शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये अपघातात २८ टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:07 IST

औरंगाबाद : शहरातील अपघाताच्या प्रमाणात तब्बल २८ टक्क्यांनी घट झाली आहे, तर अपघातात मृत्युमुखी आणि जखमी होणाऱ्यांचे प्रमाणही कमी ...

औरंगाबाद : शहरातील अपघाताच्या प्रमाणात तब्बल २८ टक्क्यांनी घट झाली आहे, तर अपघातात मृत्युमुखी आणि जखमी होणाऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे.

वाढत्या अपघातांमुळे औरंगाबाद जिल्ह्याचा लाल यादीत समावेश झाला होता. राज्यात सर्वत्र अपघाताचे प्रमाण वाढल्याने त्यात दररोज अनेकांवर जीव गमावण्याची वेळ येत होती. याच परिस्थितीला औरंगाबादला सामोरे जावे लागत होते. जिल्ह्यातील वाहनांची संख्या १४ लाखांवर गेली आहे. महिन्याकाठी ८ हजार, तर दररोज २५१ वाहने रस्त्यावर येतात. वाहनांच्या संख्येत दुचाकींचे प्रमाणही अधिक आहे. गेल्या काही वर्षांत औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार झाला. त्यामुळे महामार्ग ओलांडून शहरात येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शहर परिसरातील महामार्गांवर अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. या सगळ्यात वाहतूक नियमांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे अपघातांना आमंत्रण मिळत आहे. २०१९ मध्ये वाढलेले अपघात व त्यात बळी जाणाऱ्यांच्या संख्येमुळे औरंगाबाद जिल्हा लाल यादीत गेला. ही बाब गांभीर्याने घेऊन राज्य रस्ता सुरक्षा समितीने तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आरटीओ कार्यालय, वाहतूक पोलीस, पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून अपघात नियंत्रणासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यातून अपघातांचे प्रमाण घटल्याने आकडेवारीवरून समोर आले. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये अपघातांचे प्रमाण कमी झाल्याची माहिती सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने यांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्याने जिल्हा रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या. यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांचा राज्य रस्ता सुरक्षा अभियानाप्रसंगीच्या मुख्य सोहळ्यात सत्कार करण्यात येणार आहे.

---

असे घटले अपघातांचे प्रमाण

२०१९

एकूण अपघात - ५६०

एकूण मृत्यू -१९९

एकूण जखमी -४३४

---

२०२०

एकूण अपघात - ४०६

एकूण मृत्यू -१३६

एकूण जखमी - २९४

----

लाॅकडाऊनचा फायदा

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी लाॅकडाऊन पाळण्यात आला. याचा परिणाम रस्त्यावरील रहदारीवर झाला. रहदारी घटलेली असल्याने अपघातांचे प्रमाणही घटले. मृत्यूचे प्रमाण ३२ टक्क्यांनी, तर जखमी होण्याचे प्रमाणही ३२ टक्क्यांनी कमी झाले आहे.