्य सहकारी संस्थांना मिळतील. २००१ च्या शासन निर्णयात खाजगी उद्योगास थारा नसून पारंपरिक मच्छीमारांना प्राधान्य दिले जाईल.राज्यभरातील २५ ते ३० लाख मत्स्यव्यावसायिकांना दिलास मिळणार असल्याचे महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष प्रकाश लोणारे यांनी सांगितले.