शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

औरंगाबादमध्ये अपघातात २८ टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:07 AM

औरंगाबाद : शहरातील अपघाताच्या प्रमाणात तब्बल २८ टक्क्यांनी घट झाली आहे, तर अपघातात मृत्युमुखी आणि जखमी होणाऱ्यांचे प्रमाणही कमी ...

औरंगाबाद : शहरातील अपघाताच्या प्रमाणात तब्बल २८ टक्क्यांनी घट झाली आहे, तर अपघातात मृत्युमुखी आणि जखमी होणाऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे.

वाढत्या अपघातांमुळे औरंगाबाद जिल्ह्याचा लाल यादीत समावेश झाला होता. राज्यात सर्वत्र अपघाताचे प्रमाण वाढल्याने त्यात दररोज अनेकांवर जीव गमावण्याची वेळ येत होती. याच परिस्थितीला औरंगाबादला सामोरे जावे लागत होते. जिल्ह्यातील वाहनांची संख्या १४ लाखांवर गेली आहे. महिन्याकाठी ८ हजार, तर दररोज २५१ वाहने रस्त्यावर येतात. वाहनांच्या संख्येत दुचाकींचे प्रमाणही अधिक आहे. गेल्या काही वर्षांत औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार झाला. त्यामुळे महामार्ग ओलांडून शहरात येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शहर परिसरातील महामार्गांवर अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. या सगळ्यात वाहतूक नियमांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे अपघातांना आमंत्रण मिळत आहे. २०१९ मध्ये वाढलेले अपघात व त्यात बळी जाणाऱ्यांच्या संख्येमुळे औरंगाबाद जिल्हा लाल यादीत गेला. ही बाब गांभीर्याने घेऊन राज्य रस्ता सुरक्षा समितीने तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आरटीओ कार्यालय, वाहतूक पोलीस, पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून अपघात नियंत्रणासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यातून अपघातांचे प्रमाण घटल्याने आकडेवारीवरून समोर आले. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये अपघातांचे प्रमाण कमी झाल्याची माहिती सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने यांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्याने जिल्हा रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या. यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांचा राज्य रस्ता सुरक्षा अभियानाप्रसंगीच्या मुख्य सोहळ्यात सत्कार करण्यात येणार आहे.

---

असे घटले अपघातांचे प्रमाण

२०१९

एकूण अपघात - ५६०

एकूण मृत्यू -१९९

एकूण जखमी -४३४

---

२०२०

एकूण अपघात - ४०६

एकूण मृत्यू -१३६

एकूण जखमी - २९४

----

लाॅकडाऊनचा फायदा

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी लाॅकडाऊन पाळण्यात आला. याचा परिणाम रस्त्यावरील रहदारीवर झाला. रहदारी घटलेली असल्याने अपघातांचे प्रमाणही घटले. मृत्यूचे प्रमाण ३२ टक्क्यांनी, तर जखमी होण्याचे प्रमाणही ३२ टक्क्यांनी कमी झाले आहे.