परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू

By Admin | Updated: March 5, 2015 00:01 IST2015-03-04T23:57:11+5:302015-03-05T00:01:33+5:30

उस्मानाबाद : औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोन व इतर एका ठिकाणी झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला़ हे अपघात बुधवारी सकाळी व सायंकाळच्या दरम्यान घडले असून,

Accidental death of a test student | परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू

परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू


उस्मानाबाद : औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोन व इतर एका ठिकाणी झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला़ हे अपघात बुधवारी सकाळी व सायंकाळच्या दरम्यान घडले असून, यामध्ये एका बारावीच्या परीक्षार्थी नवविवाहितेसह एक महिला, एका युवकाचा समावेश आहे़
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील नवविवाहिता प्रिया परमेश्वर सगट (वय-१९) या बारावीची परीक्षा देत आहेत़ प्रिया सगट यांचा बारावीच्या परीक्षेचा बुधवारी शेवटचा पेपर होता़ तो पेपर देण्यासाठी प्रिया सगट या दुचाकीवरून (क्रएम़एच़ डब्ल्यू/ ३९२८) वरून उस्मानाबादकडे येत होत्या़ त्यांची दुचाकी सोलापूर- औरंगाबाद महामार्गावरील कावलदारा वरील वळणावर आली असता उस्मानाबादहून तुळजापूरकडे जाणाऱ्या बसने जोराची धडक दिली़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रिया सगट यांचा जागीच मृत्यू झाला़ घटनेनंतर त्यांना जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते़ मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर मयत घोषित केले़ प्रिया यांचा मागील तीन महिन्यांपूर्वी खुदावाडी येथील परमेश्वर सगट यांच्याशी विवाह झाला होता़ अंगाची हळद निघण्यापूर्वीच नवविवाहितेचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे़ महाराष्ट्र राज्य बलुतेदार फेडरेशनचे चेअरमन सुभाष पाटोळे यांची ती मुलगी होत़ टाकळी येथे प्रिया सगट यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले़
उस्मानाबाद येथील रहिवाशी असलेला शैलेश तानाजी गोरे हा युवक बुधवारी सायंकाळी दुचाकीवरून (क्ऱएम़एच़२५-ए़ए़ २३६७) उस्मानाबादकडे जात होता़ त्याची दुचाकी सोलापूर- औरंगाबाद महामार्गावरील तेरखेडा गावाजवळील खंडोबा मंदिराजवळ आली असता समोरून आलेल्या जीपने (क्ऱएम़ एच़ २५- बी़ ८५६) जोरची धडक दिली़ या अपघातात दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, मयताचे पार्थिव येरमाळा येथील रूग्णालयात नेण्यात आले होते़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता़ (प्रतिनिधी)
बेंबळी येथील शशीकला प्रकाश राजमाने (वय-४६) या महिलेस अपघातात गंभीर जखमी झाल्याने बुधवारी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मयत घोषित केले़ याबाबत शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती़

Web Title: Accidental death of a test student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.